शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

आधी माहिती घ्या, मगच वक्तव्य करा; सुरेश धस यांचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:26 IST

उडीद खरेदी संबंधी काहीही जबाबदारी नसताना राष्ट्रवादीच्या ‘नवीन’ नेत्यांनी संचालक मंडळाचे कपडे फाडण्याची भाषा केली आहे. या नेत्यांनी याची माहिती घ्यावी आणि नंतर असे वक्तव्य करावे. तसेच कपडे फाडायला आल्यावर संचालकांना हात नाहीत काय ? असा टोला माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी बाळासाहेब आजबे यांचे नाव न घेता लगावला.

ठळक मुद्देकपडे फाडायला आल्यावर संचालक मंडळाला हात नाहीत काय ?

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : शासनाने उडीद आॅनलाईन नोंदणी करूनच खरेदी करण्याने शेतक-यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतक-यांना मदत व्हावी यासाठी कडा मार्केट कमिटीमध्ये आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी बीडच्या एजन्सीला जागा देण्याचे काम मार्केट कमिटीने केले आहे. उडीद खरेदी संबंधी काहीही जबाबदारी नसताना राष्ट्रवादीच्या ‘नवीन’ नेत्यांनी संचालक मंडळाचे कपडे फाडण्याची भाषा केली आहे. या नेत्यांनी याची माहिती घ्यावी आणि नंतर असे वक्तव्य करावे. तसेच कपडे फाडायला आल्यावर संचालकांना हात नाहीत काय ? असा टोला माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी बाळासाहेब आजबे यांचे नाव न घेता लगावला.

आष्टी उपबाजार पेठ येथे एका दुकानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री सुरेश धस बोलत होते. यावेळी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, उप सभापती राजेंद्र दहातोंडे, अनिल ढोबळे, युवराज पाटील, सतिश धस, राम मधुरकर यांच्यासह आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना धस म्हणाले, कडा मार्केट कमिटीमध्ये अत्यंत चांगला कारभार चालू असून काटकसर करण्यासाठी बैठकीत चहापानाचाही खर्च केला जात नाही. तसेच आष्टी उपबाजार पेठेसाठीच्या जागेसंबंधी न्यायिक प्रक्रिया सुरु असल्याने संबंधित जागेचा ३ कोटी रुपयांचा मोबदला देण्यासाठी कारवाई सुरु आहे.

त्यासाठी लवकरच पालकमंत्री पंकजा मुंडे, पणन मंत्री सुभाष देशमुख, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या बैठकीला बाजार समिती सभापती, उपसभापती आणि सर्व संचालक मुंबईला जाणार आहेत. आष्टी उपबाजार पेठेत आणखी व्यापारी गाळे देण्यात येणार असून फक्त या ठिकाणी केवळ व्यापारच करावा लागणार आहे. यासाठी कडा, जामखेड, करमाळा या ठिकाणच्या व्यापा-यांनी आष्टी येथे यावे असे त्यांनी सांगितले.अभ्यास करून बोला....नव्यानेच राष्ट्रवादीत गेलेल्या नेत्यांना आपण काहीतरी शेतक-यांसाठी करीत आहोत, असे दाखविण्यासाठी आपली भाषा मगरुरीची वापरत आहे. बाजार समितीत मोर्चा नेऊन संचालकांचे कपडे फाडू असे वक्तव्य केले. परंतु त्या टॅम्पोभर नेत्यांनी अभ्यासपूर्वक बोलावे असा टोला सुरेश धस यांनी बाळासाहेब आजबे यांचे नाव न घेता लगावला.

सर्वात जास्त दराने कांदा खरेदीकडा बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वात जादा असलेल्या ५५ रुपये प्रतिक्विंटल या भावाने खरेदी झाली आहे. लासलगाव, करमाळा, सोलापूर या पेक्षाही या ठिकाणी जादा भाव शेतक-यांना देण्यात आल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.