शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, राष्टवादी कॉँग्रेसने मिळवली ‘हॅटट्रिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:25 IST

विधानसभा निवडणुकांना काही महिने अवकाश असला तरी बीड विधानसभा मतदार संघात मात्र राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देबीड विधानसभा मतदार संघ : नऊ निवडणुकांत कॉँग्रेस, कॉँग्रेस एस, जनता पक्षाला मिळाला एकदा विजय

सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विधानसभा निवडणुकांना काही महिने अवकाश असला तरी बीड विधानसभा मतदार संघात मात्र राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. १९७८ पासून आतापर्यंत नऊ निवडणुका झाल्या. पैकी राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेनेने तीन वेळा तर काँग्रेस, काँग्रेस (अर्स) आणि जनता पक्षाने प्रत्येकी एक वेळेस या मतदार संघात विजय संपादन केला आहे.बीड विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ३० हजार ६१९ मतदार असून यापैकी १ लाख ७६ हजार ७१४ पुरुष, १ लाख ५३ हजार ९०० महिला तर ५ मतदार तृतीयपंथी आहेत. जवळपास सर्वच पक्षांना या मतदार संघाने विजयश्री देऊन नेतृत्त्व करण्याची संधी दिली आहे. राष्टÑवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर आणि शिवसेनेचे प्रा. सुरेश नवले हे लागोपाठ दुसऱ्यांदा विजयी झाले. परंतु, १९९० मध्ये नवले यांनी अपक्ष उमेदवार माजी आ. राजेंद्र जगताप यांचा १४ हजार मतांनी तर १९९५ मध्ये त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा २६ हजार ६९१ मतांनी पराभव केला होता. तिसऱ्यांदा म्हणजे १९९९ मध्ये ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले परंतु पराभूत झाले. जयदत्त क्षीरसागर यांनी २००९ मध्ये शिवसेनेचे सुनिल धांडे यांचा जवळपास ७५ हजार मतांनी तर २०१४ मध्ये जिल्ह्यात नरेंद्र मोदी लाट असतानाही भाजपाच्या तिकिटावर उभे टाकलेल्या शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा जवळपास सहा हजार मतांनी पराभव केला. आता ते शिवसेनेत येऊन मंत्री झाले आहेत.सर्वच पक्षांना आघाडी, युतीच्या माध्यमातून या मतदारसंघाने निवडून दिले परंतु, अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. एकेकाळी येथील तेल उद्योग प्रगती पथावर होता, मोठी आर्थिक उलाढाल होत असे, थोड्याफार प्रमाणात रोजगार निर्माण होत असे परंतु, तो आता डबघाईला आला आहे. आजही बीड शहर प्राथमिक नागरी सुविधातच अडकले आहे. केवळ नगर पालिकेची यंत्रणा कुचकामी असल्यामुळे शहरवासियांना १५-१५ दिवस पाणी मिळत नाही. अमृत पेयजल योजनेचे अधिक गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. भूमीगत गटार योजना मंजूर झाली परंतु ती सुरू कधी होणार हा एक प्रश्न आहे. पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे शहरातील रस्ते फोडले आहेत. याचवेळी जर गटार योजनेचे काम हाती घेतले तर पुन्हा पुन्हा रस्त्याची फोडाफोडी होणार नाही.सामान्य रुग्णालयाच्या वाढीव खाटाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. हे कामदेखील लवकर पूर्ण झाले तर त्याचा रुग्णांना फायदा होईल. बीड बायपासमुळे अनेक गावांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. औद्योगिक विकास रखडला आहे. रेल्वेमार्गाचे काम पूर्ण न झाल्यामुळे नवीन प्रकल्प येणार नाहीत. हा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचा आहे.

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस