शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
4
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
5
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
6
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
7
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
8
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
9
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
10
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
11
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
12
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
13
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
14
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
15
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
16
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
17
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
18
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
19
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
20
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया

राज्यभर भगव्या विचाराचे वादळ अधिक गतीने पसरतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2019 23:44 IST

मिळालेल्या संधीचा लाभ लोककल्याण, विकासाची अधिक कामे करून घेणार असून याकामी मला आपले आशिर्वाद आणि खंबीर साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले.

ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : शिवसेनेने दिलेल्या संधीचे विकासासाठी करणार सोने; सर्वांगीण विकासाच्या विविध योजनांसाठी प्रयत्न

बीड : येत्या २१ तारखेला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक होऊ घातली असून राज्याच्या कानाकोपऱ्यात भगव्या विचाराचे वादळ अधिक गतीने पसरत आहे. शिवसेना पक्षाने मला संधी दिली आहे. मिळालेल्या संधीचा लाभ लोककल्याण, विकासाची अधिक कामे करून घेणार असून याकामी मला आपले आशिर्वाद आणि खंबीर साथ आवश्यक आहे, असे प्रतिपादन बीड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी केले.रविवारी शहरातील कबाड गल्ली भागातील आदर्श नवरात्र महोत्सवात क्षीरसागर यांच्याहस्ते देवीची महाआरती करण्यात आली. त्यानंतर माजी सभापती बाळासाहेब जाधव यांच्या निवासस्थानी त्यांनी सदीच्छा भेट दिली. यावेळी जयदत्त क्षीरसागर बोलत होते. याप्रसंगी विलास बडगे, प्रा.जगदीश काळे, माजी सभापती बाळासाहेब जाधव, बंडूभाऊ कदम आदींची उपस्थिती होती.नवरात्रीच्या पवित्र काळात प्रत्येक घरोघरी आई भवानीची मनोभावे सेवा केली जाते. नवरात्र उत्सवाची या भागाची परंपरा असून स्व.किसन जाधव, स्व.राजेंद्र जाधव यांनी सुरू केलेल्या उत्सवाची परंपरा आजही बाळासाहेब जाधव, बंडू कदम यांनी सर्वाना सोबत घेऊन मोठ्या उत्साहाने कायम ठेवली आहे. आदर्श नावाप्रमाणे उत्सव ही आदर्श पध्दतीने संपन्न होत असल्याचे जयदत्त क्षीरसागर म्हणाले.पुढे बोलतांना क्षीरसागर म्हणाले की, शहराच्या मूलभूत गरजांसोबतच सर्वांगीण विकासाच्या विविध योजना शासन दरबारी पाठपुरावा करून पदरात पाडून घ्याव्या लागतात. शहरात सुरू असलेल्या अमृत पाणी पुरवठा, ड्रेनेज योजनेमुळे शहराची भविष्यातील व्याप्ती आणि लोकसंख्या लक्षात घेऊन पाण्याचे नियोजन केले आहे. आतापर्यंत विकासाच्या अनेक योजना प्रत्यक्षात शहरात आणून विकास करण्याचा व सुविधा देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. यापुढेही विकासाठी प्रयत्नशील राहील. भविष्यात संधी आणि आशिर्वादाचा मला विश्वास असल्याचे ते जयदत्त क्षीरसागर यावेळी म्हणाले.कबाड गल्ली परिसराने मला मागील काळापासून स्नेह दिला असून हा भाग राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रभावी आणि मध्यवर्ती असून शिवसेनेचा उगम येथूनच झाला असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष याच भागातून शहरात वाºयासारखा पसरला. शहराला दिशा देण्याचे काम या भागाने आजपर्यत केले असून हाच वारसा पुढील काळात ही जोपासला जावा. कबाड गल्ली परिसराशी माझे मागील काळापासून स्नेहाचे नाते असून स्नेहाचा हा धागा भविष्यातही अधिक मजबूज राहील असा ठाम विश्वास आहे.- जयदत्त क्षीरसागर, रोहयो मंत्री

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरShiv Senaशिवसेना