शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
3
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
4
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
5
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
6
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
7
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
8
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
9
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
10
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
11
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
12
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
13
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
14
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
15
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
16
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
17
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
18
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
19
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
20
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त

तंटामुक्ती समित्या केवळ कागदावरच

By admin | Updated: December 4, 2014 00:55 IST

आष्टी: गाव पातळीवरील तंटे मिटावेत व शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी गृह विभागाच्या वतीने १५ आॅगस्ट २००५ साली तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात आले

आष्टी: गाव पातळीवरील तंटे मिटावेत व शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी गृह विभागाच्या वतीने १५ आॅगस्ट २००५ साली तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत समित्याही नेमण्यात आल्या. आष्टी तालुक्यातील समित्यांना मरगळ आली असून या समित्या केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात गावा दरम्यान समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समित्याअंतर्गत तंटामुक्त गावाऐवजी गावे तंटायुक्त होऊ लागली आहेत. शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाच्या अभावामुळे ही अवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे. आष्टी तालुक्यात आष्टी, अंभोरा पोलीस ठाण्यांतर्गत सव्वादोन लाख लोकसंख्या आहे. स्थानिक पातळीवर शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच भांडण तंटे होऊ नयेत यासाठी तालुक्यातील १७७ गावात तंटामुक्ती समित्यांची नेमणूक केली आहे. या समितीकरीताही सुरुवातीला अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे अंतिम टप्प्यात या अभियानाला मरगळ आली आहे. समितीच्या अध्यक्षांनी एकाही गावात वाद मिटविण्याचे काम न केल्याने तंटामुक्त गावाऐवजी तंटायुक्त गाव अभियानच राबविले जात आहे.अभियानांतर्गत शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन किंवा ठाणे हद्दीतील ठाणे प्रमुखाने गावात किमान आठवड्यातून एक दिवस जाऊन तंटामुक्ती समितीची बैठक घेणे अनिवार्य होते. असे असतानाही एकाही अधिकाऱ्याने या नियमाचे पालन केले नाही.त्यामुळे या गावातील शेतीचे वाद, किरकोळ भांडणे, भाऊबंदकीचे वाद, घरगुती वाद या घटना गावात घडतच राहिल्या. त्यामुळे या अभियानाचा तालुक्यात पुरता बोजवारा उडाला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात तंटामुक्तीसाठी प्रभावी अभियान राबविण्यासाठी समित्यांची बैठक घेऊन पुन:संजीवनी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादा जगताप, संजय खंडागळे यांनी केली आहे. गत महिन्यातच तंटामुक्त गावांना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील गावांचा समाधानकारक सहभाग नव्हता. तालुक्यात तंटामुक्त अभियान कार्यान्वीत करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते धडपड करीत आहेत. मात्र लोकप्रतिनिधी व पोलीस अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत नसल्याचेही येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. (वार्ताहर)