शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

टँकर मंजुरी, तपासणी संदर्भात सीईओंनी व्यक्त केली शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:02 IST

जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यासाठी आज घडीला जवळपास ४७० पेक्षा अधिक टँकर सुरु आहेत. मात्र यापैकी अनेक टँकरची नियमीत तपासणी होत नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासंदर्भात बीडसह इतर उप विभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून टँकर मंजुरी व सुरु असलेल्या टँकरची तपासणी नियमित होत नसल्याबाबत शंका व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देनियमित तपासणी नाही : कंत्राटदारांनी नियम बसवले धाब्यावर

बीड : जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यासाठी आज घडीला जवळपास ४७० पेक्षा अधिक टँकर सुरु आहेत. मात्र यापैकी अनेक टँकरची नियमीत तपासणी होत नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासंदर्भात बीडसह इतर उप विभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून टँकर मंजुरी व सुरु असलेल्या टँकरची तपासणी नियमित होत नसल्याबाबत शंका व्यक्त केली आहे.जिल्ह्यातील ३८५ गावे, १५३ वाड्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र टँकर लॉबीकडून पुर्वीप्रमाणे भ्रष्टाचार सुरु केल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. अनेक गावांध्ये पाणी आणण्याचे अंतर वाढवण्यात आले आहे. तसेच गावांध्ये टँकरच्या मंजूर असलेल्या खेपांपेक्षा कमी खेपा टाकल्या जात असल्याची तक्रार देखील नागरिकांमधून केली जात आहे. मात्र प्रशासनाचे या बाबींकडे दुर्लक्ष होत असून, टँकर लॉबीकडून नागरिकांना योग्य सुविधा न देता शासनाच्या पैशावर डल्ला मारण्याचे काम सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.टँकर ज्या ठिकाणाहून पाणी आणते त्या ठिकाणाची तपासणी केले जाते का ? तेथील पाण्यात टीसीएल पावडर टाकून ते शुध्द करुन घेण्यात येते का ? पाणीपुरवठा करणारे टँकर स्वच्छ असल्याबाबत खात्री करण्यात येते का ? टँकरच्या नियोजित फेऱ्या होतात का ? टँकर वाहन क्षमतेप्रमाणे प्रत्यक्षात पाणीपुरवठा केला जाता का ? लॉगबुक तपासले जाते का ? जीपीएस विहीर अधिग्रहणाची संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बीडीओ यांचे काटेकोर नियंत्रण आवश्यक आहे. मात्र, टँकरची वाढती संख्या लक्षात घेऊन तपासणी नियमित होत नसावी अशी शंका जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून व्यक्त केली आहे. प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी टँकर संदर्भातील अहवाल सकाळी १० वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.जीपीएस प्रणाली नाहीचपाणीपुरवठा करणारे टँकर किती अंतरावर गेले व आले तसेच किती फेºया झाल्या हे समजण्यासाठी जीपीएस प्रणाली लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, बहुतांश टँकरवर ही प्रणाली लावली नाही, त्यासाठी विविध कारणे सांगूण जीपीस लावण्यास टाळाटाळ केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र ज्या वेळी टँकरचे बीलं काढायचे आहेत त्यावेळी जीपीएस प्रमाणेच फेºया मोजून देयके अदा करण्याची मगणी नागरिकांमधून केली जात आहे.

 

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदwater transportजलवाहतूक