शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

दमदार हजेरी, बीड जिल्ह्यात सर्वोत्तम पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:10 IST

बीड : तब्बल २५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना मोठा आधार झाला असला तरी बहुतांश ...

बीड : तब्बल २५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर जिल्ह्यात सोमवारी रात्री झालेल्या पावसाने खरिपाच्या पिकांना मोठा आधार झाला असला तरी बहुतांश ठिकाणी पिकांना अति पावसाचा फटकाही बसला आहे, तर लघु प्रकल्प भरले असून, मध्यम व मोठ्या प्रकल्पांतही पाणीसाठा वाढणार आहे. सोमवारी रात्रीपासून मंगळवारपर्यंत जिल्ह्यातील ३१ मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस बीड तालुक्यातील पिंपळनेर मंडळात २१४ मिमी नोंदला आहे. मंगळवारी मागील सकाळी ११ वाजेपर्यंत मागील २४ तासांत बीड तालुक्यात ७५.२ मिमी पाऊस नोंदला आहे.

-------------

बीड तालुक्यातील बीड मंडळात १११ मिमी, पाली मंडळात ९९, म्हाळस जवळा १६६, नाळवंडी १९०, पिंपळनेर २१४, पेंडगाव ११८, चौसाळा ७७ आणि नेकनूर मंडळात ८० मिमी पाऊस नोंदला आहे.

-----------------

गेवराई तालुक्यातील गेवराई मंडळात ९४ मिमी, मादळमोही ११३, जातेगाव ८४, पाचेगाव ७४, उमापूर १००, चकलांबा ११७, सिरसदेवी ८१ आणि रेवकी मंडळात ७६ मिमी पाऊस झाला.

-------

पाटोदा तालुक्यात, पाटोदा मंडळात ६४, तर अंमळनेर मंडळात १६२ मिमी नोंद झाली.

-----------

आष्टी तालुक्यात आष्टी मंडळात ६६ मिमी, दौलावडगाव १२६, धामणगाव ६७, धानोरा ६९ आणि पिंपळा मंडळात ६६ मिमी पावसाची नोंद झाली.

--------------

वडवणी तालुक्यात वडवणी मंडळात ८८ मिमी, तर कवडगाव मंडळात ११५ मिमी पाऊस झाला.

----

शिरूर कासार तालुक्यात शिरूर मंडळात ६५ व रायमोहा मंडळात ९१ मिमी पाऊस नोंदला.

-----------

परळी तालुक्यातील धर्मापुरी मंडळात ७८ मिमी पावसाची नोंद झाली.

---------

अंबाजोगाई तालुक्यात पाटोदा ममदापूर मंडळात १६० मिमी, तर बर्दापूर मंडळात ५५ मिमी पाऊस झाला.

---------

धारूर तालुक्यात धारूर मंडळात ६२

--------

२४ तासांत नोंदलेला पाऊस

बीड १०७.६ मिमी, पाटोदा ८६ मिमी, गेवराई १०२ मिमी, आष्टी ६९ मिमी, माजलगाव ३९ मिमी, केज ४३.६ मिमी, अंबाजोगाई ८८ मिमी, परळी ३२ मिमी, धारूर ४३.८ मिमी, वडवणी १०२ मिमी, शिरूर ७२ मिमी - एकूण ७५.२ मिमी

-------------

जून ते ऑगस्टपर्यंत झालेला एकूण पाऊस

बीड ४८२ मिमी, पाटोदा ५२५ मिमी, आष्टी ४२१ मिमी, गेवराई ५८४ ममी, माजलगाव ६०१ मिमी, अंबाजोगाई ८२६ मिमी, केज ५३९ मिमी, परळी ७०९ मिमी, धारूर ६६७ मिमी, वडवणी ७०४ मिमी, शिरूर कासार ४५० मिमी.

------------

अपेक्षित पाऊस, झालेला पाऊस

जिल्ह्यात जून - जुलैमध्ये २५६ मिमी पाऊस अपेक्षित होता. या कालावधीत ३९१ मिमी पाऊस झाला, तर ऑगस्टमध्ये १३८ मिमी पाऊस अपेक्षित होता. या महिन्यात मोठा खंड पडला तरीही १७८ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात ३१ ऑगस्टपर्यंत अपेक्षित पाऊस ३९४ मिमी होता. मात्र, या तारखेपर्यंत ५७१ मिमी पाऊस झाला आहे.

---------------

अतिवृष्टीचे पंचनामे त्वरित व्हावेत

जिल्ह्यात सर्वत्र उत्तम आणि समाधानकारक पाऊस झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. सोयाबीन आणि काढणीला आलेल्या मूग, उडदासह काही पिकांना फटका बसणार आहे. जिल्ह्यात बहुतांश मंडळांत अतिवृष्टी (६५ मिमीपेक्षा जास्त) झाली आहे. काही मंडळात यापेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे. त्यामुळे या अतिवृष्टीचे पंचनामे करणे आवश्यक असून, महसूल व तहसील विभागामार्फत पंचनामे करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याची गरज आहे.

-------------