शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

जात बंधने तोडत निराधार मुलीसोबत बांधल्या रेशीमगाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 00:59 IST

मातृ-पितृ छत्र हरवलेल्या परजातीच्या निराधार मुलीसोबत संसाराची गाठ बांधून शहागड येथील लक्ष्मीकांत शेरकर याने नवा आदर्श ठेवला. मंगळवारी येथील सहयोगनगरमधील सर्वेश्वर गणपती मंदिरात लक्ष्मीकांत आणि मनिषाचा शुभमंगल सोहळा शेकडोंच्या उपस्थितीत विधिवत पार पडला.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : मातृ-पितृ छत्र हरवलेल्या परजातीच्या निराधार मुलीसोबत संसाराची गाठ बांधून शहागड येथील लक्ष्मीकांत शेरकर याने नवा आदर्श ठेवला. मंगळवारी येथील सहयोगनगरमधील सर्वेश्वर गणपती मंदिरात लक्ष्मीकांत आणि मनिषाचा शुभमंगल सोहळा शेकडोंच्या उपस्थितीत विधिवत पार पडला. रक्ताच्या नात्याने कोणीही नसलेले परंतु, माणुसकीचा धागा विणणाºयांकडून मिळालेले प्रेम यामुळे आयुष्यात उमेद हरवत असताना मनिषाला मोठा आधार झाला.

लहानपणातच आई - वडिलांचे निधन झाले, भाऊ ऊसतोड कामगार पण बहिणीचा सांभाळ करण्यास असमर्थ, कोणीही नातेवाईक सांभाळत नव्हते. आत्याचा आधार मिळाला पण तोही आयुष्यातील प्रश्न वाढविणारा ठरला, आत्याही देवाघरी गेली. अशा परिस्थितीत अध्यक्ष एस. बी. सय्यद यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत ग्रामीण विकास मंडळाची मदत मिळाली. तेथे दोन वर्षाच्या वास्तव्याने सक्षम बनल्यानंतर संस्थेने पितृत्वाची भूमिका पार पाडली. ग्रामीण विकास संस्थेच्या कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन केंद्रात कौटुंबिक अत्याचाराच्या प्रकरणात तडजोड करुन समेट घडविला जातो. समस्याग्रस्त महिला, मुलींचे समुपदेशन, मार्गदर्शन करुन पुनर्वसन केले जाते. अशाच समेट झालेल्या एका महिलेकडून मनिषाची माहिती कळाली. मनिषाला संस्थेच्या आश्रय अल्पमुदती निवासगृहात आणले. तेथून तिच्या नव्या जीवनपर्वाला सुरुवात झाली.

समुपदेशक उषा जाधव यांनी समुपदेशन करुन स्वावलंबी बनण्यासाठी मनिषाला टेलरींगचे प्रशिक्षण दिले. या कामात ती सक्षम बनली. नातेवाईक नसल्याने तिची पुनर्विवाहासाठी मानसिकता तयार केली. नंतर तिच्यासाठी सक्षम जोडीदार शोधणे सुरु झाले. जालना जिल्ह्यातील शहागड येथील लक्ष्मीकांत शेरकरचे वडिल शेती करतात. आई अंगणवाडी सेविका आहे. लक्ष्मीकांत औरंगाबाद येथे स्कूलबस चालकाची नोकरी करतो. भाऊ महेंद्र बीडमध्येच प्रज्ञाचक्षू अंध विद्यालयात नोकरी करतात. त्यांनी भावासाठी या संस्थेत विचारणा केली. मुलगा, मुलगी पाहण्याचा टप्पा झाला.

गृहभेटीनंतर दोघांची पसंती झाली. नंतर हा प्रस्ताव संस्थेच्या नेबरहूड व उपसमितीसमोर आला. नऊ सदस्यांच्या बैठकीत मनिषा व लक्ष्मण यांच्या विवाहाबाबत सर्वानुमते निर्णय होऊन परवानगी देण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांनी कन्यादानाची जबाबदारी सांभाळली. लक्ष्मीकांत कुटुंबियांनी लग्नसोहळ्याचे नियोजन केले.

सोमवारी अल्पमुदत निवासगृहात मनिषाच्या हळदीचा कार्यक्रम झाला. त्यावेळी दोन वर्षात जिवलग झालेल्या सखींच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मंगळवारी सर्वेश्वर गणपती मंदिरात महिला व बालकल्याण अधिकारी आर. डी. कुलकर्णी, एस. बी. सय्यद , सचिव टी. के. गायकवाड, सामाजिक कार्यकर्र्तेे गौतम खटोड, डॉ. पौर्णिमा यंदे, डॉ. हेमलता पाटील, अ‍ॅड. हेमा पिंपळे, मनिषा तोकले, तत्वशील कांबळे, अशोक तांगडे, सुशील खटोड यांच्यासह शहरातील सामाजिक चळवळीत कार्यरत संस्थांचे पदाधिकारी, शेरकर कुटुंबातील सर्व सदस्य, आश्रय निवासगृहातील मनिषाच्या मैत्रिणी, शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत मनिषा आणि लक्ष्मीकांतचा विवाह थाटात पार पडला. अनेकांनी नवदाम्पत्यांना शुभेच्छा दिल्या.

  1. ब्राह्मण समाजात मुलींची संख्या कमी असल्याने समाजापुढे आदर्श ठेवण्यासाठी आम्ही हे परिवर्तनवादी पाऊल कुटुंबातील सर्वांच्या संमतीने उचलले आहे. सामाजिक पातळीवर सर्वमान्यता मिळाल्याचा आनंद आहे.- महेंद्र वसंतराव शेरकर, (वर बंधू)
  2. माता आणि मातीच्या उन्नतीसाठी २२ वर्षांपासून आमची संस्था कार्यरत आहे. विघटीत कुटुंबांना एकत्र आणण्याइतका दुसरा आनंद नाही. आतापर्यंत संस्थेच्या माध्यमातून २० विवाह लावण्यात आले व त्यांचा संसार सुखात आहे. निराश्रितेला स्विकारुन लक्ष्मण व शेरकर कुटुंबाने समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे. समाजाने पुढाकार घेतल्यास अशा समस्याच राहणार नाहीत.- सय्यद एस.बी., अध्यक्ष,ग्रामीण विकास संस्था.
  3. सामाजिक पातळीवर विविध कारणांमुळे संकटे येतात. अशा भगिनींसाठी सर्व सामाजिक संस्थांनी पितृत्व, बंधुत्वाच्या भावनेतून पुढे आले पाहिजे, ही काळाची गरज आहे. शेरकर कुटुंबियांचे अभिनंदन.- गौतम खटोड, सामाजिक कार्यर्कर्ते, बीड