शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

बीड पोलिसांचा रोल संपला, मस्साजोगचे तिनही गुन्हे सीआयडीकडे; आता मोर्चा कोठे निघणार?

By सोमनाथ खताळ | Updated: December 25, 2024 16:02 IST

या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी, सर्वधर्मातील लोक, सर्व पक्षातील नेते, कार्यकर्ते आदी सहभागी होणार आहेत.

बीड : केज तालुक्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण हे तिनही गुन्हे आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातून बीडपोलिसांचा रोल संपला आहे. दरम्यान, त्या आधीच जिल्हाभरातील सर्वांनी एकत्रित येऊन २८ डिसेंबर रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्याचे निश्चीत केले होते. परंतू आता बीड पोलिसांच्या हाती काहीच राहिले नाही. मोर्चा तर निघणारच आहे, परंतू तो पोलिस अधीक्षक कार्यालयावर जाणार की जिल्हाधिकारी कार्यालयावर, याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. 

मोर्चा जर पोलिस अधीक्षक कार्यालयावर नेला तर पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ अधिकारी यांच्याकडून आता आमच्याकडे तपास राहिला नाही, असे उत्तर देतील. परंतू हाच मोर्चा जर जिल्हाधिकारी कार्यालयावर नेला तर जिल्हाधिकारी हे आपल्या अधिकारात सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी, मुख्यमंत्री कार्यालय आदींना बोलून यावर मार्ग काढू शकतात, असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मोर्चाचे ठिकाण बदलणार की तेच राहणार? २८ डिसेंबरलाच समजणार आहे. 

दरम्यान, या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यासह खासदार, आमदार, इतर लोकप्रतिनिधी, सर्वधर्मातील लोक, सर्व पक्षातील नेते, कार्यकर्ते आदी सहभागी होणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच या मोर्चाचे नियोजन बीडमध्ये करण्यात आले होते.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारीbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणPoliceपोलिस