शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

..तर टोलनाका जाळून टाकू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:57 IST

शेतकऱ्यांचा मावेजा, आणि रस्त्यावरील सुविधा उपलब्ध करून न देता पाडळसिंगी टोला नाका सुरु कराल तर याद राखा. टोलनाका जाळून टाकूत, असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर यांनी दिला.

ठळक मुद्देसंदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित : प्रशासनास इशारा

बीड : शेतकऱ्यांचा मावेजा, आणि रस्त्यावरील सुविधा उपलब्ध करून न देता पाडळसिंगी टोला नाका सुरु कराल तर याद राखा. टोलनाका जाळून टाकूत, असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर यांनी दिला. बळजबरीने टोल उभारला तर उद्ध्वस्त कसा करायचा हे आम्हाला माहीत असल्याचा इशारा माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दिला.औरंगाबाद - येडशी राष्ट्रीय महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्या शेतकऱ्यांना संपूर्ण मावेजा मिळावा, सर्व्हीस रोड द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे क्षीरसागर, विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रास्ता रोको आंदोलन करत राष्ट्रीय महामार्ग अडविण्यात आला. बायपास प्रश्नी व शेतकºयांच्या मावेजासाठी सरकार कानाडोळा करत असेल तर न्यायालयीन लढाईही आम्ही लढूत, असे प्रतिपादन माजी आ. सय्यद सलीम यांनी केले. राष्ट्रीय महामार्गावर बीड बायपासवर महालक्ष्मी चौकात राष्ट्रवादीच्या वतीने ९ मार्च रोजी रास्ता रोको करत संताप व्यक्त केला.धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोकार्पण सोहळ्याचे आयोजन गेवराई शहरात केले होते. पाडळसिंगी येथील टोलनाका सुरु करण्यात येणार होता. गेवराईत हा कार्यक्रम सुरु असताना बीडमध्ये मात्र राष्ट्रवादीच्या वतीने जबरदस्त रास्ता रोको आंदोलन झाले.सदर रस्त्याचे काम अपूर्ण असताना इथल्या सत्ताधाºयांकडून आणि नेते मंडळींकडून उद्घाटनाचा घाट घातल्या गेला. याचा त्रास बीड जिल्ह्यातील जनतेला होणार आहे. टोलनाका सुरु केल्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्या खिशाला कात्री लागेल, असा जबरदस्तीने सुरु करण्यात आलेला टोलनाका कसा उद्ध्वस्त करायचा हे आम्हाला माहीत आहे, असा इशारा विजयसिंह पंडित यांनी दिला.स्थानिक आमदार, विकास पुरुष गडकरींकडे जातात कशाला?जेव्हा बीड बायपास आणि महामार्गाचा सर्व्हे सुरु झाला तेंव्हापासून बीडचे स्वत:ला विकास पुरु ष म्हणून मिरवणारे स्थानिक आमदार, रेल्वे विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे गेल्याचे फोटो बाहेर आले. नितीन गडकरी यांना हे विकास पुरु ष नेमके कशासाठी भेटतात? हे जनतेने विचारल्यानंतर ते लोकांना बीड बायपास महामार्ग अशी कारणे सांगतात. परंतु, जनतेला ते नेमकं कशासाठी भेटतात, बायपाससाठी की अन्य कशासाठी? अशी कोपरखळी मारत टोल वसूल करणाºयांच्या व्यासपीठावर जाणाºया स्थानिक आमदारांनाच जनता धडा शिकवेल, असा टोलाही संदीप क्षीरसागर यांनी लगावला आहे.

टॅग्स :Beedबीडroad safetyरस्ते सुरक्षाagitationआंदोलन