शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
2
Arvind Kejriwal Pakistan: अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेवर थेट पाकिस्तानकडून आली प्रतिक्रिया, काय म्हणाले फवाद चौधरी?
3
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
4
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
5
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
6
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
7
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
8
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
9
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
10
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
11
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
12
स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काही मालिकांची वेळही बदलली
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर
14
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
15
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
16
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
17
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
18
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
19
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
20
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?

शॉक ! ६० लाख रुपये खर्चूनही जीव धोक्यातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2019 12:58 AM

वाकलेले खांब सरळ करणे, पडलेले खांब उभारणे, लोंबकाळलेल्या तारा ताणणेसह इतर दुरूस्तीच्या कामावर वर्षभरात तब्बल ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. एवढी उधळपट्टी करूनही खंडित वीज पुरवठा व अपघाताची भीती कायमच आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : वाकलेले खांब सरळ करणे, पडलेले खांब उभारणे, लोंबकाळलेल्या तारा ताणणेसह इतर दुरूस्तीच्या कामावर वर्षभरात तब्बल ६० लाख रुपयांची उधळपट्टी केल्याचे समोर आले आहे. एवढी उधळपट्टी करूनही खंडित वीज पुरवठा व अपघाताची भीती कायमच आहे. त्यामुळे महावितरणनकडून केवळ गुत्तेदार पोसण्याचे काम केले जात असल्याचे समोर येत आहे. पाच तालुक्यांतील खर्चाचा आकडा ऐकून आणि सुविधांचा अभाव पाहता सर्वसामान्यांनाही ‘शॉक’ बसला आहे.महावितरणकडून वर्षभर दुरूस्तीची कामे केली जातात. बीड विभागांतर्गत बीड शहरासह बीड ग्रामीण, आष्टी, पाटोदा, शिरूर व गेवराई तालुक्यांचा समावेश आहे. या पाच तालुक्यांत मागील वर्षभरात वाकलेले खांब, पडलेले खांब दुरूस्त करणे, लोंबकाळलेल्या तारा ताणने, रोहित्र संचासह वितरण पेटीची देखभाल करण्यासाठी तब्बल ६० लाख रुपये खर्च केल्याचे सांगण्यात आले. लाखो रुपयांची उधळपट्टी करूनही बीड शहरासह पाच तालुक्यांमधील खंडित वीज पुरवठा होण्याची परंपरा कायमच आहे. तसेच वाकलेले खांब, लोंबकळलेल्या तारा जैसे थे दिसून येतात. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.दरम्यान, महावितरणकडून मान्सूनपूर्व कामे केली जातात. यावरही खर्च केला जातो. असे असले तरी थोडेही वादळ आले किंवा पाऊस आला की तासनतास वीज पुरवठा खंडित होता. याचा फटका ग्राहकांना सहन करावा लागत आहे.प्रामाणिक ग्राहकांनी बीले भरूनही सुरळीत वीज पुरवठा होत नसल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी ग्राहकांमधून जोर धरू लागली आहे.गुत्तेदारांसोबत अधिकाऱ्यांचे साटेलोटेज्या गुत्तेदारांना दुरूस्तीसह इतर कामे दिले आहेत, त्यांच्याशी महावितरणच्या अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. कामाच्या एकुण रकमेच्या तुलनेत ५ ते १५ टक्के रक्कम काही अधिकारी घेत असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले. त्यामुळेच दुरूस्तीचे कामे निकृष्ट होत असल्याचे दिसून येत आहे.वादळ नसताना अन् वीजपुरवठा सुरू असताना तुटली तारसाधारण पंधरा दिवसांपूर्वी सहयोगनगर भागातील स्टेडियमकडे जाणाºया मुख्य रस्त्यावर सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास वीज पुरवठा सुरू असताना अचानक तार तुटून पडली. हा रस्ता तसा वर्दळीचा. सुदैवाने परिसरातील लोकांनी पाहिल्याने रस्ता अडविला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हाच प्रकार जर रात्रीच्या सुमारास झाला असता तर मोठी दुर्घटना घडली असती. त्यानंतरही महावितरण शहरातील तारा दुरूस्ती व तार ताणण्याबाबत जागरूक झाले नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजfundsनिधी