शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सावरगाव येथे भव्य रस्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:38 IST

माजलगाव/ किट्टी आडगाव : शासनाने राज्य महामार्गावरील रस्ता अपुऱ्या अवस्थेत सोडल्याने संघर्ष समितीच्या वतीने १२ ऑगस्ट ...

माजलगाव/ किट्टी आडगाव : शासनाने राज्य महामार्गावरील रस्ता अपुऱ्या अवस्थेत सोडल्याने संघर्ष समितीच्या वतीने १२ ऑगस्ट रोजी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सुर्डी पासून सावरगाव पर्यंत बंद पडलेले राज्य महामार्गाचे काम त्वरित चालू करावा या मागणीचे निवेदन आ. प्रकाश सोळंके यांच्यासह परिसरातील ग्रामस्थांनी दिले.

माजलगाव तालुक्यातील राज्य रस्ता २२२ वरील सावरगाव -पायतळवाडी, किट्टी आडगाव , पारगाव कॅम्प , शहाजानपूर, राजेगाव - सुर्डी , टाकरवण , तलवाडा मार्गे बाग पिंपळगाव राज्य महामार्ग रस्त्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाग पिंपळगाव येथे २०१९ मध्ये केले होते. या रस्त्याच्या कामासाठी १७६ कोटींचा निधी दिलेला होता. परंतु बाग पिंपळगाव ते सुर्डी पर्यंत हा रस्ता दुरूस्ती करण्यात आला. तर राजेगाव, पारगाव कॅम्प , शहाजानपूर , किट्टी आडगाव मार्गे पायतळवाडी करून सावरगावला मिळतो. हा सर्व रोड हॅम प्रोजेक्ट अंतर्गत येत असून अपुऱ्या अवस्थेत शासनाने राज्य महामार्ग रस्ता सोडल्याने संघर्ष समितीने सावरगाव येथे रास्ता रोको अंदोलन केले. या आंदोलनात आ. प्रकाश सोळंके , नितीन नाईकनवरे , रमेश आडसकर , मोहन जगताप , जयदत्त नरवडे , अरूण इंगळे या प्रमुख नेत्यांची उपस्थिती असून बाबासाहेब आगे , रामचंद्र डोईजड, शरद कचरे , अनिल साळवे , विष्णू आगेसह टाकरवण आणि किट्टी आडगाव सर्कल सह पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

120821\0904purusttam karva_img-20210812-wa0033_14.jpg