शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

‘कारखान्यांची साखर विकून एफआरपीची रक्कम वसूल करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:14 IST

गाळपानंतर १४ दिवसांच्या आत ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम अद्याप न देणाऱ्या जिल्ह्यातील वैद्यनाथ, लोकनेते सुंदरराव सोळंके, जयभवानी आणि एनएसएल शुगर्स जय महेश या चार साखर कारखान्यांची साखर, मोलॅसिस आणि बगॅस विकून जमा रकमेतून महसुलाची थकबाकी समजुन वसूल करण्याचे आदेश राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गाळपानंतर १४ दिवसांच्या आत ऊस उत्पादकांना एफआरपीची रक्कम अद्याप न देणाऱ्या जिल्ह्यातील वैद्यनाथ, लोकनेते सुंदरराव सोळंके, जयभवानी आणि एनएसएल शुगर्स जय महेश या चार साखर कारखान्यांची साखर, मोलॅसिस आणि बगॅस विकून जमा रकमेतून महसुलाची थकबाकी समजुन वसूल करण्याचे आदेश राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत. वसुलीची कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाºयांना प्राधिकृत करण्यात आले आहे.२०१८-१९ च्या गाळप हंगामातील एफआरपीची रक्कम साखर कारखान्यांकडून ऊस उत्पादकांना मिळाली नाही. याप्रश्नी विविध शेतकरी संघटनांनी आंदोलने केली. त्या त्या वेळी जनभावना लक्षात घेत साखर आयुक्त व प्रादेशिक सहसंचालकांनी संबंधित कारखान्यांना समजही दिलेली आहे. ऊस नियंत्रण कायद्यानुसार गाळपानंतर १४ दिवसांच्या आत ऊस पुरवठादारांना उसाची किंमत मिळणे बंधनकारक आहे.वैद्यनाथ कारखान्याने १६ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान १ लाख ६३ हजार ३१० मेट्रीक टन उसाचे गाळप केले. याची एफआरपी रक्कम ३२ कोटी ६४ लाख रुपये आहे, जी ऊस उत्पादकांना अदा केलेली नाही. जयभवानी कारखान्याने २३ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबर कालावधीत १९२ हजार १९१ मेट्रीक टन उसाचे गाळप केले. या पैकी ९ कोटी ४६ लाख रुपये ऊस उत्पादकांना अदा केले. मात्र या कारखान्याकडे २८ कोटी ९० लाख रुपये १५ टक्के व्याजासह थकित आहे.एनएसएल शुगर्स जयमहेश कारखान्याने १७ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान २ लाख ७२ हजार ८७६ मे. टन उसाचे गाळप केले. या कारखान्याने एफआरपीच्या ५८ कोटींपैकी १३ कोटी २८ लाख रुपये अदा केले तर ४५ कोटी ५३ लाख रुपये व्याजासह थकित आहे. तर लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याने २४ आॅक्टोबर ते ३१ डिसेंबरपर्यंत ३ लाख २४ हजार ३६४ मे. टन उसाचे गाळप केले. एफआरपीची देय रक्कम ६४ कोटी ६ लाखापैकी ४७ कोटी ९३ लाख रुपये अदा केले. तर १६ कोटी १३ लाख रुपये व्याजासह थकित आहे. नियमानुसार एफआरपी अदा करण्याबाबत साखर आयुक्तांनी सुनावणी घेतली. तरीही कसूर केल्याने हे कारखाने कारवाईस पात्र ठरले.

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेcommissionerआयुक्त