शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जयदत्त क्षीरसागरांच्या प्रयत्नाला यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2019 23:55 IST

राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यामुळे ईट येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे.

ठळक मुद्देग्रामस्थांत समाधान : ईट येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर

बीड : राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केल्यामुळे ईट येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले. यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ईट आणि परिसरातील गावात आरोग्य सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ईट येथे आरोग्य उपकेंद्र गरजेचे होते. या भागातील ग्रामस्थांच्या आग्रहावरून क्षीरसागर यांनी हे केंद्र मंजूर केल्यामुळे परिसरातील जनतेच्या आरोग्यासाठी सुविधा निर्माण झाली आहे.ईट आणि परिसरातील ७ ते ८ खेडेगावात ग्रामस्थांना आरोग्य सुविधेसाठी पिंपळनेर आणि बीड या ठिकाणी यावे लागत होते. ईट या ठिकाणी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र व्हावे, अशी मागणी या भागातून गेल्या अनेक वर्षांपासून केली जात होती. मंत्री क्षीरसागर यांनी आरोग्य मंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून ईट या ठिकाणी उपकेंद्र मंजूर करून घेतले आहे. या उपकेंद्रामुळे ईटसह जवळपासच्या गावांना आरोग्य सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याचबरोबर चौसाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे दर्जा उन्नतीकरण करून चौसाळा येथे ग्रामीण रुग्णालय करावे, असा प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. ईट या ठिकाणी उपकेंद्र मंजूर झाल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून क्षीरसागर यांच्या माध्यमातून या मागणीसह अनेक मागण्या मंजूर करून घेणार असल्याचे गणपत डोईफोडे, अरूण बोंगाणे यांनी सांगितले आहे.मंत्री जयदत्त क्षीरसागर हे लोकनेते असून त्यांच्याकडे विकासाची दृष्टी आहे. या भागातील अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. सत्ताधारी पक्षात आल्यामुळे बीड विधानसभा मतदार संघातील अनेक विकासाचे प्रश्न मार्गी लागत असल्याची चर्चा मतदारसंघातून ऐकावयास मिळत आहे.ईट येथे आरोग्य केंद्र नसल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत होती. वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे अनेकदा रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले होते. इतरत्र उपचारासाठी घेऊन जाणे अधिक खर्चाचे होते.बीड विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी कृती आराखडा बनविला आहे. यापूर्वी विरोधी पक्षात असल्यामुळे विकास कामे करताना, निधी खेचून आणताना अडचणी येत होत्या. आता सत्ताधारी पक्षात असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकास निधी मंजूर करून आणला आहे.- जयदत्त क्षीरसागर, रोहयो व फलोत्पादन मंत्री

टॅग्स :BeedबीडJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरhospitalहॉस्पिटल