शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

१७ ऑगस्टपासून मुलांना शाळेत पाठवायचे का? पालक संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST

बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोविडमुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीपर्यंच्या शाळा सुरू करण्यास परवनागी दिल्यानंतर जिल्ह्यात १५ जुलैपासून व ...

बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोविडमुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीपर्यंच्या शाळा सुरू करण्यास परवनागी दिल्यानंतर जिल्ह्यात १५ जुलैपासून व नंतर एकूण २८६ शाळा सुरू झाल्याची नोंद शिक्षण विभागाकडे आहे. त्यातील ९२ शाळा संबंधित गावात कोविडचे रुग्ण आढळल्याने बंद झल्या. शहरी भागातील शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे तर ग्रामीण भागात शाळा सुरू असल्या तरी उपस्थिती अत्यंत कमी आहे. आठवी ते दहावीच्या वर्गांना फारसा प्रतिसाद नसताना आता १७ ऑगस्टपासून पहिली ते सातवीचेही वर्ग सुरू होणार आहेत. त्यातच आष्टी, पाटोदा, शिरूर आणि गेवराई तालुक्यात रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासाने निर्बंध कडक केले आहेत. त्यातच डेल्टा व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आल्यानंतर पुन्हा धास्ती निर्माण झाली. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे का? याबाबत पालक संभ्रमात आहेत.

१) जिल्ह्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा - ८४३

१७ ऑगस्टला सुरू किती होणार - पाचवी ते सातवीच्या १५०

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी ?

पहिली - ४४८७७

दुसरी - ५०७९०

तिसरी - ५३२९७

चौथी - ४८८९५

पाचवी - ५२८३३

सहावी - ५२८९७

सातवी - ५२०१४

आठवी ते बारावीला अल्प प्रतिसाद

आठवी ते बारावीच्या एकूण शाळा - ९६२

सुरू झालेल्या शाळा - २८६

सुरू होऊन बंद झालेल्या शाळा -९२

एकूण विद्यार्थी - २,२६, ६९५

विद्यार्थ्यांची उपस्थिती (९ ऑगस्ट) - २६२२

--------------

पालकांना मुलांच्या आरोग्याची चिंता

बीड जिल्ह्यात कोरोनाची साथ अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. मोठ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. लहान मुलांचे लसीकरण सुरू नाही. शाळा बंद आणि मुले घरीच असले तरी नाईलाज आहे. शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. कोरोनाची साथ पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत धोका न पत्करलेले बरे राहील.

- मधुकर बांदल, पालक, शिरूर कासार.

------

कोरोनामुळे सर्वच घटक त्रस्त झाले. त्यात शैक्षणिक नुकसानही झाले. दीड वर्षांपासून मुले घरातच आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होत आहे. ऑनलाइन शिक्षण प्रभावी ठरू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. कोरोनाही नियंत्रणात आल्याने शाळा सुरू व्हायला पाहिजे. - सीताराम बांगड, पालक, बीड.

-----------------