शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बारावीच्या कोऱ्या उत्तरपत्रिका सांभाळण्याचा मुख्याध्यापकांना ताण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:31 IST

राज्यातील कोरोना स्थितीमुळे शिक्षण विभागाला वारंवार निर्णय बदलावे लागले. एप्रिल आणि मे महिन्यांत परीक्षेचे नियोजन केलेले असताना अचानक मार्चमध्ये ...

राज्यातील कोरोना स्थितीमुळे शिक्षण विभागाला वारंवार निर्णय बदलावे लागले. एप्रिल आणि मे महिन्यांत परीक्षेचे नियोजन केलेले असताना अचानक मार्चमध्ये कोरोनाची लाट आल्याने दहावीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या. या परीक्षांची तारीख जरी घोषित झाली होती, तरी परीक्षेसाठीचे साहित्य संबंधित केंद्रांवर कुठेही पोहोच झाले नव्हते किंवा त्याबाबत केंद्र पातळीवर बैठकाही झाल्या नव्हत्या. त्यामुळे जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी दहावीच्या उत्तरपत्रिका परीक्षेचे साहित्य मिळालेले नाही. परिणामी, संबंधित मुख्याध्यापकांचा भार हलका होणार असला तरी बारावीच्या परीक्षेचे साहित्य मात्र सांभाळावे लागणार आहे.

दहावीचे विद्यार्थी ४३९८५

बारावीचे विद्यार्थी ४१२००

हे साहित्य कस्टडीत

बीड जिल्ह्यात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात बारावी परीक्षेसाठी उत्तरपत्रिका, ग्राफ, मॅप, होलोक्राफ्ट, स्टिकर, सिटिंग प्लँट, एबी लिस्ट, विषयनिहाय व माध्यमनिहाय बारकोड, प्रात्यक्षिक पेपरचे साहित्य, ओएमआर, गुणपत्रिका आदी साहित्य कस्टडीत ठेवले आहे. एकूणच उत्तरपत्रिका तसेच वाटप करण्यात आलेले परीक्षा साहित्य सांभाळायचा मुख्याध्यापकांवर ताण वाढला आहे.

परीक्षेपर्यंत प्रतीक्षा

जोपर्यंत परीक्षा होत नाही तोपर्यंत हे साहित्य सांभाळावे लागणार आहे. बारावी परीक्षेसाठीच्या कोऱ्या उत्तरपत्रिका, पुरवणी फॉर्मेट व इतर साहित्य १३ एप्रिलदरम्यान पोहोचले आहे. होमसेंटरवर परीक्षा घेण्याच्या अनुषंगाने पाणी, फर्निचर व इतर भौतिक सुविधांबाबत मंडळाकडून माहिती घेण्यात आली. उपलब्ध कर्मचारीसंख्या व इतर पूरक माहितीही घेण्यात आली. आता परीक्षेबाबत कोणताही निर्णय झाला, तरी तोपर्यंत कोऱ्या उत्तरपत्रिका सांभाळण्याचा ताण मुख्याध्यापकांवर पडणार आहे.

-------------

परीक्षेवेळी सॅनिटायझेशन तसेच ऑक्सिमीटर व थर्मलगन लागणार आहे. त्यादृष्टीने तयारी केली आहे. बारावी परीक्षेनंतर वैद्यकीय शिक्षण, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन व फार्मसी शिक्षणासाठी तसेच विज्ञान, कला, वाणिज्य शाखांत प्रवेशासाठी बारावी परीक्षेत मिळणारे गुण महत्त्वाचे असतात. त्यामुळे ही परीक्षा होईल, असे वाटते. - प्रदीप देशमुख, प्राचार्य, स्वा. सावरकर उच्च माध्यमिक विद्यालय, बीड

-------------

लसीचे निश्चितीकरण झाल्यानंतर डिसेंबरपासून वेळ होता. अठरा वर्षांच्या पुढील मुलांना लसीकरण आधी केले असते, तर परीक्षा घेता आल्या असत्या. तसेच पालक व समाजापर्यंत चांगला संदेश गेला असता. परीक्षेबाबत गुंतागुंत झाली नसती.

-

दिगंबर अंकुशे, मुख्याध्यापक, द्वा. मंत्री राजस्थानी विद्यालय, बीड

-----------------