शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पोलीस दलातील बदल्यांमुळे कहीं खुशी, कहीं गम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:38 IST

बीड : जिल्हा पोलीस दलातील शिपाई ते सहायक उपनिरीक्षक पदावरील २११ अंमलदारांच्या बदल्यांची दुसरी यादी २३ ऑगस्ट रोजी पोलीस ...

बीड : जिल्हा पोलीस दलातील शिपाई ते सहायक उपनिरीक्षक पदावरील २११ अंमलदारांच्या बदल्यांची दुसरी यादी २३ ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी जाहीर केली. दरम्यान, यामध्ये स्वग्राममध्ये (स्वत:च्या तालुक्यात) सेवा बजावणाऱ्यांना बाहेरच्या तालुक्यात नियुक्ती देण्यात आली, तर मूळ नेमणुकीच्या ठिकाणाहून संलग्न म्हणून सोयीच्या ठिकाणी कार्यरत असलेल्यांनाही हटविण्यात आले. त्यामुळे कहीं खुशी, कहीं गम असे वातावरण आहे.

पोलीस दलातील ३०८ अंमलदारांच्या २९ जुलै रोजी प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्वग्राम व संलग्न म्हणून सोयीच्या ठिकाणी चिकटून बसलेल्यांची समुपदेशन प्रक्रिया २० ऑगस्ट रोजी राबविण्यात आली होती. यात नव्या नियुक्तीसाठी तीन पर्याय दिले होते. त्यानुसार अंमलदारांनी नोंदविलेला पसंती क्रमांक व रिक्त जागा यांचा ताळमेळ घालून नेमणुका करण्यात आल्या. यानुसार २११ अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी जारी केले. दरम्यान, काही जणांची गैरसोय झाल्याने नाराजी आहे, तर विशिष्ट ठिकाणी ठाण मांडून बसलेल्यांना हटवून नव्यांना संधी दिल्याने समाधानही व्यक्त होत आहे.

....

काहीजणांची विविध शाखांमध्ये संगीत खुर्ची

एका ठाण्यात किंवा शाखेत अंमलदारांना पाच वर्षे सेवा बजावता येते. मात्र, काही अंमलदार या शाखेतून त्या शाखेत बदली करून घेत संगीत खुर्ची खेळत असल्याचे पाहावयास मिळते. काही अंमलदारांनी राजकीय नेत्यांचे वजन वापरून तसेच वरिष्ठांची मर्जी संपादन करून या शाखेतून त्या शाखेत प्रवास करत १० ते १५ वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ काढल्याचे सूत्रांनी सांगितले. बीड सोडून इतरत्र जाणे टाळण्यासाठी त्यांना शाखा सोडवत नाहीत.

...

एलसीबीवर अनेकांचा डोळा

स्थानिक गुन्हे शाखेतील नऊ अंमलदारांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. या शाखेत नियुक्ती मिळावी यासाठी शेकडो विनंती अर्ज अधीक्षकांकडे आल्याची माहिती सूत्रांनी दिली. काही जणांनी राजकीय नेत्यांकडे फिल्डिंग लावली आहे. या शाखेत नियुक्ती द्यावी तरी कोणाकोणाला, असा प्रश्न वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर आहे.

....

दोघांचे बदलीला आव्हान, मॅटमध्ये धाव

२९ जुलै रोजी झालेल्या बदल्यांनंतर दोन अंमलदारांनी न्यायाधिकरणात (मॅट) धाव घेतली. पोलीस कल्याण विभाग व गेवराई ठाण्यातील अंमलदारांचा यात समावेश आहे. कार्यकाल पूर्ण झालेला नसताना व विनंती अर्ज नसतानाही बदली करून अन्याय केल्याचा दावा एका अंमलदाराने केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार न्यायाधीकरणाकडून याबाबत अधीक्षकांना विचारणा देखील झाली. न्यायाधीकरणाने केलेला पत्रव्यवहार विलंबाने वरिष्ठांपर्यंत पोहोचविल्याने एका महिला लिपिकाला पोलीस अधीक्षकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

....

सर्व बदल्यांची प्रक्रिया शासन निर्देशानुसारच पार पडलेली आहे. बदल्यांमुळे काही जण नाराज असू शकतात. त्यांना न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार आहे. मात्र, संपूर्ण प्रक्रिया नियमाप्रमाणेच राबविली आहे.

- आर. राजा, पोलीस अधीक्षक, बीड

...