शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

आधी माहिती घ्या, मगच वक्तव्य करा; सुरेश धस यांचा पलटवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:26 IST

उडीद खरेदी संबंधी काहीही जबाबदारी नसताना राष्ट्रवादीच्या ‘नवीन’ नेत्यांनी संचालक मंडळाचे कपडे फाडण्याची भाषा केली आहे. या नेत्यांनी याची माहिती घ्यावी आणि नंतर असे वक्तव्य करावे. तसेच कपडे फाडायला आल्यावर संचालकांना हात नाहीत काय ? असा टोला माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी बाळासाहेब आजबे यांचे नाव न घेता लगावला.

ठळक मुद्देकपडे फाडायला आल्यावर संचालक मंडळाला हात नाहीत काय ?

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : शासनाने उडीद आॅनलाईन नोंदणी करूनच खरेदी करण्याने शेतक-यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतक-यांना मदत व्हावी यासाठी कडा मार्केट कमिटीमध्ये आॅनलाईन नोंदणी करण्यासाठी बीडच्या एजन्सीला जागा देण्याचे काम मार्केट कमिटीने केले आहे. उडीद खरेदी संबंधी काहीही जबाबदारी नसताना राष्ट्रवादीच्या ‘नवीन’ नेत्यांनी संचालक मंडळाचे कपडे फाडण्याची भाषा केली आहे. या नेत्यांनी याची माहिती घ्यावी आणि नंतर असे वक्तव्य करावे. तसेच कपडे फाडायला आल्यावर संचालकांना हात नाहीत काय ? असा टोला माजी राज्यमंत्री सुरेश धस यांनी बाळासाहेब आजबे यांचे नाव न घेता लगावला.

आष्टी उपबाजार पेठ येथे एका दुकानाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात माजी राज्यमंत्री सुरेश धस बोलत होते. यावेळी कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रमजान तांबोळी, उप सभापती राजेंद्र दहातोंडे, अनिल ढोबळे, युवराज पाटील, सतिश धस, राम मधुरकर यांच्यासह आदि उपस्थित होते.

पुढे बोलतांना धस म्हणाले, कडा मार्केट कमिटीमध्ये अत्यंत चांगला कारभार चालू असून काटकसर करण्यासाठी बैठकीत चहापानाचाही खर्च केला जात नाही. तसेच आष्टी उपबाजार पेठेसाठीच्या जागेसंबंधी न्यायिक प्रक्रिया सुरु असल्याने संबंधित जागेचा ३ कोटी रुपयांचा मोबदला देण्यासाठी कारवाई सुरु आहे.

त्यासाठी लवकरच पालकमंत्री पंकजा मुंडे, पणन मंत्री सुभाष देशमुख, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या बैठकीला बाजार समिती सभापती, उपसभापती आणि सर्व संचालक मुंबईला जाणार आहेत. आष्टी उपबाजार पेठेत आणखी व्यापारी गाळे देण्यात येणार असून फक्त या ठिकाणी केवळ व्यापारच करावा लागणार आहे. यासाठी कडा, जामखेड, करमाळा या ठिकाणच्या व्यापा-यांनी आष्टी येथे यावे असे त्यांनी सांगितले.अभ्यास करून बोला....नव्यानेच राष्ट्रवादीत गेलेल्या नेत्यांना आपण काहीतरी शेतक-यांसाठी करीत आहोत, असे दाखविण्यासाठी आपली भाषा मगरुरीची वापरत आहे. बाजार समितीत मोर्चा नेऊन संचालकांचे कपडे फाडू असे वक्तव्य केले. परंतु त्या टॅम्पोभर नेत्यांनी अभ्यासपूर्वक बोलावे असा टोला सुरेश धस यांनी बाळासाहेब आजबे यांचे नाव न घेता लगावला.

सर्वात जास्त दराने कांदा खरेदीकडा बाजार समितीमध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वात जादा असलेल्या ५५ रुपये प्रतिक्विंटल या भावाने खरेदी झाली आहे. लासलगाव, करमाळा, सोलापूर या पेक्षाही या ठिकाणी जादा भाव शेतक-यांना देण्यात आल्याचे सुरेश धस यांनी सांगितले.