शहरं
Join us  
Trending Stories
1
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
2
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
3
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
4
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
5
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
6
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
7
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
8
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
9
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
10
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
11
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
12
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
13
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
14
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
15
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
16
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
17
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
18
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
19
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
20
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही

मुक्या जनावरांची काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST

धोकादायक पुलाला कठडे बसवावेत वडवणी : तालुक्यात अनेक नदी, नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने ...

धोकादायक पुलाला कठडे बसवावेत

वडवणी : तालुक्यात अनेक नदी, नाल्यांवर पुलांचे बांधकाम झाले आहे. मात्र, पुलाला संरक्षण कठडे नसल्याने अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे या पुलांवर कठडे लावण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, वडवणी कवडगाव रस्त्यावर खड्डे पडले असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. मुख्य रस्त्यावर मामला तलावनजीक जुना पूल धोकादायक बनला असून, पुलाचे कठडे तुटले आहेत. तसेच ग्रामीण भागातील नदी, नाल्यांवर संरक्षक कठडे तुटले असून, काही चोरीलाही गेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन नव्याने कठडे बांधावेत, अशी मागणी ओमराजे जाधव यांनी यांनी केली आहे.

बाजारात गर्दी; सामाजिक अंतर दिसेना

वडवणी : खरीप हंगामातील पेरण्या झाल्या आहेत. पिकांची उगवण झाली आहे. शेतकरी तयारीला लागले असून, शेतकरी कृषी दुकानात गर्दी करीत असून कापूस, सोयाबीन, तूर, मूग, या पिकांच्या खत खरेदीसाठी ते गर्दी करीत आहेत. यामुळे सामाजिक अंतराचा फज्जा उडाला आहे.

वाळलेले वृक्ष बनले धोकादायक

वडवणी : तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना जोडल्या जाणाऱ्या रस्त्याने दोन्ही बाजूला जुने वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. ही वृक्ष वाळलेले असल्याने जोरदार वारा सुटला की धोकादायक बनले आहेत. त्यामुळे मामला तलावाच्या काठावरील वाळलेले जुने वृक्ष काढण्याची गरज आहे.

नाली सफाई कामे रखडली

बीड : शहरातील मुख्य रस्त्याच्या व पोलीस ठाण्याच्या मागच्या प्रभागात नाली सफाई कामे रखडली असल्याने या भागात दुर्गंधी पसरली आहे. ठिकठिकाणी नाली बुजली गेल्याने दुर्गंधीचे पाणी रस्त्यावर उतरले असल्याने परिसरात नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते आहे. तत्काळ नाल्या साफ करून दुर्गंधी हटविण्याची मागणी होत आहे.

रोहित्र बनले धोकादायक

माजलगाव : शहरातील तसेच ग्रामीण भागातील गावांना वीज पुरवठा करणाऱ्या विद्युत वाहिण्या व रोहिञ उघडे असल्याने धोकादायक बनले आहेत. रोहिञाचे दरवाजे नसल्याने केबल हे जमिनीवर पसरले आहे. पावसाळ्यापूर्वी महावितरणने स्वच्छता मोहीम करणे आवश्यक बनले आहे.

उकाड्यामुळे नागरिक त्रस्त

बीड : दोन दिवसांपासून तालुक्यात कधी ढगाळ वातावरण, तर कधी कडक ऊन यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांनी कुलर, पंख्यांचा आधार घेत उकाड्यापासून सुटका करून घेतली. चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने वातावरणात बदल झाला आहे.