शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

टँकर मंजुरी, तपासणी संदर्भात सीईओंनी व्यक्त केली शंका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 00:02 IST

जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यासाठी आज घडीला जवळपास ४७० पेक्षा अधिक टँकर सुरु आहेत. मात्र यापैकी अनेक टँकरची नियमीत तपासणी होत नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासंदर्भात बीडसह इतर उप विभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून टँकर मंजुरी व सुरु असलेल्या टँकरची तपासणी नियमित होत नसल्याबाबत शंका व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देनियमित तपासणी नाही : कंत्राटदारांनी नियम बसवले धाब्यावर

बीड : जिल्ह्यात पाणीपुरवठा करण्यासाठी आज घडीला जवळपास ४७० पेक्षा अधिक टँकर सुरु आहेत. मात्र यापैकी अनेक टँकरची नियमीत तपासणी होत नसल्याची बाब समोर आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासंदर्भात बीडसह इतर उप विभागीय अधिकाऱ्यांना पत्र लिहून टँकर मंजुरी व सुरु असलेल्या टँकरची तपासणी नियमित होत नसल्याबाबत शंका व्यक्त केली आहे.जिल्ह्यातील ३८५ गावे, १५३ वाड्यामध्ये टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र टँकर लॉबीकडून पुर्वीप्रमाणे भ्रष्टाचार सुरु केल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत आहे. अनेक गावांध्ये पाणी आणण्याचे अंतर वाढवण्यात आले आहे. तसेच गावांध्ये टँकरच्या मंजूर असलेल्या खेपांपेक्षा कमी खेपा टाकल्या जात असल्याची तक्रार देखील नागरिकांमधून केली जात आहे. मात्र प्रशासनाचे या बाबींकडे दुर्लक्ष होत असून, टँकर लॉबीकडून नागरिकांना योग्य सुविधा न देता शासनाच्या पैशावर डल्ला मारण्याचे काम सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.टँकर ज्या ठिकाणाहून पाणी आणते त्या ठिकाणाची तपासणी केले जाते का ? तेथील पाण्यात टीसीएल पावडर टाकून ते शुध्द करुन घेण्यात येते का ? पाणीपुरवठा करणारे टँकर स्वच्छ असल्याबाबत खात्री करण्यात येते का ? टँकरच्या नियोजित फेऱ्या होतात का ? टँकर वाहन क्षमतेप्रमाणे प्रत्यक्षात पाणीपुरवठा केला जाता का ? लॉगबुक तपासले जाते का ? जीपीएस विहीर अधिग्रहणाची संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बीडीओ यांचे काटेकोर नियंत्रण आवश्यक आहे. मात्र, टँकरची वाढती संख्या लक्षात घेऊन तपासणी नियमित होत नसावी अशी शंका जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना पत्र पाठवून व्यक्त केली आहे. प्रत्येक आठवड्याच्या सोमवारी टँकर संदर्भातील अहवाल सकाळी १० वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत.जीपीएस प्रणाली नाहीचपाणीपुरवठा करणारे टँकर किती अंतरावर गेले व आले तसेच किती फेºया झाल्या हे समजण्यासाठी जीपीएस प्रणाली लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, बहुतांश टँकरवर ही प्रणाली लावली नाही, त्यासाठी विविध कारणे सांगूण जीपीस लावण्यास टाळाटाळ केली जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. मात्र ज्या वेळी टँकरचे बीलं काढायचे आहेत त्यावेळी जीपीएस प्रमाणेच फेºया मोजून देयके अदा करण्याची मगणी नागरिकांमधून केली जात आहे.

 

टॅग्स :Beedबीडzpजिल्हा परिषदwater transportजलवाहतूक