शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यातील सत्ता अन् पैशाची मस्ती उतरली पाहिजे; सुप्रिया सुळेंचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 13:05 IST

तपास यंत्रणेने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने चालू आहे, कोणता तपास झाला हे जाहीरपणे सांगावे

केज/परळी : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या करणारा आरोपी कृष्णा आंधळे हा ७१ दिवसांपासून फरार आहे. हे कशाचे द्योतक आहे? असा प्रश्न उपस्थित करून बीड जिल्ह्यातील सत्ता आणि पैशाची मस्ती उतरली पाहिजे, असे म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खा. सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला. खा. सुळे यांनी देशमुख व परळीतील महादेव मुंडे कुटुंबाची मंगळवारी भेट घेतली. त्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची खा. सुळे यांनी भेट घेत सांत्वन केले. जोपर्यंत देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत. बीड जिल्ह्यातील गुंडा गर्दी संपली पाहिजे, बीडमधील सत्ता आणि पैशाची मस्ती उतरली पाहिजे. गावकऱ्यांनो, सामूहिक अन्नत्याग आंदोलन करू नका, असे आवाहन खा. सुळे यांनी केले. या प्रकरणातील सर्व गुन्हेगार व पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक या सर्वांचे सरपंच हत्येपूर्वीपासूनचे व अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्यादरम्यानचे सीडीआर काढून दोषी अधिकारी शोधले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या. या प्रकरणातील तपास यंत्रणेने पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने चालू आहे, कोणता तपास झाला हे जाहीरपणे सांगावे, असेही खा. सुळे म्हणाल्या.

न्यायालयीन चौकशीचे स्रोत वाढवा - आ. जितेंद्र आव्हाडबीड जिल्ह्यात मंत्री धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादाने ज्यांनी, ज्यांनी गुन्हे केले आहेत, अशा अन्यायग्रस्तांची बीड जिल्ह्यात मालिकाच घडली आहे. दोन वर्षांत जिल्ह्यात धुमाकूळ घालून वाटेल तसे गुन्हे करण्यात आले आहेत. हे धक्कादायक असून यांची उकल होण्यासाठी न्यायालयीन चौकशीचे स्रोत वाढविले पाहिजेत, अशी भूमिका आ. जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

राजीनामा दिला की सर्वच आरोपी फासावर चढतील - आ. संदीप क्षीरसागरमंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला की सर्वच आरोपी फासावर चढतील. त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा, ही आपली मागणी आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी पंकज कुमावत यांना जिल्ह्यात बोलाविण्यात येण्याची मागणीही त्यांनी केली.

सामूहिक अन्नत्याग आंदोलनावर गावकरी ठामआमच्या मागण्या प्रशासनाने २५ फेब्रुवारीपर्यंत मंजूर कराव्यात, नसता आम्ही सामूहिक अन्नत्याग आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका मस्साजाेग ग्रामस्थांनी यावेळी मांडली.

हत्येला अनैतिक संबंधाचे वळण देण्याचा प्रयत्न - धनंजय देशमुखभावाची हत्या झाल्यानंतर रुग्णवाहिका केज पोलिस ठाणे अथवा रुग्णालयात नेण्याऐवजी कळंबकडे नेली जात होती. कळंबमध्ये एक महिला तयार होती. तिला पैसे देऊन छेडछाडीचा आरोप करायचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याचा प्लॅन होता; परंतु ग्रामस्थांनी पाठलाग केल्याने हा प्लॅन फसला. जर ग्रामस्थांनी पाहिले नसते तर अनैतिक संंबंधाचे वळण दिले असते, असा आरोप धनंजय देखमुख यांनी केला. अशा अनेक घटना यापूर्वी घडल्या असून, अनेकांना समाजातून उठवून लावल्याचेही ते म्हणाले.

महादेव मुंडेंची पत्नी उपोषणावर ठामपरळीतील महादेव मुंडे यांच्या कुटुंबाचीही खा. सुळे यांनी भेट घेऊन त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्याशी त्यांनी चर्चा केली. आरोपींना अटक का होत नाही, असा प्रश्नही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी खा. सुप्रिया सुळे यांच्यासमोर उपस्थित केला. खा. सुळे यांनी फोनवरून बीडचे जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याशी संवाद साधला. या खून प्रकरणातील आरोपीस अटक होत नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळाला असे वाटणार नाही. पोलिसांनी आजपर्यंत तपास केला नाही. पोलिस प्रशासन दोषी आहे. आरोपींच्या अटकेच्या मागणीसाठी आपण उपोषण करण्यावर ठाम असल्याचेही ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेBeedबीडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण