शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार आणण्यासाठी पैसे नसल्याने ईटच्या शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 00:42 IST

जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम कर्ज बजारीपणा नापिकी यासह इतर कारणांमुळे मागील सात महिन्यात १०३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.

ठळक मुद्देगुरुवारी घेतले होते विष : जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

बीड : जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम कर्ज बजारीपणा नापिकी यासह इतर कारणांमुळे मागील सात महिन्यात १०३ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपवली आहे. बीड तालुक्यातील ईट येथील एका शेतकºयाने आठवडी बाजारासाठी पैसे नसल्यामुळे मागील आठवड्यात गुरुवारी विष प्राशन केले होते. या शेतकºयाचा उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला आहे.आसाराम रावसाहेब नरनाळे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकºयाचे नाव आहे. आसाराम हे बीड तालुक्यातील ईट येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडे एक एकर शेती आहे, शेतीतील उत्पन्न व मोल-मजुरी हा महत्त्वाचा व्यवासाय होता. मात्र, दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीतील उत्पन्नात झालेली घट, तसेच शेतातील उत्पन्न नसल्यामुळे मोल-मजूरी देखील मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे आसाराम यांना मजुरी मिळत नसल्यामुळे रोजचा खर्च भागवण्याएवढे पैसे देखील मिळत नव्हते. याच मानसिकतेमधून ते खचून गेले होते. मागील गुरुवारी पिंपळनेर येथे आठवडी बाजार होता. मात्र, खरेदी करण्यासाठी पैसे नसल्यामुळे आसाराम यांनी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी तात्काळ जिल्हा रुग्णालयात आणले, त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, बुधवारी आसाराम नरनाळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती बाजार समितीचे सभापती गणपत डोईफोडे यांनी दिली.शासनाच्या वतीने शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. मात्र, दुष्काळी परिस्थिती, नापिकी, कर्जबाजारीपणा याला कंटाळून मागील सात महिन्यात १०३ शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. यातील सर्वाची कारणे जवळपास सारखी असल्याचे दिसून येते मात्र, तरी देखील आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येणाºया उपाययोजना प्रभावीणपणे राबवल्या जात नसल्यामुळे आत्महत्या रोखण्यात यश येत नसल्याची तज्ज्ञांचे मत आहे. हे आत्महत्या सत्र रोखायचे असेल तर शासन व प्रशासनाकडून योग्य त्या उपायोजना संबंधीत लाभार्थ्यांपर्यंत पोहचतात का यासाठी विशेष कार्यक्रम राबवणे गरजचे आहे. तरच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या सत्र थांबू शकते असे मत देखील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Beedबीडfarmer suicideशेतकरी आत्महत्या