शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

आरणवाडी साठवण तलाव प्रकरणी ग्रामस्थांचा आज रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धारूर : तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडल्याप्रकरणी व तलावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर पाचशे मीटरच्या रस्त्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धारूर : तालुक्यातील आरणवाडी साठवण तलावाचा सांडवा फोडल्याप्रकरणी व तलावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर पाचशे मीटरच्या रस्त्याचे बोगस काम करणाऱ्या गुत्तेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, या व इतर मागण्यांसाठी सर्वपक्षीय पाच गावातील ग्रामस्थांच्या वतीने २ ऑगस्ट रोजी तलावाजवळ रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

धारुर तेलगाव रस्त्यालगत आरणवाडी साठवण तलावाचे काम तब्बल सतरा वर्षानंतर पूूर्ण झाले. या तलावाच्या बाजूनेच राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. महामार्गाचे काम करताना पाटबंधारे विभागाने पर्यायी मार्गासाठी राज्य रस्ते विकास महामंडळासाठी तीन कोटी रुपयांचा निधी दिला. मात्र या पर्यायी रस्त्यातील पाचशे मीटरचे काम अर्धवट व बोगस केले. तलाव पहिल्याच वर्षी भरला. यामुळे रस्त्याला धोका निर्माण झाला. राज्य रस्ते विकास महामंडळाने पाटबंधारे विभागाला तसे पत्र दिले. हे पत्र देताच पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांना जाग आली. तलावाची पाहणी करून पहिल्या वर्षी तलावाला धोका असल्याच्या नावाखाली चक्क नवा बांधलेला सांडवा फोडला. यातून लाखो लीटर पाणी सोडून दिले. सांडवा फोडायला पाच गावांचा विरोध असताना पाटबंधारे विभागाने अधिकारशाहीचा वापर करीत सांडवा फोडला.

पाटबंधारे खात्याच्या निषेधार्थ यामुळे इरणवाडी, चोरांबा, पहाडी पिरगाव, थेटेगव्हाण, ढगेवाडी येथील ग्रामस्थांनी रास्ता रोकोचे आयोजन केले आहे. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील शिनगारे, बाळासाहेब चव्हाण, शिवाजी मायकर, महादेव तोंडे, बजरंग माने, लहू फुटाणे, सरपंच वशिष्ठ मुंडे व ग्रामस्थांनी केले आहे.