शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

बाजार आणण्यासाठी पैसे नसल्याने ईटच्या शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:42 IST

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम कर्ज बजारीपणा नापिकी यासह इतर कारणांमुळे मागील सात महिन्यात १०३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

ठळक मुद्देगुरुवारी घेतले होते विष : जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

बीड : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम कर्ज बजारीपणा नापिकी यासह इतर कारणांमुळे मागील सात महिन्यात १०३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. बीड तालुक्यातील ईट येथील एका शेतकºयाने आठवडी बाजारासाठी पैसे नसल्यामुळे मागील आठवड्यात गुरुवारी विष प्राशन केले होते. या शेतकºयाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला आहे.आसाराम रावसाहेब नरनाळे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकºयाचे नाव आहे. आसाराम हे बीड तालुक्यातील ईट येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे एक एकर शेती आहे, शेतीतील उत्पन्न व मोल-मजुरी हा महत्त्वाचा व्यवासाय होता. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतील उत्पन्नात झालेली घट, तसेच शेतातील उत्पन्न नसल्यामुळे मोल-मजूरी देखील मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे आसाराम यांना मजुरी मिळत नसल्यामुळे रोजचा खर्च भागवण्याएवढे पैसे देखील मिळत नव्हते. याच मानसिकतेमधून ते खचून गेले होते. मागील गुरुवारी पिंपळनेर येथे आठवडी बाजार होता. मात्र, खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे आसाराम यांनी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणले, त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, बुधवारी आसाराम नरनाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती गणपत डोईफोडे यांनी दिली.शासनाच्या वतीने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र, दुष्काळी परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा याला कंटाळून मागील सात महिन्यात १०३ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. यातील सर्वाची कारणे जवळपास सारखी असल्याचे दिसून येते मात्र, तरी देखील आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजना प्रभावीणपणे राबवल्या जात नसल्यामुळे आत्महत्या रोखण्यात यश येत नसल्याची तज्ज्ञांचे मत आहे. हे आत्महत्या सत्र रोखायचे असेल तर शासन व प्रशासनाकडून योग्य त्या उपायोजना संबंधीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचतात का यासाठी विशेष कार्यक्रम राबवणे गरजचे आहे. तरच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या सत्र थांबू शकते असे मत देखील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्या