शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

वडवणी तहसील परिसरात घुमला पळी-ताम्हणाचा आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:28 IST

वडवणी : शासन-प्रशासन दरबारी दुर्लक्षित आणि खितपत पडलेल्या ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने सुरू आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ...

वडवणी : शासन-प्रशासन दरबारी दुर्लक्षित आणि खितपत पडलेल्या ब्राह्मण समाजाच्या मागण्यांसाठी सातत्याने आंदोलने सुरू आहेत. त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने शांतता व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या ब्राह्मण समाजाने सोमवारी रस्त्यावर उतरत ताम्हण-पळी वाजवीत ‘जागो सरकार जागो’चा नारा दिला. ब्राह्मण संघर्ष समितीच्या या अनोख्या आंदोलनाने तहसील परिसर दणाणून गेला होता.

ब्राह्मण समाजाच्या मागण्या शासन-प्रशासन दरबारी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासाठी वेळोवेळी शांततेच्या व लोकशाही मार्गाने तहसील, जिल्हाधिकारी व आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलने केली. मुंबईत महाधरणे करून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना भेटून समाजाच्या भावना कळविल्या; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये राज्यातील आजी-माजी मंत्री, खासदार, आमदार या सर्व लोकप्रतिनिधींना प्रलंबित मागण्यांचे स्मरण पत्र देऊन हिवाळी अधिवेशनात समाजाच्या मागण्यांचा विचार करून ठोस निर्णय घेण्याची विनंती केली; परंतु सरकारने यावर कसलाच निर्णय घेतला नाही. या आंदोलनात समितीचे धनंजय कुलकर्णी, श्रीनिवास केजकर, दिगंबर जोशी, योगेश जोशी, धनंजय कुलकर्णी, शामराव जोशी, अमोल कुलकर्णी, बाळासाहेब जोशी, श्रीकांत जोशी, प्रशांत जोशी, प्रदीप जोशी, कालिदास रत्नपारखी, सतीश देशमुख, मुरलीधर कोहाळे, मोहन जोशी, शुशांत जोशी, दत्तात्रय जोशी, प्रकाश जोशी, पांडुरंग जोशी, संजय रत्नपारखे, दत्तात्रय रत्नपारखे, अशोकराव रत्नपारखे यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.

२२ जानेवारीनंतर आंदोलन तीव्र

१ ते २२ जानेवारीपर्यंत राज्यभरात तहसील, जिल्हाधिकारी, आयुक्त कार्यालयासमोर ताम्हण-पळी वाजवून ‘जागो सरकार जागो’ असा नारा देत ब्राह्मण समाज संघर्ष समिती, महाराष्ट्रच्या वतीने आंदोलन सुरू आहे. ११ जानेवारी रोजी वडवणी तहसील कार्यालयात ताम्हण-पळी वाजवून जागो सरकार जागोचा नारा देण्यात आला. २२ जानेवारी रोजी औरंगाबाद येथे या आंदोलनाचा समारोप होणार आहे. २२ जानेवारीपर्यंत सरकारने ब्राह्मण समाजाच्या मागण्यांचा विचार न केल्यास पुढील आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे संघर्ष समितीने वडवणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.