शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

बॅंकेतील पैसे सांभाळा, ‘केवायसी’च्या नावाखाली होऊ शकते फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST

प्रभात बुडूख बीड : मोबाइलचा वापर वाढल्याने नेट बँकिंगचे प्रमाणदेखील वाढले आहे. यासाठी शासनाकडूनदेखील प्रोत्साहन देण्यात आले होते. दरम्यान, ...

प्रभात बुडूख

बीड : मोबाइलचा वापर वाढल्याने नेट बँकिंगचे प्रमाणदेखील वाढले आहे. यासाठी शासनाकडूनदेखील प्रोत्साहन देण्यात आले होते. दरम्यान, विविध प्रकारे बँकेसंदर्भातील माहिती विचारून घेत लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे बँकेतील पैसे लंपास होऊ नयेत यासाठी योग्य ती काळजी सर्वांनी घेणे गरजेचे आहे.

मोबाइलवर अनोळखी फोनद्वारे अनेकांच्या बँक खात्यातली रक्कम गायब झाल्याचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा सर्वाधिक समावेश आहे. यावेळी बँकेतून बोलत असून, तुमच्या खात्यासंदर्भात माहिती द्यावी असे सांगून त्यांच्या खात्यातून पैसे वळते करून घेतल्याचे प्रकारदेखील घडले आहेत. या प्रकरणांचा तपास सायबर विभागाकडून केला जात असून, काही प्रकरणांत आरोपींना पकडण्यात त्यांना यशदेखील आले आहे. मात्र, अशा प्रकारे फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन वेळोवेळी बँक व पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

प्रकरण १

एका विद्यार्थिनीला ‘फोन पे’ या ॲपच्या कस्टमर केअर सेंटरमधून बोलत असल्याचा फोन आला होता. त्यानंतर त्या विद्यार्थिनीने पैसे पाठविण्यासाठी येत असलेल्या अडचणी पुढील व्यक्तीला सांगितल्या. दरम्यान, त्याने सर्व माहिती विचारून घेत तिच्या खात्यावरून ४५ हजार रुपये वळते करून घेतले. हा कस्टमर केअर नंबर गुगलवरून त्या विद्यार्थिनीने घेतला होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

प्रकरण २

तुमच्या बँकेतून बोलत आहे. शासनाच्या नवीन नियमानुसार खाते अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी आपले एटीएम कार्ड नंबर व बँक डिटेल्स पाहिजे असल्याची विचारणा करून एका शेतकऱ्याची ५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. बँकेत गेल्यानंतर खात्यावरील रक्कम लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.

प्रकरण ३

विविध तीन बँकेच्या खात्यातून ७५ हजार रुपये काढून घेतले होते. ही घटना बीड व अंबाजोगाई येथे घडली होता. एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याच्या खात्यातून ही रक्कम वळती कशी झाली, हे उघड झाले नाही. यासंदर्भात त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस करीत आहेत.

गेलेले पैसे परत मिळणे कठीण

फोनद्वारे बँक डिटेल्स विचारून केलेल्या फसवणुकीतील पैसे परत मिळविण्यासाठी संबंधितांना बँक, पोलीस ठाण्याच्या अनेक चकरा माराव्या लागतात. मात्र, या प्रकरणांमध्ये पैसे परत मिळण्याची शक्यता नसते, तर एटीएम क्लोनिंग व इतर काही प्रकरणांत मात्र बँकेकडून पैसे परत मिळालेले आहेत.

नागरिकांनी कोणत्याही अनोळखी नंबरवरून फोन आल्यानंतर बँकेसंदर्भातील माहिती देऊ नये, तसेच नेट बँकिंगसंदर्भातील खात्याची माहितीदेखील गोपनीय ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन बीड पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.