शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना, राष्टवादी कॉँग्रेसने मिळवली ‘हॅटट्रिक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2019 00:25 IST

विधानसभा निवडणुकांना काही महिने अवकाश असला तरी बीड विधानसभा मतदार संघात मात्र राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.

ठळक मुद्देबीड विधानसभा मतदार संघ : नऊ निवडणुकांत कॉँग्रेस, कॉँग्रेस एस, जनता पक्षाला मिळाला एकदा विजय

सतीश जोशी ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : विधानसभा निवडणुकांना काही महिने अवकाश असला तरी बीड विधानसभा मतदार संघात मात्र राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. १९७८ पासून आतापर्यंत नऊ निवडणुका झाल्या. पैकी राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेनेने तीन वेळा तर काँग्रेस, काँग्रेस (अर्स) आणि जनता पक्षाने प्रत्येकी एक वेळेस या मतदार संघात विजय संपादन केला आहे.बीड विधानसभा मतदार संघात एकूण ३ लाख ३० हजार ६१९ मतदार असून यापैकी १ लाख ७६ हजार ७१४ पुरुष, १ लाख ५३ हजार ९०० महिला तर ५ मतदार तृतीयपंथी आहेत. जवळपास सर्वच पक्षांना या मतदार संघाने विजयश्री देऊन नेतृत्त्व करण्याची संधी दिली आहे. राष्टÑवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर आणि शिवसेनेचे प्रा. सुरेश नवले हे लागोपाठ दुसऱ्यांदा विजयी झाले. परंतु, १९९० मध्ये नवले यांनी अपक्ष उमेदवार माजी आ. राजेंद्र जगताप यांचा १४ हजार मतांनी तर १९९५ मध्ये त्यांनी जयदत्त क्षीरसागर यांचा २६ हजार ६९१ मतांनी पराभव केला होता. तिसऱ्यांदा म्हणजे १९९९ मध्ये ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरले परंतु पराभूत झाले. जयदत्त क्षीरसागर यांनी २००९ मध्ये शिवसेनेचे सुनिल धांडे यांचा जवळपास ७५ हजार मतांनी तर २०१४ मध्ये जिल्ह्यात नरेंद्र मोदी लाट असतानाही भाजपाच्या तिकिटावर उभे टाकलेल्या शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचा जवळपास सहा हजार मतांनी पराभव केला. आता ते शिवसेनेत येऊन मंत्री झाले आहेत.सर्वच पक्षांना आघाडी, युतीच्या माध्यमातून या मतदारसंघाने निवडून दिले परंतु, अपेक्षेप्रमाणे विकास झाला नाही. एकेकाळी येथील तेल उद्योग प्रगती पथावर होता, मोठी आर्थिक उलाढाल होत असे, थोड्याफार प्रमाणात रोजगार निर्माण होत असे परंतु, तो आता डबघाईला आला आहे. आजही बीड शहर प्राथमिक नागरी सुविधातच अडकले आहे. केवळ नगर पालिकेची यंत्रणा कुचकामी असल्यामुळे शहरवासियांना १५-१५ दिवस पाणी मिळत नाही. अमृत पेयजल योजनेचे अधिक गतीने पूर्ण होणे गरजेचे आहे. भूमीगत गटार योजना मंजूर झाली परंतु ती सुरू कधी होणार हा एक प्रश्न आहे. पाणी पुरवठा योजनेच्या कामामुळे शहरातील रस्ते फोडले आहेत. याचवेळी जर गटार योजनेचे काम हाती घेतले तर पुन्हा पुन्हा रस्त्याची फोडाफोडी होणार नाही.सामान्य रुग्णालयाच्या वाढीव खाटाच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. हे कामदेखील लवकर पूर्ण झाले तर त्याचा रुग्णांना फायदा होईल. बीड बायपासमुळे अनेक गावांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. औद्योगिक विकास रखडला आहे. रेल्वेमार्गाचे काम पूर्ण न झाल्यामुळे नवीन प्रकल्प येणार नाहीत. हा प्रकल्प पूर्ण होणे गरजेचा आहे.

टॅग्स :BeedबीडPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस