शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

बीडमध्ये सहा जणांवर ‘आपत्ती’; १६ जनावरांसह ९०० कोंबड्या दगावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 18:01 IST

Rain in Beed : हजारो हेक्टर जमीन व पिके पाण्याखाली गेल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

बीड : जिल्ह्यात मागील तीन दिवसांत अतिवृष्टीमुळे मोठी जीवितहानी झाली. यात सहा जणांचा बुडून, वाहून गेल्याने मृत्यू झाला. तसेच १६ जनावरांसह ९०० कोंबड्या दगावल्या. मागील तीन दिवसांत तब्बल ७४ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. यात पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात तीन दिवसांपासून पावसाने हाहाकार माजवला आहे. दिवस-रात्र पाऊस पडत असल्याने ६ मध्यम व ४२ लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. तसेच गेवराई तालुक्यात तीन साठवण तलाव फुटले आहेत. धारूरमधील आरणवाडी तलावाचा सांडवा दुसऱ्यांदा फोडावा लागला. नद्या, नाल्यांसह ओढे खळखळून वाहून गेले. अनेक गावांत पाणी शिरले. हजारो हेक्टर जमीन व पिके पाण्याखाली गेल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. प्रशासनाने बुधवारी पाऊस कमी झाल्यानंतर पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा - मराठवाड्यात का होतेय ढगफुटी ? हवेच्या ‘डाऊन ट्रॅप’चा नेमका संबंध किती, जाणून घ्या

दरम्यान, मागील तीन दिवसांत पावसाने सहा जणांचा बळी घेतला आहे. यात वडवणी तालुक्यातील तीन, माजलगावमधील २ व बीड व गेवराई तालुक्यातील एकाचा समावेश आहे. तसेच आष्टी तालुक्यात ११ जनावरे दगावली. ११० घरांची पडझड झाली. गेवराईत १ तर बीड तालुक्यात ४ जनावरे वाहून गेली. माजलगाव तालुक्यात कुक्कुटपालनमध्ये पाणी शिरल्याने ९०० कोंबड्या दगावल्या. पिकांच्या नुकसानीसह जीवितहानी झाली असून मदत करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊस