शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

बीडमध्ये तासाभरातच संपते शिवभोजन; मर्यादित सेवा असल्याने अनेकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 11:53 IST

प्रतिदिन ८० ताटांचीच मर्यादा असल्याने १२ ते १ या वेळेतच शिवभोजनाचा कोटा संपून जातो.

ठळक मुद्देबीडमध्ये ११ दिवसांत केवळ ८८० गरजूंनाच मिळाला लाभ

बीड :  राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी शिवभोजन योजनेला २६ जानेवारीपासून सुरूवात झाली. बीडमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू केलेल्या केंद्रावर दररोज अवघ्या एका तासातच शिवभोजन संपून जाते. त्यामुळे तृप्तीसाठी आलेल्या सामान्य गरजूंना आल्या पावली परतावे लागत आहे. गेल्या ११ दिवसांत केवळ ८८० गरजू लाभार्थीच या शिवभोजनाचा लाभ घेऊ शकले आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवभोजन केंद्राचे उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री तथा  पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते झाले. या योजनेच्या माध्यमातून गरीब व गरजूंना गुणवत्ता राखून  केवळ १० रुपयांत ताजे भोजन देण्याची योजना आहे. बीडमधील केंद्रावर योजना सुरू होऊन ११ दिवस झाले आहेत. मात्र प्रतिदिन ८० ताटांचीच मर्यादा असल्याने १२ ते १ या वेळेतच शिवभोजनाचा कोटा संपून जातो. या केंद्रावर भोजन मिळण्याची वेळ ही दुपारी १२ ते २ वाजेची आहे. मात्र, सकाळी ११ वाजेपासूनच यासाठी गरजू प्रतीक्षा करतात. आॅनलाईन लिंक सुरु होताच रांगेतील व्यक्तीचा फोटो काढून त्याचे नाव, आधार क्रमांक नोंदल्यानंतर शिवभोजन अ‍ॅपद्वारे केंद्र चालकाला टोकन दिले जाते. त्यानंतर नोंदीत गरजूला टोकन क्रमांकानुसार दहा रूपयात शिवभोजन थाळी दिली जाते. आलेल्या पहिल्या ८० गरजूंना याचा लाभ मिळतो आणि तासाभरातच ते संपते. त्यामुळे नंतर आलेल्यांना ‘शिवभोजन संपले’ असे उत्तर मिळते. परिणामी, हिरमुसलेपणाने त्यांना आल्या पाऊली परतावे लागते आणि जेवणाची पर्यायी व्यवस्था करावी लागते. बीड येथील शिवभोजन केंद्राच्या परिसरात अनेक शासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे गरजू तसेच विद्यार्थी येथे येतात; परंतु तासाभरात शिवभोजनाचा कोटा संपत असल्याने त्यांच्या पदरी निराशा पडते. 

अशी आहे शिवभोजन थाळीशिवभोजन थाळीमध्ये ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅमचा एक मूद भात, १०० ग्रॅमच्या एक वाटी वरणाचा समावेश असून दुपारी १२ ते २ या कालावधीत शिवभोजन देण्याचे निर्देश आहेत.

सेंटरवर सकाळी अकरा ते साडेअकरादरम्यान शिवभोजनासाठी ग्राहक येतात. ८० ताटांचीच सध्या मर्यादा आहे. शिवभोजन अ‍ॅपवर नोंदणीनंतर टोकनप्रमाणे संबंधित लाभार्थ्याला थाळी  दिली जाते. तांत्रिक अडचणी आलेल्या नाहीत. - योगेश शिंदे, शिवभोजन केंद्र. 

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालयBeedबीडfoodअन्न