शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

‘पाणी वाचवा, प्राणी वाचवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:56 IST

पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे गरजेचे आहे. वन्यजीवांच्या रक्षणात पर्यावरणाचा समतोल राखला जातो. येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राने वन्यजीवांचे पुनर्वसन करत ‘जीवो जीवस्य जीवनम’ मंत्र जपला आहे.

ठळक मुद्देसर्पराज्ञी संस्थेने १६ हजार वन्य जिवांना दिले जीवदान ; दुष्काळी गावे होताहेत पाणीदार

विजयकुमार गाडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार : पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे गरजेचे आहे. वन्यजीवांच्या रक्षणात पर्यावरणाचा समतोल राखला जातो. येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राने वन्यजीवांचे पुनर्वसन करत ‘जीवो जीवस्य जीवनम’ मंत्र जपला आहे.वन्यजीव असणे हे चांगल्या वनांचे प्रतीक मानले जाते. वन आणि वन्यजीवांचे अस्तित्व हे एकमेकांवर अवलंबून असते. ‘जीवो जीवस्य जीवणम’ ही तत्व प्रणाली जंगलात पहावयास मिळते. इथे प्रत्येक जीव हा एकमेकांवर अवलंबून असतो. त्यातील एक जीव जरी नष्ट झाला तर त्याचा दुरगामी परिणाम हा इतर जीवांवर आपोआप होत असतो.पर्याने पर्यावरणाचा समतोल बिघडतो.पर्यावरणातील जैवविविधता ही पर्यावरणातील जैविकसाखळीची महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात तागडगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे हे दाम्पत्य सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र चालवत आहेत. आतापर्यंत त्यांनी जखमी, आजारी, मातृत्वापासून दुरावलेल्या सोळा हजार वन्यजीवांना जीवदान दिलेले आहे.त्यांचे हे पर्यावरणातील कार्य कौतुकास्पद आहे.पर्यावरणाचे संतुलन बिघडले गेले तर विशेषत्वाने त्यांचा परिणाम माणसाला भोगावा लागेल. त्याकरिता निसर्गदत्त सर्वव्यवस्था अबाधित राहणे गरजेचे आहे. आणि ती टिकवण्याची जबाबदारी कुण्या एका सरकारची , सेवाभावी संस्थेची नसून ती आपली सर्वांची असल्याचे निसर्ग मित्र व प्राणी मित्र सिध्दार्थ सोनवणे यांनी सांगितले.आजच्या एका दिवसापूरते पर्यावरण दिन साजरा करून पर्यावरण रक्षण करता येणार नाही. ती शासनाची जबाबदारी आहे असे म्हणूनही चालणार नाही. वन्यप्राण्याच्या चारा, पाण्याची व्यवस्था जंगलात करणे गरजेचे असून, यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच पर्यावरण आणि वन्यजीव रक्षण ही प्रत्येकाची सामाजिक नैतिक जबाबदारी आहे, असे संचालक सिद्धार्थ सोनवणे म्हणाले.

टॅग्स :Beedबीडforestजंगलforest departmentवनविभाग