शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बीडमध्ये तासाभरातच संपते शिवभोजन; मर्यादित सेवा असल्याने अनेकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 11:53 IST

प्रतिदिन ८० ताटांचीच मर्यादा असल्याने १२ ते १ या वेळेतच शिवभोजनाचा कोटा संपून जातो.

ठळक मुद्देबीडमध्ये ११ दिवसांत केवळ ८८० गरजूंनाच मिळाला लाभ

बीड :  राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेला २६ जानेवारीपासून सुरूवात झाली. बीडमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू केलेल्या केंद्रावर दररोज अवघ्या एका तासातच शिवभोजन संपून जाते. त्यामुळे तृप्तीसाठी आलेल्या सामान्य गरजूंना आल्या पावली परतावे लागत आहे. गेल्या ११ दिवसांत केवळ ८८० गरजू लाभार्थीच या शिवभोजनाचा लाभ घेऊ शकले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवभोजन केंद्राचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री तथा  पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. या योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजूंना गुणवत्ता राखून  केवळ १० रुपयांत ताजे भोजन देण्याची योजना आहे. बीडमधील केंद्रावर योजना सुरू होऊन ११ दिवस झाले आहेत. मात्र प्रतिदिन ८० ताटांचीच मर्यादा असल्याने १२ ते १ या वेळेतच शिवभोजनाचा कोटा संपून जातो. या केंद्रावर भोजन मिळण्याची वेळ ही दुपारी १२ ते २ वाजेची आहे. मात्र, सकाळी ११ वाजेपासूनच यासाठी गरजू प्रतीक्षा करतात. आॅनलाईन लिंक सुरु होताच रांगेतील व्यक्तीचा फोटो काढून त्याचे नाव, आधार क्रमांक नोंदल्यानंतर शिवभोजन अ‍ॅपद्वारे केंद्र चालकाला टोकन दिले जाते. त्यानंतर नोंदीत गरजूला टोकन क्रमांकानुसार दहा रूपयात शिवभोजन थाळी दिली जाते. आलेल्या पहिल्या ८० गरजूंना याचा लाभ मिळतो आणि तासाभरातच ते संपते. त्यामुळे नंतर आलेल्यांना ‘शिवभोजन संपले’ असे उत्तर मिळते. परिणामी, हिरमुसलेपणाने त्यांना आल्या पाऊली परतावे लागते आणि जेवणाची पर्यायी व्यवस्था करावी लागते. बीड येथील शिवभोजन केंद्राच्या परिसरात अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे गरजू तसेच विद्यार्थी येथे येतात; परंतु तासाभरात शिवभोजनाचा कोटा संपत असल्याने त्यांच्या पदरी निराशा पडते. 

अशी आहे शिवभोजन थाळीशिवभोजन थाळीमध्ये ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅमचा एक मूद भात, १०० ग्रॅमच्या एक वाटी वरणाचा समावेश असून दुपारी १२ ते २ या कालावधीत शिवभोजन देण्याचे निर्देश आहेत.

सेंटरवर सकाळी अकरा ते साडेअकरादरम्यान शिवभोजनासाठी ग्राहक येतात. ८० ताटांचीच सध्या मर्यादा आहे. शिवभोजन अ‍ॅपवर नोंदणीनंतर टोकनप्रमाणे संबंधित लाभार्थ्याला थाळी  दिली जाते. तांत्रिक अडचणी आलेल्या नाहीत. - योगेश शिंदे, शिवभोजन केंद्र. 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयBeedबीडfoodअन्न