शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

..तर टोलनाका जाळून टाकू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:57 IST

शेतकऱ्यांचा मावेजा, आणि रस्त्यावरील सुविधा उपलब्ध करून न देता पाडळसिंगी टोला नाका सुरु कराल तर याद राखा. टोलनाका जाळून टाकूत, असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर यांनी दिला.

ठळक मुद्देसंदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित : प्रशासनास इशारा

बीड : शेतकऱ्यांचा मावेजा, आणि रस्त्यावरील सुविधा उपलब्ध करून न देता पाडळसिंगी टोला नाका सुरु कराल तर याद राखा. टोलनाका जाळून टाकूत, असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर यांनी दिला. बळजबरीने टोल उभारला तर उद्ध्वस्त कसा करायचा हे आम्हाला माहीत असल्याचा इशारा माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दिला.औरंगाबाद - येडशी राष्ट्रीय महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्या शेतकऱ्यांना संपूर्ण मावेजा मिळावा, सर्व्हीस रोड द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे क्षीरसागर, विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रास्ता रोको आंदोलन करत राष्ट्रीय महामार्ग अडविण्यात आला. बायपास प्रश्नी व शेतकºयांच्या मावेजासाठी सरकार कानाडोळा करत असेल तर न्यायालयीन लढाईही आम्ही लढूत, असे प्रतिपादन माजी आ. सय्यद सलीम यांनी केले. राष्ट्रीय महामार्गावर बीड बायपासवर महालक्ष्मी चौकात राष्ट्रवादीच्या वतीने ९ मार्च रोजी रास्ता रोको करत संताप व्यक्त केला.धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोकार्पण सोहळ्याचे आयोजन गेवराई शहरात केले होते. पाडळसिंगी येथील टोलनाका सुरु करण्यात येणार होता. गेवराईत हा कार्यक्रम सुरु असताना बीडमध्ये मात्र राष्ट्रवादीच्या वतीने जबरदस्त रास्ता रोको आंदोलन झाले.सदर रस्त्याचे काम अपूर्ण असताना इथल्या सत्ताधाºयांकडून आणि नेते मंडळींकडून उद्घाटनाचा घाट घातल्या गेला. याचा त्रास बीड जिल्ह्यातील जनतेला होणार आहे. टोलनाका सुरु केल्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्या खिशाला कात्री लागेल, असा जबरदस्तीने सुरु करण्यात आलेला टोलनाका कसा उद्ध्वस्त करायचा हे आम्हाला माहीत आहे, असा इशारा विजयसिंह पंडित यांनी दिला.स्थानिक आमदार, विकास पुरुष गडकरींकडे जातात कशाला?जेव्हा बीड बायपास आणि महामार्गाचा सर्व्हे सुरु झाला तेंव्हापासून बीडचे स्वत:ला विकास पुरु ष म्हणून मिरवणारे स्थानिक आमदार, रेल्वे विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे गेल्याचे फोटो बाहेर आले. नितीन गडकरी यांना हे विकास पुरु ष नेमके कशासाठी भेटतात? हे जनतेने विचारल्यानंतर ते लोकांना बीड बायपास महामार्ग अशी कारणे सांगतात. परंतु, जनतेला ते नेमकं कशासाठी भेटतात, बायपाससाठी की अन्य कशासाठी? अशी कोपरखळी मारत टोल वसूल करणाºयांच्या व्यासपीठावर जाणाºया स्थानिक आमदारांनाच जनता धडा शिकवेल, असा टोलाही संदीप क्षीरसागर यांनी लगावला आहे.

टॅग्स :Beedबीडroad safetyरस्ते सुरक्षाagitationआंदोलन