शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

सहा तासांच्या अवधीमुळे बाजार सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:34 IST

जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान कडक लॉकडाऊन सुरू असून, या लॉकडाऊनच्या वेळेत शिथिलता देण्याबाबत विविध व्यापारी संघटना, व्यावसायिकांनी ...

जिल्ह्यात २६ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान कडक लॉकडाऊन सुरू असून, या लॉकडाऊनच्या वेळेत शिथिलता देण्याबाबत विविध व्यापारी संघटना, व्यावसायिकांनी मागणी केली होती. त्यानुसार मंगळवारपासून सहा तासांचा शिथिल वेळ दिल्याने सकाळपासूनच बाजारातील सर्व दुकाने, लहान-मोठे व्यवसाय सुरू झाले. काही ठिकाणी लोक अनावश्यक गर्दी करीत असल्याचे दिसून आले. प्रशासनाने सोशल डिस्टन्स व इतर नियमांचे पालन करण्याचे आवाहन करूनही नागरिकांमध्ये हलगर्जीपणा दिसून आला.

सवलत देऊनही दुकाने उघडी

दुपारी एक वाजेपर्यंतची वेळ असल्याने पोलिसांनी ध्वनिक्षेपकाद्वारे आवाहन करून दुकाने बंद करण्याची सूचना केली. सहा तासांची ढील देऊनही काही दुकाने सुरू होती. पोलिसांनी समज देऊन आणि प्रशासनाने सवलत देऊनही नियमांचे पालन न झाल्यास व्यापाऱ्यांना कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करून कोरोनाला रोखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.