शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
2
मनसे-उद्धवसेना युती ही आषाढीच्या घरी महाशिवरात्र; भाजपाने आकडेवारी देत ठाकरे बंधूंना डिवचले
3
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
4
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
5
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
7
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
8
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
9
९०% लोकांना माहीतच नाही iPhoneची 'ही' जादू! स्क्रीनला हात न लावता सेकंदात करता येते काम
10
Stock Market Today: मंथली एक्सपायरीवर निराशाजनक सुरुवात; Sensex १२० अंकांनी घसरला, Nifty मध्ये ४० अंकांची घसरण
11
बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय?
12
पोर्टफोलिओमध्ये करा 'हे' ५ बदल! संरक्षण आणि आयटी शेअर्समध्ये मोठी संधी; पाहा नवीन टार्गेट प्राईस
13
'ती' गेल्याचं ऐकलं अन प्रियकरानेही प्राण सोडले! हॉस्पिटलमधून पळाला अन् काही तासांतच…
14
Silver Price: २०२६ मध्ये चांदीची चमक होणार का कमी? एका झटक्यात ₹२४,४७४ ची घसरण, काय आहेत हे संकेत?
15
मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्...
16
ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात
17
इराणवर सर्वात मोठा हल्ला होईल, तो थांबवता येणार नाही; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान
18
भारतातील १० सर्वात मोठ्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात मोठा चढ-उतार, SBI च्या गुंतवणूकदारांना सर्वाधिक नुकसान
19
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
20
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा प्रवास सुरक्षित; मग ट्रॅव्हल्सला पसंती का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST

बीड : एसटीचा प्रवास सुरक्षित व सुखाचा प्रवास समजला जातो. असे असले तरी प्रवाशांकडून खाजगी ट्रॅव्हल्सला अधिक पसंती दिली ...

बीड : एसटीचा प्रवास सुरक्षित व सुखाचा प्रवास समजला जातो. असे असले तरी प्रवाशांकडून खाजगी ट्रॅव्हल्सला अधिक पसंती दिली जात असल्याचे समोर आले आहे. केवळ पैशांची बचत आणि वेळेच्या बंधनामुळेच प्रवासी ट्रॅव्हल्सकडे धाव घेत असल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसून येते; परंतु हे प्रवासी एसटीकडे आकर्षित करण्यासाठी त्यांच्यात जनजागृती करण्याचे आव्हान राज्य परिवहन महामंडळाला असणार आहे.

जिल्ह्यात आठ आगार आहेत. जवळपास ६०० बस प्रवाशांच्या सेवेसाठी रापमकडे आहेत. यात शिवशाही व इतर बसचा समावेश आहे. असे असले तरी मागील दीड वर्षांपासून कोरोनामुळे लालपरी तोट्यात धावत आहे. अद्यापही पूर्णक्षमतेने आणि १०० टक्के बस रस्त्यावर आलेल्या नाहीत. प्रवाशांचा अपुरा प्रतिसाद मिळत असल्याने रापम तोट्यात आहे. तसेच वेळेवर सुटणाऱ्या बस मागे पुढे सोडाव्या लागतात. तर काही वेळा फेऱ्याही रद्द झालेल्या आहेत. याच कारणांमुळे सध्या रापमकडे प्रवासी कमी प्रमाणात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला कमी पैशांचे आमिष दाखवून प्रवाशांना क्षमतेपेक्षा जास्त बसून खाजगी ट्रॅव्हल्स सुसाट धावत आहेत. त्यामुळेच छोटे-मोठे अपघात होण्यासह छेडछाड व चोरीसारख्या घटना घडत असल्याची अनेक उदाहरणे आहेत. सुरक्षित प्रवासासाठी रापमच्या बसनेच प्रवास करावा, असे आवाहन केले जात असले तरी अद्याप प्रवाशांकडून याला प्रतिसाद मिळालेला नाही.

का आहे सुरक्षित प्रवास?

रापमच्या बसचा दुर्दैवाने अपघात झाला तर तात्काळ तिकिटावरच विमा देण्याची प्रक्रिया रापमकडून केली जाते. तसेच एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याला १० लाखांपर्यंत मदत केली जात असल्याचे सांगण्यात आले. तसेच कर्मचाऱ्यांसाठीही मदत केली जाते. खाजगी ट्रॅव्हल्समध्ये मात्र काहीच मिळत नाही. तसेच सरकारी बसमध्ये छेडछाडीच्या घटनांना आळा बसतो. कारण स्थानकांमध्ये पोलीस व सुरक्षा रक्षक असतात.

एसटीला स्पीड लॉक, टॅव्हल्स सुसाट

रापमच्या बसला स्पीड लॉक असते. त्यामुळे अपघातांची शक्यता कमी असते. तर दुसऱ्या बाजूला खाजगी ट्रॅव्हल्स वायुवेगाने सुसाट धावतात. त्यामुळे त्यांचे अपघात होतात. याची नाेंदही कोणाकडे ठेवली जात नाही.

---

बसचा प्रवास खाजगीपेक्षा खूप जास्त सुरक्षितच आहे. अपघात, छेडछाड, चोरी या घटना अपवादात्मक घडतात. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पूर्ण काळजी घेतली जाते. तसेच दुर्दैवाने अपघात झालेल्यांनाही मदत केली जाते. प्रवाशांनी मानसिक बदलून बसनेच प्रवास करावा.

-अजय मोरे, विभाग नियंत्रक, रापम, बीड

---

एसटीचे झालेले अपघात

२०१६-१७ ९७

२०१७-१८ ९२

२०१८-१९ १००

२०१९-२० ७४

२०२० -२१ ३४