शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

धक्कादायक! जमिनीच्या वादातून महिलेचा खून; तीन महिन्यानंतर शेतात आढळला पुरलेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2022 17:07 IST

गावातील तिघे जमीन नावावर करून दे, अन्यथा जीवे मारू अशी धमकी देत

कडा (बीड) : जमिनी आमच्या नावावर करून दे, असे म्हणत एका ४२ वर्षीय महिलेचा खून करून मृतदेह तिच्याच शेतात पुरल्याचे तब्बल तीन महिन्यानंतर बुधवारी ( दि. २) उघडकीस आले. मंदा हरिभाऊ गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 

मंदा हरिभाऊ गायकवाड या बीड-कडा नगर राष्ट्रीय महामार्गावर वटणवाडी येथील रहिवासी आहेत. १६ वर्षांपूर्वी त्यांचा पती बेपत्ता झाला. त्यांना मुलबाळ नसून केवळ अंध सासू आहेत. हतबल असल्याची संधी साधत  भरत गायकवाड, प्रल्हाद घुमरे, सुनिल गांगर्डॅ हे तिघे मंदा यांना जमीन आमच्या नावावर करून दे, अन्यथा जीवे मारू, असे म्हणत दबाव आणत. मात्र, मंदा यांनी त्यास सपशेल नकार दिला. यानंतर ३ नोव्हेंबर २०२१ रोजी शेतात गेलेल्या मंदा या परतल्या नव्हत्या. यामुळे त्यांच्या भावाने पोलिसात संशयितांची नावे देऊन फिर्याद दिली. 

दरम्यान, बुधवारी ( दि. २ ) मंदा यांच्या शेतात कुत्र्यांनी जमिनीत पुरलेले एक प्रेत बाहेर काढले होते. हे काही शेतकऱ्यांचा लक्षात आले. त्यांनी लागलीच पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी शेतात धाव घेऊन मृतदेहाची ओळख पटवली. मृतदेह मंदा गायकवाड यांचा असल्याचे स्पष्ट झाले. मंदा यांच्या भावाच्या फिर्यादीवरून भरत गायकवाड, प्रल्हाद घुमरे, सुनिल गांगर्डॅ यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

आष्टी पोलिसांनी तिन्ही आरोपींना बुधवारी रात्री मोठ्या शिताफीने अटक केली. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, पोलीस उपनिरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी पाहणी केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड