शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘पाणी वाचवा, प्राणी वाचवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:56 IST

पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे गरजेचे आहे. वन्यजीवांच्या रक्षणात पर्यावरणाचा समतोल राखला जातो. येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राने वन्यजीवांचे पुनर्वसन करत ‘जीवो जीवस्य जीवनम’ मंत्र जपला आहे.

ठळक मुद्देसर्पराज्ञी संस्थेने १६ हजार वन्य जिवांना दिले जीवदान ; दुष्काळी गावे होताहेत पाणीदार

विजयकुमार गाडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार : पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे गरजेचे आहे. वन्यजीवांच्या रक्षणात पर्यावरणाचा समतोल राखला जातो. येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राने वन्यजीवांचे पुनर्वसन करत ‘जीवो जीवस्य जीवनम’ मंत्र जपला आहे.वन्यजीव असणे हे चांगल्या वनांचे प्रतीक मानले जाते. वन आणि वन्यजीवांचे अस्तित्व हे एकमेकांवर अवलंबून असते. ‘जीवो जीवस्य जीवणम’ ही तत्व प्रणाली जंगलात पहावयास मिळते. इथे प्रत्येक जीव हा एकमेकांवर अवलंबून असतो. त्यातील एक जीव जरी नष्ट झाला तर त्याचा दुरगामी परिणाम हा इतर जीवांवर आपोआप होत असतो.पर्याने पर्यावरणाचा समतोल बिघडतो.पर्यावरणातील जैवविविधता ही पर्यावरणातील जैविकसाखळीची महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात तागडगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे हे दाम्पत्य सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र चालवत आहेत. आतापर्यंत त्यांनी जखमी, आजारी, मातृत्वापासून दुरावलेल्या सोळा हजार वन्यजीवांना जीवदान दिलेले आहे.त्यांचे हे पर्यावरणातील कार्य कौतुकास्पद आहे.पर्यावरणाचे संतुलन बिघडले गेले तर विशेषत्वाने त्यांचा परिणाम माणसाला भोगावा लागेल. त्याकरिता निसर्गदत्त सर्वव्यवस्था अबाधित राहणे गरजेचे आहे. आणि ती टिकवण्याची जबाबदारी कुण्या एका सरकारची , सेवाभावी संस्थेची नसून ती आपली सर्वांची असल्याचे निसर्ग मित्र व प्राणी मित्र सिध्दार्थ सोनवणे यांनी सांगितले.आजच्या एका दिवसापूरते पर्यावरण दिन साजरा करून पर्यावरण रक्षण करता येणार नाही. ती शासनाची जबाबदारी आहे असे म्हणूनही चालणार नाही. वन्यप्राण्याच्या चारा, पाण्याची व्यवस्था जंगलात करणे गरजेचे असून, यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच पर्यावरण आणि वन्यजीव रक्षण ही प्रत्येकाची सामाजिक नैतिक जबाबदारी आहे, असे संचालक सिद्धार्थ सोनवणे म्हणाले.

टॅग्स :Beedबीडforestजंगलforest departmentवनविभाग