शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
2
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
3
Operation Sindoor Live Updates: 'पाकिस्तानला मेसेज मिळालाय, आता थेट तुमच्या मुख्यालयावरच हल्ला करू'
4
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
5
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
6
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?
7
हृदयद्रावक! पत्नी आणि २ महिन्यांच्या मुलाला मारुन पतीने संपवलं जीवन; मेसेजमध्ये मांडली व्यथा
8
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
9
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
10
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
11
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
12
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
13
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
14
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
15
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
16
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
17
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
18
'मदर्स डे'निमित्त मराठी कलाकारांनी व्यक्त केलं आईवरचं प्रेम, शेअर केले खास फोटो
19
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
20
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय

तंटामुक्ती समित्या केवळ कागदावरच

By admin | Updated: December 4, 2014 00:55 IST

आष्टी: गाव पातळीवरील तंटे मिटावेत व शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी गृह विभागाच्या वतीने १५ आॅगस्ट २००५ साली तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात आले

आष्टी: गाव पातळीवरील तंटे मिटावेत व शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी गृह विभागाच्या वतीने १५ आॅगस्ट २००५ साली तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत समित्याही नेमण्यात आल्या. आष्टी तालुक्यातील समित्यांना मरगळ आली असून या समित्या केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात गावा दरम्यान समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समित्याअंतर्गत तंटामुक्त गावाऐवजी गावे तंटायुक्त होऊ लागली आहेत. शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाच्या अभावामुळे ही अवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे. आष्टी तालुक्यात आष्टी, अंभोरा पोलीस ठाण्यांतर्गत सव्वादोन लाख लोकसंख्या आहे. स्थानिक पातळीवर शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच भांडण तंटे होऊ नयेत यासाठी तालुक्यातील १७७ गावात तंटामुक्ती समित्यांची नेमणूक केली आहे. या समितीकरीताही सुरुवातीला अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे अंतिम टप्प्यात या अभियानाला मरगळ आली आहे. समितीच्या अध्यक्षांनी एकाही गावात वाद मिटविण्याचे काम न केल्याने तंटामुक्त गावाऐवजी तंटायुक्त गाव अभियानच राबविले जात आहे.अभियानांतर्गत शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन किंवा ठाणे हद्दीतील ठाणे प्रमुखाने गावात किमान आठवड्यातून एक दिवस जाऊन तंटामुक्ती समितीची बैठक घेणे अनिवार्य होते. असे असतानाही एकाही अधिकाऱ्याने या नियमाचे पालन केले नाही.त्यामुळे या गावातील शेतीचे वाद, किरकोळ भांडणे, भाऊबंदकीचे वाद, घरगुती वाद या घटना गावात घडतच राहिल्या. त्यामुळे या अभियानाचा तालुक्यात पुरता बोजवारा उडाला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात तंटामुक्तीसाठी प्रभावी अभियान राबविण्यासाठी समित्यांची बैठक घेऊन पुन:संजीवनी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादा जगताप, संजय खंडागळे यांनी केली आहे. गत महिन्यातच तंटामुक्त गावांना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील गावांचा समाधानकारक सहभाग नव्हता. तालुक्यात तंटामुक्त अभियान कार्यान्वीत करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते धडपड करीत आहेत. मात्र लोकप्रतिनिधी व पोलीस अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत नसल्याचेही येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. (वार्ताहर)