शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
5
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
6
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
7
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
8
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
9
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
10
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
11
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
12
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
13
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
14
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
15
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
16
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
17
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
18
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
19
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
20
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...

दुकानांच्या वेळा वाढवाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST

अंबेजोगाई : पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी सकाळीच शेतावर जात असून सायंकाळीच परत येतात. ...

अंबेजोगाई : पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी सकाळीच शेतावर जात असून सायंकाळीच परत येतात. मात्र, शासनाने दुकाने सुरू करण्याचा वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच ठेवल्याने, त्यांना काही जीवनावश्यक व इतर वस्तू घेण्यासाठी अडचण जाते. त्यामुळे ग्रामीण भागात दुकानाच्या वेळेत वाढ करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड.राजेश गुप्ता, गोपाळ धायगुडे, अतुल जाधव यांनी केली आहे.

पर्यटन केंद्रावर बंदोबस्त वाढवावा

अंबेजोगाई : अंबेजोगाई शहर व परिसरात अनेक ठिकाणी तलाव, धबधबे आदी पर्यटन केंद्रे आहेत. पावसाळ्यात तलाव व धबधबा ओसंडून वाहत असल्याने येथे अनेक जण फिरण्यासाठी जातात. अति उत्साहीपणामध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

पाणी साठविण्याची गरज

अंबेजोगाई : दरवर्षी अंबेजोगाई शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मोठा पाऊस होऊनही आठवड्यातून एकदा पाणी मिळते. मात्र, तरीही रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे नगरपरिषदेच्या वतीने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम आपल्या घरी करावा. मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास मदत होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.निशिकांत पाचेगावकर यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांची अडचण

अंबेजोगाई : पोलीस किंवा आर्मी भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जाण्याची इच्छा असते, अशी मुले एनसीसीमध्ये सहभागी होतात. काही जण आठवीपासून तर काही जण अकरावीपासून एनसीसीची निवड करतात. मात्र, कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे बहुतेक शाळा, महाविद्यालयात एनसीसीची परेड होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण होत असून, भविष्याची त्यांना चिंता सतावत आहे.

शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे गरजेचे

अंबेजोगाई : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते, परंतु ग्रामीण भागात कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाताच शेतकऱ्यांना सल्ला देतात, परंतु ग्रामीण भागातील शेतकरी कृषी विभागात जाऊन साधी माहिती घेत नाहीत, त्यामुळे कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे, तेव्हाच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.

एक खिडकी योजना राबवा

अंबेजोगाई : प्रत्यक्ष शाळा सुरू झाली नसली, तरी ऑनलाइन शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची गरज भासत आहे. शासनाने मागील काही वर्षांपूर्वी एक खिडकी ही योजना राबवून, शिक्षणासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देण्याची मोहीम राबविली होती. कोरोनाचा काळ असल्याने एक खिडकी मोहीम राबवावी, अशी मागणी ॲड.सुभाष शिंदे यांनी केली आहे.