शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

१७ ऑगस्टपासून मुलांना शाळेत पाठवायचे का? पालक संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:37 IST

बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोविडमुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीपर्यंच्या शाळा सुरू करण्यास परवनागी दिल्यानंतर जिल्ह्यात १५ जुलैपासून व ...

बीड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कोविडमुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीपर्यंच्या शाळा सुरू करण्यास परवनागी दिल्यानंतर जिल्ह्यात १५ जुलैपासून व नंतर एकूण २८६ शाळा सुरू झाल्याची नोंद शिक्षण विभागाकडे आहे. त्यातील ९२ शाळा संबंधित गावात कोविडचे रुग्ण आढळल्याने बंद झल्या. शहरी भागातील शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण सुरू आहे तर ग्रामीण भागात शाळा सुरू असल्या तरी उपस्थिती अत्यंत कमी आहे. आठवी ते दहावीच्या वर्गांना फारसा प्रतिसाद नसताना आता १७ ऑगस्टपासून पहिली ते सातवीचेही वर्ग सुरू होणार आहेत. त्यातच आष्टी, पाटोदा, शिरूर आणि गेवराई तालुक्यात रुग्णसंख्या वाढल्याने प्रशासाने निर्बंध कडक केले आहेत. त्यातच डेल्टा व्हेरिएंटचा रुग्ण आढळून आल्यानंतर पुन्हा धास्ती निर्माण झाली. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवायचे का? याबाबत पालक संभ्रमात आहेत.

१) जिल्ह्यात पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा - ८४३

१७ ऑगस्टला सुरू किती होणार - पाचवी ते सातवीच्या १५०

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी ?

पहिली - ४४८७७

दुसरी - ५०७९०

तिसरी - ५३२९७

चौथी - ४८८९५

पाचवी - ५२८३३

सहावी - ५२८९७

सातवी - ५२०१४

आठवी ते बारावीला अल्प प्रतिसाद

आठवी ते बारावीच्या एकूण शाळा - ९६२

सुरू झालेल्या शाळा - २८६

सुरू होऊन बंद झालेल्या शाळा -९२

एकूण विद्यार्थी - २,२६, ६९५

विद्यार्थ्यांची उपस्थिती (९ ऑगस्ट) - २६२२

--------------

पालकांना मुलांच्या आरोग्याची चिंता

बीड जिल्ह्यात कोरोनाची साथ अद्याप पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. मोठ्यांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही. लहान मुलांचे लसीकरण सुरू नाही. शाळा बंद आणि मुले घरीच असले तरी नाईलाज आहे. शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचा जीव महत्त्वाचा आहे. कोरोनाची साथ पूर्णपणे आटोक्यात येईपर्यंत धोका न पत्करलेले बरे राहील.

- मधुकर बांदल, पालक, शिरूर कासार.

------

कोरोनामुळे सर्वच घटक त्रस्त झाले. त्यात शैक्षणिक नुकसानही झाले. दीड वर्षांपासून मुले घरातच आहेत. त्यामुळे त्यांच्या मानसिकतेवरही परिणाम होत आहे. ऑनलाइन शिक्षण प्रभावी ठरू शकत नाही. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवरही परिणाम झाला आहे. कोरोनाही नियंत्रणात आल्याने शाळा सुरू व्हायला पाहिजे. - सीताराम बांगड, पालक, बीड.

-----------------