शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी. बसमध्ये मास्क लावण्याकडे दुर्लक्षच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:12 IST

अंबाजोगाई : कोरोनामुळे सुमारे दोन महिने एस.टी. बंद होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बससेवा सुरू झाली; मात्र एस.टी.त ...

अंबाजोगाई : कोरोनामुळे सुमारे दोन महिने एस.टी. बंद होती. त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर बससेवा सुरू झाली; मात्र एस.टी.त प्रवास करताना प्रवाशांनी मास्क लावणे बंधनकारक आहे. तशी सूचनाही एस. टी. च्या दर्शनी भागात लावण्यात आलेली आहे; मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष होत असून अनेक प्रवासी विनामास्कनेच प्रवास करताना दिसून येत आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वाढत्या संसर्गामुळे पुन्हा राज्यात लॉकडाऊन घोषित करुन जनजीवन ठप्प झाले होते. या लाटेत सर्वात जास्त ग्रामीण भागात नुकसान दिसून आले. लहान लहान गावे हॉटस्पाॅट ठरली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर राज्य परिवहन महामंडळाच्या बस पुन्हा रस्त्यावर धावू लागल्या. कोरोना जनजागृती करण्यासाठी मोठे ठळक बॅनर, फलक, बसच्या मध्यभागी ‘मास्क नाही, प्रवेश नाही’ अशा मार्गदर्शक सूचना लिहिल्या आहेत. तरीदेखील काही प्रवाशांच्या तोंडावर मास्क दिसून येत नाही तर काही जणांचा मास्क हनुवटीवरच लावलेला असतो.यामुळे या सूचनांकडे नागरिक तसेच प्रवाशांचे दुर्लक्ष होत असून त्यांना गांभीर्य दिसून येत नाही. कोरोनामुळे मोठी हानी होऊनही यातून आपण अजून काहीच बोध घेतला नाही असेच म्हणावे लागेल.

कोरोनाच्या नियमांचे पालन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तरच आपण या महामारीला हरवू शकू, कोरोनावर मात करु शकतो. जवळ जवळ दोन महिन्यांपासून बंद असलेली एस. टी. सेवा चालू झाली आहे.

यात प्रत्येक प्रवाशांनी जवळ मास्क, सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक देखील करण्यात आले आहे. मात्र या नियमांचे काटेकोर पालन होताना दिसून येत नाही. यासाठी कडक अंमलबजावणी करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.