शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
3
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
4
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
5
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
6
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम
7
एलन मस्क बनले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती! संपत्ती ५०० बिलियन डॉलरवर, इतकी कमाई आली कोठून?
8
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
9
Success Story: १९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
10
वडील करणार होते पाचव्यांदा लग्न; संपत्तीसाठी लेकाने काढला काटा, पोलिसांची केली दिशाभूल अन्...
11
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
12
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
13
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
14
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
15
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
16
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
17
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
18
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
19
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
20
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?

वडवणी तहसील परिसरात घुमला पळी-ताम्हणाचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

वडवणी : शासन-प्रशासन दरबारी दुर्लक्षित आणि खितपत पडलेल्या ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने सुरू आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ...

वडवणी : शासन-प्रशासन दरबारी दुर्लक्षित आणि खितपत पडलेल्या ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने सुरू आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने शांतता व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या ब्राह्मण समाजाने सोमवारी रस्त्यावर उतरत ताम्हण-पळी वाजवीत ‘जागो सरकार जागो’चा नारा दिला. ब्राह्मण संघर्ष समितीच्या या अनोख्या आंदोलनाने तहसील परिसर दणाणून गेला होता.

ब्राह्मण समाजाच्या मागण्या शासन-प्रशासन दरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासाठी वेळोवेळी शांततेच्या व लोकशाही मार्गाने तहसील, जिल्हाधिकारी व आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलने केली. मुंबईत महाधरणे करून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटून समाजाच्या भावना कळविल्या; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये राज्यातील आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार या सर्व लोकप्रतिनिधींना प्रलंबित मागण्यांचे स्मरण पत्र देऊन हिवाळी अधिवेशनात समाजाच्या मागण्यांचा विचार करून ठोस निर्णय घेण्याची विनंती केली; परंतु सरकारने यावर कसलाच निर्णय घेतला नाही. या आंदोलनात समितीचे धनंजय कुलकर्णी, श्रीनिवास केजकर, दिगंबर जोशी, योगेश जोशी, धनंजय कुलकर्णी, शामराव जोशी, अमोल कुलकर्णी, बाळासाहेब जोशी, श्रीकांत जोशी, प्रशांत जोशी, प्रदीप जोशी, कालिदास रत्नपारखी, सतीश देशमुख, मुरलीधर कोहाळे, मोहन जोशी, शुशांत जोशी, दत्तात्रय जोशी, प्रकाश जोशी, पांडुरंग जोशी, संजय रत्नपारखे, दत्तात्रय रत्नपारखे, अशोकराव रत्नपारखे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

२२ जानेवारीनंतर आंदोलन तीव्र

१ ते २२ जानेवारीपर्यंत राज्यभरात तहसील, जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालयासमोर ताम्हण-पळी वाजवून ‘जागो सरकार जागो’ असा नारा देत ब्राह्मण समाज संघर्ष समिती, महाराष्ट्रच्या वतीने आंदोलन सुरू आहे. ११ जानेवारी रोजी वडवणी तहसील कार्यालयात ताम्हण-पळी वाजवून जागो सरकार जागोचा नारा देण्यात आला. २२ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे या आंदोलनाचा समारोप होणार आहे. २२ जानेवारीपर्यंत सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्यांचा विचार न केल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे संघर्ष समितीने वडवणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.