शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

टँकरच्या खेपा वाढवण्याचे राज्य सरकारचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:23 IST

दुष्काळी स्थितीत सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा हा २०११ च्या जनगणनेनूसार होत आहे. मात्र २०१९ ची लोकसंख्या ग्राह्य धरून पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता राज्यात १०% वाढ ग्राह्य धरून टँकर पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देलोकसंख्येनुसार १० टक्के वाढ गृहित धरून टँकर खेपा वाढणार

बीड :दुष्काळी स्थितीत सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा हा २०११ च्या जनगणनेनूसार होत आहे. मात्र २०१९ ची लोकसंख्या ग्राह्य धरून पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता राज्यात १०% वाढ ग्राह्य धरून टँकर पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.संपूर्ण राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून बीड जिल्ह्यात सततचा पडणारा दुष्काळ आणि घटलेली पाण्याची पातळी लक्षात घेता टँकरची संख्या वाढवणे गरजेची होती. दोन दिवसांपूर्वी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन टँकरच्या खेपा वाढवण्याची मागणी केली होती, टँकरद्वरे कुंडलीका प्रकल्पातून पाणी पुरवठा केल्यास पिण्याच्या पाण्याची सोय होईल अशी देखील मागणी आ. क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता आहे त्या लोकसंख्येच्या तुलनेत १० % वाढ गृहीत धरून संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात ज्या ठिकाणी टँकर सुरु आहेत, त्या ठिकाणी संख्या वाढवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. टँकरच्या खेपा वाढवाव्यात अशी मागणी अनेक गावातील ग्रमस्थांनी आ. क्षीरसागर यांच्याकडे केली होती.

टॅग्स :BeedबीडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरwater shortageपाणीटंचाई