शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

टँकर लॉबीचा डाव अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी उधळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:16 IST

जिल्ह्यातील दुष्काळ व पाणीटंचाईचा फायदा घेण्यासाठी व पाण्यावर पैसे कमावण्याचा टँकर लॉबीचा डाव अखेर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी उधळून लावला. चढ्या दराने दाखल करण्यात आलेल्या पाणी वाहतुकीच्या तिन्ही निविदा रद्द करत निविदा प्रक्रि या नव्याने करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा प्रशासनाने घेतला. यासंदर्भात ‘लोकमत’ने मंगळवारच्या मुख्य अंकात वृत्त प्रसिद्ध करून पाण्याचा हा गोरखधंदा उघडकीस आणला होता.

ठळक मुद्देपाणी वाहतूक : चढ्या दराने भरल्या होत्या निविदा; निर्णयाचे स्वागत

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यातील दुष्काळ व पाणीटंचाईचा फायदा घेण्यासाठी व पाण्यावर पैसे कमावण्याचा टँकर लॉबीचा डाव अखेर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी उधळून लावला. चढ्या दराने दाखल करण्यात आलेल्या पाणी वाहतुकीच्या तिन्ही निविदा रद्द करत निविदा प्रक्रि या नव्याने करण्याचा निर्णय मंगळवारी जिल्हा प्रशासनाने घेतला. यासंदर्भात ‘लोकमत’ने मंगळवारच्या मुख्य अंकात वृत्त प्रसिद्ध करून पाण्याचा हा गोरखधंदा उघडकीस आणला होता.बीड जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीच्या पाशर््वभूमीवर टँकर लॉबी सक्रिय झाली आहे. प्रशासनाने पाणी पुरवठा करण्यासाठी टँकरच्या निविदा मागविल्या होत्या. बीड जिल्ह्यात यावेळी टँकरची संख्या एक हजाराच्या पुढे जाईल, अशी शक्यता असल्याने पाणी वाहतुकीत मोठ्या प्रमाणावर मलिदा मिळणार हे स्पष्ट होते. त्यामुळे वाहतूक कंत्राटदारांनी शासकीय नियमापेक्षा तब्बल ७० टक्के अधिक दराने निविदा भरल्या होत्या. त्या निविदा रद्द करण्याची तरतूद असतानाही या निविदासंदर्भात नगर जिल्ह्याप्रमाणेच शासनाकडून मार्गदर्शन मागवावे, यासाठी टँकर लॉबीने प्रयत्न सुरू केले होते. चढ्या दराने निविदा मंजूर झाल्या असत्या तर पुढील ६ महिन्यात शासनाचे तब्बल १०० कोटी रु पये अधिकचे खर्च झाले असते. या निर्णयामुळे शासनाचा फायदा होणार आहे. मात्र ज्या गावात पाणी पुरवठा टँकरची नितांत गरज आहे, अशा गावांना मात्र या निविदा प्रकरणामुळे टँकर मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ तोडगा काढण्याची मागणी होत आहे. तसेच चढ्या दराने भरलेल्या निविदा रद्द केल्यामुळे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्या निर्णयाचे स्वागत सर्व स्तरातून केले जात आहे.बीड जिल्ह्यात तीव्र दुष्काळ जाहीर झाला आहे. अत्यल्प पाऊस झाल्यामुळे पाणवठे कोरडे पडू लागले असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न डिसेंबर महिन्यातच भेडसावू लागला आहे. अनेक गावांत पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. चारा आणि पाण्याअभावी जनावरांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत लोकांना पिण्याचे पाणी मिळावे म्हणून टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी ह्या निविदा मागविल्या होत्या.

टॅग्स :Beedबीडcollectorजिल्हाधिकारीwater transportजलवाहतूक