शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

‘पाणी वाचवा, प्राणी वाचवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 23:56 IST

पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे गरजेचे आहे. वन्यजीवांच्या रक्षणात पर्यावरणाचा समतोल राखला जातो. येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राने वन्यजीवांचे पुनर्वसन करत ‘जीवो जीवस्य जीवनम’ मंत्र जपला आहे.

ठळक मुद्देसर्पराज्ञी संस्थेने १६ हजार वन्य जिवांना दिले जीवदान ; दुष्काळी गावे होताहेत पाणीदार

विजयकुमार गाडेकर।लोकमत न्यूज नेटवर्कशिरुर कासार : पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी वन्यजीवांचे रक्षण करणे गरजेचे आहे. वन्यजीवांच्या रक्षणात पर्यावरणाचा समतोल राखला जातो. येथील सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्राने वन्यजीवांचे पुनर्वसन करत ‘जीवो जीवस्य जीवनम’ मंत्र जपला आहे.वन्यजीव असणे हे चांगल्या वनांचे प्रतीक मानले जाते. वन आणि वन्यजीवांचे अस्तित्व हे एकमेकांवर अवलंबून असते. ‘जीवो जीवस्य जीवणम’ ही तत्व प्रणाली जंगलात पहावयास मिळते. इथे प्रत्येक जीव हा एकमेकांवर अवलंबून असतो. त्यातील एक जीव जरी नष्ट झाला तर त्याचा दुरगामी परिणाम हा इतर जीवांवर आपोआप होत असतो.पर्याने पर्यावरणाचा समतोल बिघडतो.पर्यावरणातील जैवविविधता ही पर्यावरणातील जैविकसाखळीची महत्त्वाची भूमिका पार पाडत असते.दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात तागडगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून सिद्धार्थ व सृष्टी सोनवणे हे दाम्पत्य सर्पराज्ञी वन्यजीव पुनर्वसन केंद्र चालवत आहेत. आतापर्यंत त्यांनी जखमी, आजारी, मातृत्वापासून दुरावलेल्या सोळा हजार वन्यजीवांना जीवदान दिलेले आहे.त्यांचे हे पर्यावरणातील कार्य कौतुकास्पद आहे.पर्यावरणाचे संतुलन बिघडले गेले तर विशेषत्वाने त्यांचा परिणाम माणसाला भोगावा लागेल. त्याकरिता निसर्गदत्त सर्वव्यवस्था अबाधित राहणे गरजेचे आहे. आणि ती टिकवण्याची जबाबदारी कुण्या एका सरकारची , सेवाभावी संस्थेची नसून ती आपली सर्वांची असल्याचे निसर्ग मित्र व प्राणी मित्र सिध्दार्थ सोनवणे यांनी सांगितले.आजच्या एका दिवसापूरते पर्यावरण दिन साजरा करून पर्यावरण रक्षण करता येणार नाही. ती शासनाची जबाबदारी आहे असे म्हणूनही चालणार नाही. वन्यप्राण्याच्या चारा, पाण्याची व्यवस्था जंगलात करणे गरजेचे असून, यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच पर्यावरण आणि वन्यजीव रक्षण ही प्रत्येकाची सामाजिक नैतिक जबाबदारी आहे, असे संचालक सिद्धार्थ सोनवणे म्हणाले.

टॅग्स :Beedबीडforestजंगलforest departmentवनविभाग