शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकांविना विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:38 IST

पुरुषोत्तम करवा माजलगाव : शाळा सुरू होऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी शिकवली जात असताना विद्यार्थ्यांना अदयाप पुस्तके न मिळाल्याने आपल्याला ...

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : शाळा सुरू होऊन विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवणी शिकवली जात असताना विद्यार्थ्यांना अदयाप पुस्तके न मिळाल्याने आपल्याला काय शिकवले जात आहे, हे विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नसल्याच्या तक्रारी पालक करत आहेत. शिक्षण विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असून, पुस्तके येऊनही वाटपास टाळाटाळ केली जात आहे.

शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये म्हणून महाराष्ट्र शासनाने सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत मागील अनेक वर्षांपासून पहिले ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांची सोय केली होती. दरवर्षी ही पुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वीच शाळेकडे पाठवण्यात येत असत. मागील दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असून, जवळपास सर्वच शाळांनी ऑनलाईन शिक्षणाची व्यवस्था केली आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षी पुस्तके लवकर येऊन विद्यार्थ्यांना शाळेत बोलावून पुस्तके वाटप केली होती.

यावर्षी शासनाने शाळा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू केला. यावर्षी शासन मोफत पुस्तके देईल की नाही, असे शिक्षण विभागाला वाटत असताना यावेळीदेखील पुस्तके वेळेवर आली. परंतु शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे आलेली पुस्तके अद्याप वाटप करण्यात आलेली नाहीत. सर्व शाळांनी पहिलीपासून ऑनलाईन शिक्षण सुरू केले आहे. ऑनलाईन शिक्षण सुरू होऊन दीड महिना उलटला तरी विद्यार्थ्यांना पुस्तके न मिळाल्याने या विद्यार्थ्यांना विनापुस्तकाचे शिक्षण घेण्याची वेळ आली. त्यांच्याजवळ पुस्तक नसल्याने या विद्यार्थ्यांना शिक्षक काय शिकवत आहेत, हे समजेनासे झाले आहे. यामुळे आलेली पुस्तके तत्काळ वाटप करावीत, अशी मागणी एसएफएसआयचे माजी राज्य उपाध्यक्ष शिवाजी कुरे यांनी केली आहे.

--------

विद्यार्थ्यांना पुस्तके नसल्याने शिक्षक ऑनलाईन काय शिकवत आहेत, हे त्यांना कळेनासे झाले आहे. यामुळे ऑनलाईन शिकवून फायदाच नसल्याने पुस्तके तत्काळ वाटप करावीत.

----गणेश लोहिया, पालक

-------

माजलगाव तालुक्यात जिल्हा परिषद व अनुदानित संस्था मिळून २७५ एवढ्या शाळा असून, यात जवळपास ३४ हजार विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप केले जाते. यावर्षी गेल्या वर्षीची पुस्तके जमा करून तीदेखील मुलांना देण्यात येणार आहेत. ही जुनी पुस्तके २० टक्के वाटप करण्यात येणार असल्याने यावर्षी ८० टक्केच पुस्तके मिळालेली आहेत. यावर्षी १ लाख ९८ हजार पुस्तकांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती या विभागाचे प्रमुख आर. एम. अदमाने व एम. व्ही. कदम यांनी दिली आहे.

------

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांकडून गेल्या वर्षीची पुस्तके संकलित करण्यात आली आहेत. नवीन दोन विषयांची पुस्तके आलेली नसल्याने आम्ही पुस्तके वाटप केली नव्हती. ती पुस्तके या आठवड्यात मिळतील. त्यानंतर सर्व पुस्तके वाटप करण्यात येतील.

-एल. बी. बेडसकर, गटशिक्षणाधिकारी, माजलगाव