शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सत्र सुरूच; जिल्हा रुग्णालयात पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:38 IST

बीड : जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्यूसत्र गुरुवारीही कायम होते. गुरुवारी पुन्हा सात मृत्यूंची नोंद झाली. यात जिल्हा रुग्णालयात उपचार ...

बीड : जिल्ह्यात कोरोनामुळे होणारे मृत्यूसत्र गुरुवारीही कायम होते. गुरुवारी पुन्हा सात मृत्यूंची नोंद झाली. यात जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पाच रुग्णांचा समावेश आहे. तसेच १५४ नवे रुग्ण आढळले तर १४१ जणांनी काेरोनावर मात केली. वाढती रुग्णसंख्या मृत्यूसत्र कायम राहिल्याने चिंता व्यक्त होत आहे.

राज्यात रुग्णसंख्या कमी होत असल्याने निर्बंध उठविले जात आहेत. असे असले तरी बीड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्याचे दिसते. रोज १०० ते १५० पेक्षा जास्त रुग्ण आढळत असून ५ पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू हाेत आहे. त्यातच आता रुग्णसंख्या कमी झाल्याचे कारण सांगत मनुष्यबळ कमी केले जात आहे. त्यामुळे उपचाराबद्दलच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. गुरुवारी नोंदवलेल्या सातपैकी पाच मृत्यू हे एकट्या जिल्हा रुग्णालयातील असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तर दुसऱ्या बाजूला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्याकडून केवळ कागदोपत्री राऊंड घेतला जात आहे. त्यांच्या राऊंडने डॉक्टर, कर्मचाऱ्यांना काहीच फरक पडत नसल्याचे यापूर्वीही उघड झालेले आहे. वॉर्डात काही कामचुकार डॉक्टर, कर्मचारी आजही रुग्णसेवेत हलगर्जी करत असल्याचे दिसते. त्यांच्यावर कारवाई करण्यास मात्र सीएस व एसीएस आखडता हात घेत आहेत. केवळ कारवाईचा इशारा देऊन वेळ मारून नेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत असून कामचुकारांना अभय मिळत आहे.

येथे आढळले नवे रुग्ण

कोरोना संशयित असलेल्या ६ हजार ५९० लोकांचे गुरुवारी अहवाल प्राप्त झाले. यात १५४ पॉझिटिव्ह आढळले. यात अंबाजोगाई २, आष्टी ५६, बीड १७, धारूर ८, गेवराई १२, केज ११, माजलगाव ७, पाटोदा १६, शिरूर १६, वडवणी ९ येथील रुग्णांचा समावेश आहे. आता एकूण बाधितांचा आकडा ९९ हजार ३२७ एवढा झाला आहे. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ९४ हजार ६२० एवढी असून २ हजार ६६६ जणांचा मृत्यू झाला आहे.