शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

तंटामुक्ती समित्या केवळ कागदावरच

By admin | Updated: December 4, 2014 00:55 IST

आष्टी: गाव पातळीवरील तंटे मिटावेत व शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी गृह विभागाच्या वतीने १५ आॅगस्ट २००५ साली तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात आले

आष्टी: गाव पातळीवरील तंटे मिटावेत व शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी गृह विभागाच्या वतीने १५ आॅगस्ट २००५ साली तंटामुक्त गाव अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत समित्याही नेमण्यात आल्या. आष्टी तालुक्यातील समित्यांना मरगळ आली असून या समित्या केवळ कागदावरच असल्याचे दिसून येत आहे.तालुक्यात गावा दरम्यान समित्या नेमण्यात आल्या आहेत. या समित्याअंतर्गत तंटामुक्त गावाऐवजी गावे तंटायुक्त होऊ लागली आहेत. शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन यांच्या मार्गदर्शनाच्या अभावामुळे ही अवस्था झाली असल्याचे दिसून येत आहे. आष्टी तालुक्यात आष्टी, अंभोरा पोलीस ठाण्यांतर्गत सव्वादोन लाख लोकसंख्या आहे. स्थानिक पातळीवर शांतता, सुव्यवस्था अबाधित रहावी तसेच भांडण तंटे होऊ नयेत यासाठी तालुक्यातील १७७ गावात तंटामुक्ती समित्यांची नेमणूक केली आहे. या समितीकरीताही सुरुवातीला अध्यक्षपदावरून वाद निर्माण झाला होता. त्यामुळे अंतिम टप्प्यात या अभियानाला मरगळ आली आहे. समितीच्या अध्यक्षांनी एकाही गावात वाद मिटविण्याचे काम न केल्याने तंटामुक्त गावाऐवजी तंटायुक्त गाव अभियानच राबविले जात आहे.अभियानांतर्गत शासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन किंवा ठाणे हद्दीतील ठाणे प्रमुखाने गावात किमान आठवड्यातून एक दिवस जाऊन तंटामुक्ती समितीची बैठक घेणे अनिवार्य होते. असे असतानाही एकाही अधिकाऱ्याने या नियमाचे पालन केले नाही.त्यामुळे या गावातील शेतीचे वाद, किरकोळ भांडणे, भाऊबंदकीचे वाद, घरगुती वाद या घटना गावात घडतच राहिल्या. त्यामुळे या अभियानाचा तालुक्यात पुरता बोजवारा उडाला असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात तंटामुक्तीसाठी प्रभावी अभियान राबविण्यासाठी समित्यांची बैठक घेऊन पुन:संजीवनी देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादा जगताप, संजय खंडागळे यांनी केली आहे. गत महिन्यातच तंटामुक्त गावांना बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील गावांचा समाधानकारक सहभाग नव्हता. तालुक्यात तंटामुक्त अभियान कार्यान्वीत करण्यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते धडपड करीत आहेत. मात्र लोकप्रतिनिधी व पोलीस अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभत नसल्याचेही येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले. (वार्ताहर)