शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

बाप्पांना निरोप द्या साध्या पद्धतीनेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:37 IST

बीड: दहा दिवस मुक्कामी असलेल्या लाडक्या गणरायाला १९ सप्टेंबर रोजी निरोप दिला जाणार आहे. दरवर्षी ढोल ताशांचा गजर, भव्य ...

बीड: दहा दिवस मुक्कामी असलेल्या लाडक्या गणरायाला १९ सप्टेंबर रोजी निरोप दिला जाणार आहे. दरवर्षी ढोल ताशांचा गजर, भव्य मिरवणूक काढून मूर्ती विसर्जन केले जायचे; मात्र यंदा देखील कोरोना निर्बंधामुळे साध्या पद्धतीनेच बाप्पांना निराेप द्यावा लागणार आहे.

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्याने निर्बंध काहीसे शिथिल झाले.

१० सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन झाले होते; मात्र गणेशोत्सव साध्या पद्धतीनेच साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीचे मंडपात जाऊन तसेच मुखदर्शन घेण्यासही परवानगी नव्हती. त्यामुळे यंदा सार्वजनिक मंडळांची संख्याही कमी होती. दरम्यान, १९ सप्टेंबर रोजी मिरवणूक न काढता केवळ मंडळ पदाधिकाऱ्यांनी (दहा जणांच्या मर्यादेत)

गणेश विसर्जन करावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मिरवणूक न काढता साधेपणाने 'श्रीं'ना निरोप द्यावा लागणार असल्याने भक्तांचा काहीसा हिरमोड झाला आहे.

दरम्यान, बीडमध्ये कंकालेश्वर मंदिराजवळील विहीर व खंडेश्वरी देवी मंदिराजवळील बारवात मूर्ती विसर्जन करण्यात येणार आहे. निर्माल्य टाकण्याची सुविधा येथे पालिकेने उपलब्ध केली आहे.

.....

शहरात दोन ठिकाणी विसर्जनस्थळ तयार केले आहेत. या परिसरातील स्वच्छता करण्यासह मार्गावरील खड्डेही बुजविणे सुरू आहेत. पालिकेकडून ठिकठिकाणी कर्मचारी नियुक्त केले असून निर्माल्य जमा करण्यासाठीही स्वतंत्र यंत्रणा आहे.

- डॉ.उत्कर्ष गुट्टे, मुख्याधिकारी, नगर परिषद, बीड