शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

‘स्वाभिमानी’ची १७ सप्टेंबरला आक्रोश पदयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : मागील काही दिवसांपूर्वी सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी नदी, नाले, ओढे, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : मागील काही दिवसांपूर्वी सतत पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील काही ठिकाणी नदी, नाले, ओढे, बंधारे तलाव फुटून पिकांसह शेती वाहून गेली आहे, तर, पाण्याचा निचरा झालेला नसल्यामुळे पिके पिवळी पडून त्याचे उत्पन्न अत्यल्प होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १७ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कचेरीवर ६० किलोमीटर पायी चालत आक्रोश पदयात्रा काढण्यात येणार आहे.

पदयात्रेस १५ सप्टेंबर रोजी वडवणी तालुक्यातून सुरुवात होणार असून, ही शेतकऱ्यांची आक्रोश पदयात्रा १७ सप्टेंबर रोजी जिल्हा कचेरीवर धडकणार आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई मिळावी यासह इतर मागण्यांसाठी ही पदयात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर करपे यांनी विविध गावांमध्ये जनजागृती सभा घेतली असून, मोठ्या संख्येने या मोर्चात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले आहे.

...

या मार्गावरून निघणार पदयात्रा

१५ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता सुर्डी थोट येथून या आक्रोश पदयात्रेला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पिंपळादेवी, लिंबारुई, पाटेगाव, बेडकूचिवडी, पिंपळनेर, बेलवाडी, बाभूळवाडी, ईट, म्हाळसापूर, जवळा, खांडेपारगाव, उमरी फाटा, अंथरवन पिंपरी येथे मुक्काम होणार आहे. १७ सप्टेंबर सकाळी ७ वाजता अंथरवणपिंपरी (ता. जि.बीड) यामार्गे बीड शहरातील खंडेश्वरी मंदिर, आकाशवाणी, जुना मोंढा, बालाजी मंदिर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, माळीवेस, बलभीम चौक, कारंजा, बशीर गंज, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, नगररोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे.