शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

शिवसेना, राष्टवादी कॉँग्रेसने मिळवली ‘हॅटट्रिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:25 IST

विधानसभा निवडणुकांना काही महिने अवकाश असला तरी बीड विधानसभा मतदार संघात मात्र राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देबीड विधानसभा मतदार संघ : नऊ निवडणुकांत कॉँग्रेस, कॉँग्रेस एस, जनता पक्षाला मिळाला एकदा विजय

सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विधानसभा निवडणुकांना काही महिने अवकाश असला तरी बीड विधानसभा मतदार संघात मात्र राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. १९७८ पासून आतापर्यंत नऊ निवडणुका झाल्या. पैकी राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेनेने तीन वेळा तर काँग्रेस, काँग्रेस (अर्स) आणि जनता पक्षाने प्रत्येकी एक वेळेस या मतदार संघात विजय संपादन केला आहे.बीड विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ३० हजार ६१९ मतदार असून यापैकी १ लाख ७६ हजार ७१४ पुरुष, १ लाख ५३ हजार ९०० महिला तर ५ मतदार तृतीयपंथी आहेत. जवळपास सर्वच पक्षांना या मतदार संघाने विजयश्री देऊन नेतृत्त्व करण्याची संधी दिली आहे. राष्टÑवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर आणि शिवसेनेचे प्रा. सुरेश नवले हे लागोपाठ दुसऱ्यांदा विजयी झाले. परंतु, १९९० मध्ये नवले यांनी अपक्ष उमेदवार माजी आ. राजेंद्र जगताप यांचा १४ हजार मतांनी तर १९९५ मध्ये त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा २६ हजार ६९१ मतांनी पराभव केला होता. तिसऱ्यांदा म्हणजे १९९९ मध्ये ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले परंतु पराभूत झाले. जयदत्त क्षीरसागर यांनी २००९ मध्ये शिवसेनेचे सुनिल धांडे यांचा जवळपास ७५ हजार मतांनी तर २०१४ मध्ये जिल्ह्यात नरेंद्र मोदी लाट असतानाही भाजपाच्या तिकिटावर उभे टाकलेल्या शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा जवळपास सहा हजार मतांनी पराभव केला. आता ते शिवसेनेत येऊन मंत्री झाले आहेत.सर्वच पक्षांना आघाडी, युतीच्या माध्यमातून या मतदारसंघाने निवडून दिले परंतु, अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. एकेकाळी येथील तेल उद्योग प्रगती पथावर होता, मोठी आर्थिक उलाढाल होत असे, थोड्याफार प्रमाणात रोजगार निर्माण होत असे परंतु, तो आता डबघाईला आला आहे. आजही बीड शहर प्राथमिक नागरी सुविधातच अडकले आहे. केवळ नगर पालिकेची यंत्रणा कुचकामी असल्यामुळे शहरवासियांना १५-१५ दिवस पाणी मिळत नाही. अमृत पेयजल योजनेचे अधिक गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. भूमीगत गटार योजना मंजूर झाली परंतु ती सुरू कधी होणार हा एक प्रश्न आहे. पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे शहरातील रस्ते फोडले आहेत. याचवेळी जर गटार योजनेचे काम हाती घेतले तर पुन्हा पुन्हा रस्त्याची फोडाफोडी होणार नाही.सामान्य रुग्णालयाच्या वाढीव खाटाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. हे कामदेखील लवकर पूर्ण झाले तर त्याचा रुग्णांना फायदा होईल. बीड बायपासमुळे अनेक गावांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. औद्योगिक विकास रखडला आहे. रेल्वेमार्गाचे काम पूर्ण न झाल्यामुळे नवीन प्रकल्प येणार नाहीत. हा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचा आहे.

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस