शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

अचानक जाग आली की, गोष्टी बदललेल्या दिसतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:33 IST

बीड : झोपेतून अचानक जाग आली की, गोष्टी बदललेल्या दिसतात. कोरोना वाढतोय. परिस्थिती नाजूक आहे. जिथं लोकांच्या जीवनमरणाचा ...

बीड : झोपेतून अचानक जाग आली की, गोष्टी बदललेल्या दिसतात. कोरोना वाढतोय. परिस्थिती नाजूक आहे. जिथं लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, तिथं कृपया राजकारण करू नका. आरोग्य यंत्रणेला सहकार्य करा, असा सल्ला बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि खा. डॉ. प्रीतम मुंडे या भगिनींना दिला आहे.

राज्य सरकारने केंद्राकडून आलेल्या दोन लाख लसींपैकी बीड जिल्ह्याला २० डोस प्राप्त झाल्यावरून माजी पालकमंत्री पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे यांच्या त्या ट्विटवरून पालकमंत्री मुंडे यांनी चांगलीच कानउघाडणी केली आहे. कोव्हॅक्सिन लसीचे जिल्ह्यात १३२९० डोस शिल्लक असून हे डोस व नवीन आलेले डोस केवळ लसीचा दुसरा डोस देण्यासाठी वापरावेत, असे केंद्र सरकारचे निर्देश आहेत. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात शिल्लक लसी व आवश्यक लसीचे प्रमाण लक्षात घेता नवीन दोन लाख लसींचे वितरण करण्यात आले आहे. धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

अनेक महिने विश्रांतीनंतर अचानक जाग आली की, बाहेरच्या अनेक गोष्टीची माहितीच नसते. केंद्राने राज्याला दिलेल्या २ लाख लसी या कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी आहेत. त्यामुळे शिल्लक लसींची माहिती घेऊन त्या प्रमाणात सर्व जिल्ह्यांना लसी वाटण्यात आल्या. हे त्यांना ज्ञात नसेल, असा खोचक टोला बहिणींना लगावला आहे.

बीड जिल्ह्यात कोव्हिशिल्डचे ६८०० व कोव्हॅक्सिनचे १३२९० डोस शिल्लक आहेत व कोव्हॅक्सिन केवळ दुसऱ्या डोससाठीच वापरावे असे केंद्राचे निर्देश आहेत. ऑक्सिजन, रेमडिसिविर तसेच लसीकरण यापैकी कोणत्याही उपाययोजनेत अडसर येऊ नये, यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत, असेही धनंजय मुंडे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले.

एक पत्र प्रधानमंत्र्यांना पण पाठवा

मुख्यमंत्र्यांना व आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिण्याऐवजी पूर्ण माहिती घेऊन एखादे पत्र पंतप्रधानांना पाठवावे व लसींचा पुरवठा वाढविण्याबाबत आग्रह धरावा, जेणेकरून कोरोनाविरुद्धच्या या लढाईत खरोखरच आपली मदत होईल! अशी विनंतीदेखील मुंडेंनी दोन्ही भगिनींना केली आहे.

बीड जिल्ह्यात जिल्ह्यात लसीकरणाचे दोन्ही कंपन्यांचे मिळून १४९४७३ नागरिकांना पहिले तर १९७३२ नागरिकांना दुसरे डोस देण्यात आले आहेत. हे प्रमाण अन्य जिल्ह्याच्या सरासरीच्या तुलनेत अधिक आहे, हेही आपल्याला ज्ञात नसेलच! राजकारण इतरत्र जरूर करा,पण कृपया जिथे लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे तिथं नको, असे भावनिक आवाहन धनजंय मुंडेंनी केले आहे.

लसींचा स्टॉक संपायच्या आत, पुढचा स्टॉक पाठविण्यात येईल व लसीकरण प्रक्रिया विनाव्यत्यय सुरू राहील, अशी माहिती आरोग्य संचालिका डॉ. अर्चना पाटील व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिसन पवार यांनी दिली आहे.