शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या बातम्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:30 IST

अंबाजोगाई : शहरातून गेलेल्या लातूरकडील महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा सर्व्हिस रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. ...

अंबाजोगाई : शहरातून गेलेल्या लातूरकडील महामार्गावरील सर्व्हिस रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. हा सर्व्हिस रस्ता मोठ्या प्रमाणात खचला आहे. मुख्य रस्त्यापासून सर्व्हिस रस्त्याची उंची कमी झाली आहे. तसेच त्या बाजूने उतार झाल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना मोठे अडथळे येत आहेत. दुचाकी चालकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. खराब झालेला हा सर्व्हिस रस्ता दुरुस्त करावा, अशी मागणी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष महादेव आदमाने यांनी केली आहे.

-----------

व्हॉल्व्हला गळती

अंबाजोगाई : शहरात अनेक ठिकाणी व्हॉल्व्हला गळती लागली आहे. ज्यावेळेस पाणी सोडण्यात येते. त्यावेळी या व्हॉल्व्हमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. एकीकडे नगर परिषद प्रशासन पाणी बचतीचे आवाहन करीत आहे, तर दुसरीकडे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात असल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ही गळती काढण्याबाबत संबंधित कंत्राटदाराला सूचना करूनही तो याकडे दुर्लक्ष करीत असल्याने पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होत आहे.

-----------

शहरातील रस्त्यांवर मोकाट जनावरे वाढली

अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यावर बसस्थानकासमोर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे. ही जनावरे मुख्य रस्त्यातही आजूबाजूच्या व्यापारी संकुलात घुसूनही त्या परिसरात घाण करतात. या मोकाट जनावरांची वर्दळ वाढली आहे. त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी व्यापाऱ्यांमधून होऊ लागली आहे.

------------

ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय

अंबाजोगाई : शासकीय व निमशासकीय व सहकारी बँकांमध्ये वृद्ध, महिला, वयोवृद्ध पेन्शनर व दिव्यांग व्यक्तींना योग्य सेवा मिळत नसल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीचा व अडचणींचा सामना करावा लागत आहे. सर्व बँकांना व आर्थिक संस्थांना ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र सोय करण्याच्या सूचना करूनही बँकांकडून याबाबत दुर्लक्ष केले जाते. परिणामी ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय वाढत आहे.

--------

प्लास्टिकमुळे शेतीच्या सुपीकतेला धोका

अंबाजोगाई : शेतीमध्ये चांगले उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेतात शेणखत टाकले जाते; परंतु या शेणखतामध्ये प्लास्टिक, काच व इतर काही वस्तू असतात. त्यामुळे शेतीच्या सुपीकतेला धोका पोहचत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात केवळ शेणखतच टाकावे. प्लास्टिक जर येत असेल तर असे प्लास्टिक शेणखताजवळ ठेवू नये, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

------------

रेतीचे दर वाढल्याने बांधकामात अडचणी

अंबाजोगाई : तालुक्यात गेल्या दोन वर्षांत रेतीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे बांधकाम करण्यास मोठ्या अचडणी येत आहेत. पंधरा ते सोळा हजार रुपयांना मिळणारी रेतीच्या गाडीसाठी आता ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत. वाळूच्या किमती दुपटीने वाढल्याने बांधकामात मोठ्या अडचणी येऊ लागल्या आहेत.