शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

दिंद्रुडच्या मातीत पुन्हा फुलणार पानमळ्याचे वैभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:33 IST

संडे स्पेशल बातमी संतोष स्वामी दिंद्रुड : जवळपास ३५ वर्षांपूर्वी दिंद्रुड हे पानमळ्याचे गाव म्हणून महाराष्ट्रात सुप्रसिद्ध होते. ...

संडे स्पेशल बातमी

संतोष स्वामी

दिंद्रुड : जवळपास ३५ वर्षांपूर्वी दिंद्रुड हे पानमळ्याचे गाव म्हणून महाराष्ट्रात सुप्रसिद्ध होते. येथील पानाला विशेष चव असल्याने ग्राहकांत मोठी मागणी दिंद्रुडच्या गावरान पानाला होती. मात्र १९८२ झाली हिंगणी येथे सरस्वती पाझर तलाव झाल्यापासून दिंद्रुडच्या सरस्वती नदीचे पाणी गायब झाले. पर्यायाने पानमळे संपुष्टात आले. दिंद्रुड येथील युवा शेतकरी संजय शिंदे यांनी चालू केलेल्या पानमळ्यामुळे जुन्या आठवणी ताज्या तर झाल्या त्याचबरोबर दिंद्रुडच्या मातीत पुन्हा पानमळ्याचे वैभव फुलण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

काही काळापूर्वी दिंद्रुड हे पान मळ्यासाठी महाराष्ट्रात सुप्रसिद्ध गाव म्हणून सुपरिचित होते. मध्यंतरीच्या काळात पाण्याचा दुष्काळ व ऊस, कापूस, सोयाबीन या पिकांवर शेतकऱ्यांनी भर दिल्यामुळे या पानमळा शेतीकडे दुर्लक्ष होत गेले. पर्यायाने पानमळ्याची शेती नामशेष झाली. दिंद्रुड येथील तरुण शेतकरी संजय शिवाजी शिंदे यांनी पारंपरिक शेती जोपासण्यासाठी पानमळ्याच्या माध्यमातून उत्पन्न साधण्याचा प्रयत्न केला आहे. परिसरात तब्बल ३० वर्षांच्या खंडानंतर शिंदे यांनी धाडस करीत चार महिन्यांपूर्वी एक एकर पानमळा लागवड केली. त्यांच्या आतापर्यंतच्या अनुभवानुसार अत्यल्प खर्चात चांगले उत्पन्न मिळवून देणारी शेती म्हणजे पानमळा असल्याचे ते सांगतात. सेंद्रिय खतावर व अर्धा एकर शेततळे घेत ठिबक सिंचन करून त्यांनी पानमळा जोपासला आहे. त्यांच्या पान मळ्याच्या शेतीला भरघोस उत्पन्न मिळत आहे. अलीकडच्या काळात दिंद्रुड शिवारात भरपूर पाऊस झाला आहे. गावालगत नदीवर बंधारे बांधण्यात आले असून जलसंधारणाचे काम झाले आहे. त्यामुळे गावात पाण्याचा टक्का वाढला असून पानमळे लागवड करण्यासाठी पर्याप्त पाणी उपलब्ध होत आहे. याच कारणाने अन्य शेतकऱ्यांनीही शिंदे यांचा आदर्श डोळ्यासमोर घेत पानमळे शेतीकडे वळणे गरजेचे आहे.

आरोग्यदायी पान

पान खाणे ही वाईट सवय नसून विड्याचे पान आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. पान खाल्ल्याने अनेक आजारांपासून आपली सुटका होऊ शकते. हे खरंय की, पानात जर चुना किंवा तंबाखू मिसळून खाल्ला तर ते तब्येतीसाठी चांगले नसते. पण पानात हे पदार्थ न टाकता काही विशिष्ट पदार्थ टाकून ते खाल्ले तर त्याचा आरोग्यासाठी खूप फायदा होतो. पान शरीरातील अनेक व्याधींपासून आपले संरक्षण करू शकते, असे काही जाणकारांचे मत आहे.

-------

विक्रेत्यांची सोय

यापूर्वी स्टॉल चालवताना परभणी, माजलगाव, बीड आदी ठिकाणाहून पाने आणावी लागत होती. परंतु दिंद्रुड येथील शिंदे यांनी लागवड केलेल्या पानमळ्यामुळे आता पानाच्या खरेदीसाठी गावाबाहेर जाण्याची गरज राहिली नाही. यामुळे प्रवासाचा खर्च वाचला असून येथील पानाला चांगली असल्याने ग्राहकांमध्येही समाधान व्यक्त होत आहे. - निवृत्ती वरपे, पान स्टॉल चालक. ---------

दुष्काळाच्या अनुभवातून शेततळे

माझ्या आजोबा, पणजोबाच्या काळापासून आमच्या शेतात पानमळा होता. वडिलांनीही तो वसा जोपासला. मात्र पाण्याच्या दुष्काळामुळे पानमळ्याची शेती बंद करावी लागली. आता मुबलक पाणीसाठा उपलब्ध राहावा म्हणून मी अर्धा एकर जागेत शेततळे उभारले आहे. भविष्यात मळ्यात कलकत्ता जातीचे पान उत्पादनाचे स्वप्न मी पूर्ण करणार आहे. - संजय शिंदे, शेतकरी, दिंद्रुड.

130821\4518img_20210620_112245_14.jpg~130821\4518img_20210620_112958_14.jpg