शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

एस.टी. बसमध्ये मास्क लावण्याकडे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:12 IST

अंबाजोगाई : कोरोनामुळे सुमारे दोन महिने एस.टी. बंद होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बससेवा सुरू झाली; मात्र एस.टी.त ...

अंबाजोगाई : कोरोनामुळे सुमारे दोन महिने एस.टी. बंद होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बससेवा सुरू झाली; मात्र एस.टी.त प्रवास करताना प्रवाशांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. तशी सूचनाही एस. टी. च्या दर्शनी भागात लावण्यात आलेली आहे; मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष होत असून अनेक प्रवासी विनामास्कनेच प्रवास करताना दिसून येत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा राज्यात लॉकडाऊन घोषित करुन जनजीवन ठप्प झाले होते. या लाटेत सर्वात जास्त ग्रामीण भागात नुकसान दिसून आले. लहान लहान गावे हॉटस्पाॅट ठरली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या. कोरोना जनजागृती करण्यासाठी मोठे ठळक बॅनर, फलक, बसच्या मध्यभागी ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ अशा मार्गदर्शक सूचना लिहिल्या आहेत. तरीदेखील काही प्रवाशांच्या तोंडावर मास्क दिसून येत नाही तर काही जणांचा मास्क हनुवटीवरच लावलेला असतो.यामुळे या सूचनांकडे नागरिक तसेच प्रवाशांचे दुर्लक्ष होत असून त्यांना गांभीर्य दिसून येत नाही. कोरोनामुळे मोठी हानी होऊनही यातून आपण अजून काहीच बोध घेतला नाही असेच म्हणावे लागेल.

कोरोनाच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तरच आपण या महामारीला हरवू शकू, कोरोनावर मात करु शकतो. जवळ जवळ दोन महिन्यांपासून बंद असलेली एस. टी. सेवा चालू झाली आहे.

यात प्रत्येक प्रवाशांनी जवळ मास्क, सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक देखील करण्यात आले आहे. मात्र या नियमांचे काटेकोर पालन होताना दिसून येत नाही. यासाठी कडक अंमलबजावणी करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.