शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

सांगा, जगायचं कसं? भटक्या समाजाचा टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 05:51 IST

टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही सकाळीच घराबाहेर पडतो. मालक लोक (नागरिक) कामासाठी घराबाहेर पडण्याआधीच आम्ही भिक्षुकी करून धान्य, पैसे आणि इतर पदार्थ जमा करतो. याच्यावरच आमचे कुटुंब चालते, परंतु मागच्या काही दिवसांपासून वेशभूषेकडे पाहून आम्हाला मुले पळविणारी टोळी समजून मारहाण केली जात आहे.

बीड : टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी आम्ही सकाळीच घराबाहेर पडतो. मालक लोक (नागरिक) कामासाठी घराबाहेर पडण्याआधीच आम्ही भिक्षुकी करून धान्य, पैसे आणि इतर पदार्थ जमा करतो. याच्यावरच आमचे कुटुंब चालते, परंतु मागच्या काही दिवसांपासून वेशभूषेकडे पाहून आम्हाला मुले पळविणारी टोळी समजून मारहाण केली जात आहे. त्यामुळे आता झोपडीबाहेर पडायचीसुद्धा भीती वाटत आहे. झोपडीत बसलं तर उपाशी आणि बाहेर पडलं तर मरणाची भीती, असा जगण्यातील रोजचा संघर्ष डबडबलेल्या डोळ्यांनी भटक्या समाजातील नागरिकांनी ‘लोकमत’जवळ मांडला.मागील काही महिन्यांपासून मुले पळविणारी टोळी समजून भिक्षुकी, भिकारी, भंगारवाले, गोसावी आदी भटक्या समाजातील नागरिकांसह परराज्यातून आलेल्या लोकांना मारहाण करण्याच्या घटना वाढल्या आहेत. धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे भिक्षुकी करणाऱ्या पाच जणांना जमावाने ठेचून मारल्याची घटना नुकतीच घडली आहे. त्यामुळे भटक्या समाजातील लोक अक्षरश: जीव मुठीत घेऊन जगत आहेत.याच प्रश्नावर बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर अ.भा. बलुतेदार आलुतेदार विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली विविध संघटना, समाजातील नागरिकांनी गुरुवारी मोर्चा काढला. मोर्चा संपल्यानंतर जमलेल्या विविध समाजातील नागरिकांसोबत ‘लोकमत’ने संवाद साधला.घटनेनंतर दोन दिवस आमच्या घरातील एकही जण बाहेर पडला नाही. त्यामुळे उपाशीपोटी झोपावे लागले, असे त्यांनी सांगितले़

टॅग्स :Beedबीडnewsबातम्या