शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
5
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
6
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
7
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
8
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
9
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
10
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
11
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
12
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
13
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
14
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
15
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
16
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
17
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
18
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
19
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
20
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
Daily Top 2Weekly Top 5

..तर टोलनाका जाळून टाकू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:57 IST

शेतकऱ्यांचा मावेजा, आणि रस्त्यावरील सुविधा उपलब्ध करून न देता पाडळसिंगी टोला नाका सुरु कराल तर याद राखा. टोलनाका जाळून टाकूत, असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर यांनी दिला.

ठळक मुद्देसंदीप क्षीरसागर, विजयसिंह पंडित : प्रशासनास इशारा

बीड : शेतकऱ्यांचा मावेजा, आणि रस्त्यावरील सुविधा उपलब्ध करून न देता पाडळसिंगी टोला नाका सुरु कराल तर याद राखा. टोलनाका जाळून टाकूत, असा गर्भित इशारा राष्ट्रवादीचे युवक नेते संदीप क्षीरसागर यांनी दिला. बळजबरीने टोल उभारला तर उद्ध्वस्त कसा करायचा हे आम्हाला माहीत असल्याचा इशारा माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दिला.औरंगाबाद - येडशी राष्ट्रीय महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, त्या शेतकऱ्यांना संपूर्ण मावेजा मिळावा, सर्व्हीस रोड द्यावा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे क्षीरसागर, विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वाखाली दोन तास रास्ता रोको आंदोलन करत राष्ट्रीय महामार्ग अडविण्यात आला. बायपास प्रश्नी व शेतकºयांच्या मावेजासाठी सरकार कानाडोळा करत असेल तर न्यायालयीन लढाईही आम्ही लढूत, असे प्रतिपादन माजी आ. सय्यद सलीम यांनी केले. राष्ट्रीय महामार्गावर बीड बायपासवर महालक्ष्मी चौकात राष्ट्रवादीच्या वतीने ९ मार्च रोजी रास्ता रोको करत संताप व्यक्त केला.धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोकार्पण सोहळ्याचे आयोजन गेवराई शहरात केले होते. पाडळसिंगी येथील टोलनाका सुरु करण्यात येणार होता. गेवराईत हा कार्यक्रम सुरु असताना बीडमध्ये मात्र राष्ट्रवादीच्या वतीने जबरदस्त रास्ता रोको आंदोलन झाले.सदर रस्त्याचे काम अपूर्ण असताना इथल्या सत्ताधाºयांकडून आणि नेते मंडळींकडून उद्घाटनाचा घाट घातल्या गेला. याचा त्रास बीड जिल्ह्यातील जनतेला होणार आहे. टोलनाका सुरु केल्यामुळे जिल्ह्यातील जनतेच्या खिशाला कात्री लागेल, असा जबरदस्तीने सुरु करण्यात आलेला टोलनाका कसा उद्ध्वस्त करायचा हे आम्हाला माहीत आहे, असा इशारा विजयसिंह पंडित यांनी दिला.स्थानिक आमदार, विकास पुरुष गडकरींकडे जातात कशाला?जेव्हा बीड बायपास आणि महामार्गाचा सर्व्हे सुरु झाला तेंव्हापासून बीडचे स्वत:ला विकास पुरु ष म्हणून मिरवणारे स्थानिक आमदार, रेल्वे विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे गेल्याचे फोटो बाहेर आले. नितीन गडकरी यांना हे विकास पुरु ष नेमके कशासाठी भेटतात? हे जनतेने विचारल्यानंतर ते लोकांना बीड बायपास महामार्ग अशी कारणे सांगतात. परंतु, जनतेला ते नेमकं कशासाठी भेटतात, बायपाससाठी की अन्य कशासाठी? अशी कोपरखळी मारत टोल वसूल करणाºयांच्या व्यासपीठावर जाणाºया स्थानिक आमदारांनाच जनता धडा शिकवेल, असा टोलाही संदीप क्षीरसागर यांनी लगावला आहे.

टॅग्स :Beedबीडroad safetyरस्ते सुरक्षाagitationआंदोलन