शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

टँकरच्या खेपा वाढवण्याचे राज्य सरकारचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:23 IST

दुष्काळी स्थितीत सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा हा २०११ च्या जनगणनेनूसार होत आहे. मात्र २०१९ ची लोकसंख्या ग्राह्य धरून पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता राज्यात १०% वाढ ग्राह्य धरून टँकर पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

ठळक मुद्देलोकसंख्येनुसार १० टक्के वाढ गृहित धरून टँकर खेपा वाढणार

बीड :दुष्काळी स्थितीत सध्या सुरू असलेला पाणी पुरवठा हा २०११ च्या जनगणनेनूसार होत आहे. मात्र २०१९ ची लोकसंख्या ग्राह्य धरून पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. त्यामुळे वाढीव लोकसंख्येनुसार टँकरच्या खेपा वाढवण्यात याव्यात अशी मागणी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता राज्यात १०% वाढ ग्राह्य धरून टँकर पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.संपूर्ण राज्यात यंदा दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अनेक भागांत पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यातल्या त्यात मराठवाड्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत असून बीड जिल्ह्यात सततचा पडणारा दुष्काळ आणि घटलेली पाण्याची पातळी लक्षात घेता टँकरची संख्या वाढवणे गरजेची होती. दोन दिवसांपूर्वी आ.जयदत्त क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन टँकरच्या खेपा वाढवण्याची मागणी केली होती, टँकरद्वरे कुंडलीका प्रकल्पातून पाणी पुरवठा केल्यास पिण्याच्या पाण्याची सोय होईल अशी देखील मागणी आ. क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री आणि विभागीय आयुक्त यांच्याकडे केली होती. त्यानुसार आता आहे त्या लोकसंख्येच्या तुलनेत १० % वाढ गृहीत धरून संपूर्ण जिल्ह्यात व राज्यात ज्या ठिकाणी टँकर सुरु आहेत, त्या ठिकाणी संख्या वाढवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. टँकरच्या खेपा वाढवाव्यात अशी मागणी अनेक गावातील ग्रमस्थांनी आ. क्षीरसागर यांच्याकडे केली होती.

टॅग्स :BeedबीडDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागरwater shortageपाणीटंचाई