शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

आधी माहिती घ्या, मगच वक्तव्य करा; सुरेश धस यांचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:26 IST

उडीद खरेदी संबंधी काहीही जबाबदारी नसताना राष्ट्रवादीच्या ‘नवीन’ नेत्यांनी संचालक मंडळाचे कपडे फाडण्याची भाषा केली आहे. या नेत्यांनी याची माहिती घ्यावी आणि नंतर असे वक्तव्य करावे. तसेच कपडे फाडायला आल्यावर संचालकांना हात नाहीत काय ? असा टोला माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी बाळासाहेब आजबे यांचे नाव न घेता लगावला.

ठळक मुद्देकपडे फाडायला आल्यावर संचालक मंडळाला हात नाहीत काय ?

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : शासनाने उडीद आॅनलाईन नोंदणी करूनच खरेदी करण्याने शेतक-यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतक-यांना मदत व्हावी यासाठी कडा मार्केट कमिटीमध्ये आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी बीडच्या एजन्सीला जागा देण्याचे काम मार्केट कमिटीने केले आहे. उडीद खरेदी संबंधी काहीही जबाबदारी नसताना राष्ट्रवादीच्या ‘नवीन’ नेत्यांनी संचालक मंडळाचे कपडे फाडण्याची भाषा केली आहे. या नेत्यांनी याची माहिती घ्यावी आणि नंतर असे वक्तव्य करावे. तसेच कपडे फाडायला आल्यावर संचालकांना हात नाहीत काय ? असा टोला माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी बाळासाहेब आजबे यांचे नाव न घेता लगावला.

आष्टी उपबाजार पेठ येथे एका दुकानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री सुरेश धस बोलत होते. यावेळी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, उप सभापती राजेंद्र दहातोंडे, अनिल ढोबळे, युवराज पाटील, सतिश धस, राम मधुरकर यांच्यासह आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना धस म्हणाले, कडा मार्केट कमिटीमध्ये अत्यंत चांगला कारभार चालू असून काटकसर करण्यासाठी बैठकीत चहापानाचाही खर्च केला जात नाही. तसेच आष्टी उपबाजार पेठेसाठीच्या जागेसंबंधी न्यायिक प्रक्रिया सुरु असल्याने संबंधित जागेचा ३ कोटी रुपयांचा मोबदला देण्यासाठी कारवाई सुरु आहे.

त्यासाठी लवकरच पालकमंत्री पंकजा मुंडे, पणन मंत्री सुभाष देशमुख, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या बैठकीला बाजार समिती सभापती, उपसभापती आणि सर्व संचालक मुंबईला जाणार आहेत. आष्टी उपबाजार पेठेत आणखी व्यापारी गाळे देण्यात येणार असून फक्त या ठिकाणी केवळ व्यापारच करावा लागणार आहे. यासाठी कडा, जामखेड, करमाळा या ठिकाणच्या व्यापा-यांनी आष्टी येथे यावे असे त्यांनी सांगितले.अभ्यास करून बोला....नव्यानेच राष्ट्रवादीत गेलेल्या नेत्यांना आपण काहीतरी शेतक-यांसाठी करीत आहोत, असे दाखविण्यासाठी आपली भाषा मगरुरीची वापरत आहे. बाजार समितीत मोर्चा नेऊन संचालकांचे कपडे फाडू असे वक्तव्य केले. परंतु त्या टॅम्पोभर नेत्यांनी अभ्यासपूर्वक बोलावे असा टोला सुरेश धस यांनी बाळासाहेब आजबे यांचे नाव न घेता लगावला.

सर्वात जास्त दराने कांदा खरेदीकडा बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वात जादा असलेल्या ५५ रुपये प्रतिक्विंटल या भावाने खरेदी झाली आहे. लासलगाव, करमाळा, सोलापूर या पेक्षाही या ठिकाणी जादा भाव शेतक-यांना देण्यात आल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.