शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

दुकानांच्या वेळा वाढवाव्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:30 IST

अंबेजोगाई : पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी सकाळीच शेतावर जात असून सायंकाळीच परत येतात. ...

अंबेजोगाई : पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. त्यामुळे शेतकरी सकाळीच शेतावर जात असून सायंकाळीच परत येतात. मात्र, शासनाने दुकाने सुरू करण्याचा वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंतच ठेवल्याने, त्यांना काही जीवनावश्यक व इतर वस्तू घेण्यासाठी अडचण जाते. त्यामुळे ग्रामीण भागात दुकानाच्या वेळेत वाढ करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड.राजेश गुप्ता, गोपाळ धायगुडे, अतुल जाधव यांनी केली आहे.

पर्यटन केंद्रावर बंदोबस्त वाढवावा

अंबेजोगाई : अंबेजोगाई शहर व परिसरात अनेक ठिकाणी तलाव, धबधबे आदी पर्यटन केंद्रे आहेत. पावसाळ्यात तलाव व धबधबा ओसंडून वाहत असल्याने येथे अनेक जण फिरण्यासाठी जातात. अति उत्साहीपणामध्ये अनेकांनी जीव गमावला आहे. त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी येथे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा, अशी मागणी होत आहे.

पाणी साठविण्याची गरज

अंबेजोगाई : दरवर्षी अंबेजोगाई शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. मोठा पाऊस होऊनही आठवड्यातून एकदा पाणी मिळते. मात्र, तरीही रेनवॉटर हार्वेस्टिंगबाबत जनजागृती करण्यात येत नाही. त्यामुळे नगरपरिषदेच्या वतीने याबाबत जनजागृती करणे गरजेचे आहे. सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम आपल्या घरी करावा. मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरेल आणि पाणी पातळी वाढण्यास मदत होईल, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ.निशिकांत पाचेगावकर यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांची अडचण

अंबेजोगाई : पोलीस किंवा आर्मी भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जाण्याची इच्छा असते, अशी मुले एनसीसीमध्ये सहभागी होतात. काही जण आठवीपासून तर काही जण अकरावीपासून एनसीसीची निवड करतात. मात्र, कोरोनामुळे शाळा महाविद्यालये बंद असून ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. त्यामुळे बहुतेक शाळा, महाविद्यालयात एनसीसीची परेड होत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण होत असून, भविष्याची त्यांना चिंता सतावत आहे.

शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे गरजेचे

अंबेजोगाई : शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे, यासाठी कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते, परंतु ग्रामीण भागात कृषी विभागातील अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर न जाताच शेतकऱ्यांना सल्ला देतात, परंतु ग्रामीण भागातील शेतकरी कृषी विभागात जाऊन साधी माहिती घेत नाहीत, त्यामुळे कृषी विभागाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांनी मार्गदर्शन करावे, तेव्हाच शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत होईल.

एक खिडकी योजना राबवा

अंबेजोगाई : प्रत्यक्ष शाळा सुरू झाली नसली, तरी ऑनलाइन शाळा सुरू झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध कागदपत्रांची गरज भासत आहे. शासनाने मागील काही वर्षांपूर्वी एक खिडकी ही योजना राबवून, शिक्षणासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे देण्याची मोहीम राबविली होती. कोरोनाचा काळ असल्याने एक खिडकी मोहीम राबवावी, अशी मागणी ॲड.सुभाष शिंदे यांनी केली आहे.