शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

बीडमध्ये सहा जणांवर ‘आपत्ती’; १६ जनावरांसह ९०० कोंबड्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 18:01 IST

Rain in Beed : हजारो हेक्टर जमीन व पिके पाण्याखाली गेल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

बीड : जिल्ह्यात मागील तीन दिवसांत अतिवृष्टीमुळे मोठी जीवितहानी झाली. यात सहा जणांचा बुडून, वाहून गेल्याने मृत्यू झाला. तसेच १६ जनावरांसह ९०० कोंबड्या दगावल्या. मागील तीन दिवसांत तब्बल ७४ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. दिवस-रात्र पाऊस पडत असल्याने ६ मध्यम व ४२ लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तसेच गेवराई तालुक्यात तीन साठवण तलाव फुटले आहेत. धारूरमधील आरणवाडी तलावाचा सांडवा दुसऱ्यांदा फोडावा लागला. नद्या, नाल्यांसह ओढे खळखळून वाहून गेले. अनेक गावांत पाणी शिरले. हजारो हेक्टर जमीन व पिके पाण्याखाली गेल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने बुधवारी पाऊस कमी झाल्यानंतर पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या

दरम्यान, मागील तीन दिवसांत पावसाने सहा जणांचा बळी घेतला आहे. यात वडवणी तालुक्यातील तीन, माजलगावमधील २ व बीड व गेवराई तालुक्यातील एकाचा समावेश आहे. तसेच आष्टी तालुक्यात ११ जनावरे दगावली. ११० घरांची पडझड झाली. गेवराईत १ तर बीड तालुक्यात ४ जनावरे वाहून गेली. माजलगाव तालुक्यात कुक्कुटपालनमध्ये पाणी शिरल्याने ९०० कोंबड्या दगावल्या. पिकांच्या नुकसानीसह जीवितहानी झाली असून मदत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस