शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

ए वाचवा, वाचवा ना कुणी तरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:18 IST

ऐ वाचवा, वाचवा ना कुणीतरी..., उचला रे कुणीतरी.. हे शब्द आहेत, सुमित वाघमारेची पत्नी भाग्यश्रीचे.

ठळक मुद्देमाणुसकी हरवली ? : सुमित रक्ताच्या थारोळ्यात, पत्नी भाग्यश्रीची मदतीसाठी हाक, फोटो, व्हिडिओ काढत होते बघे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ऐ वाचवा, वाचवा ना कुणीतरी..., उचला रे कुणीतरी.. हे शब्द आहेत, सुमित वाघमारेची पत्नी भाग्यश्रीचे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास परीक्षा देऊन परतणाऱ्या सुमितवर प्रेमप्रकरणातून भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे आणि त्याच्या मित्रांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला होता. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमितला वाचविण्यासाठी भाग्यश्री मदत मागत होती. मात्र, उपस्थितांनी केवळ फोटो आणि व्हिडीओ बनविण्यातच धन्यता मानली. जर सुमितला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असते तर ‘माझं लेकरू वाचलं असतं’ असा टाहो सुमितच्या आईने फोडला. या घटनेवरुन आजही नागरिक गंभीर घटनेत मदतीसाठी पुढे येत नसल्याचे समोर आले आहे.सुमित वाघमारे (रा. तालखेड, ता. माजलगाव ह. मु. नागोबा गल्ली, बीड) या युवकाचा बुधवारी सायंकाळी तेलगाव नाक्यावर दोघांनी धारदार शस्त्रांनी वार करुन खून केला होता. त्यानंतर रात्री उशिरा सुमितची पत्नी भाग्यश्री हिच्या फिर्यादीवरुन तिचा भाऊ बालाजी लांडगे व त्याचा मित्र संकेत वाघ विरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त केली असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत आरोपींना अटक झालेली नव्हती.खून झाला त्यावेळी सुमित हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. सुमित खाली कोसळल्यानंतर लोकांनी गर्दी केली. भाग्यश्री त्याच्या अंगावर पडून ऐ वाचवा, वाचवा ना कुणीतरी..., उचला रे कुणीतरी... असा हंबरडा फोडत मदत मागत होती. मात्र, कोणीही पुढे आले नाही. याचा अनेकांनी व्हिडीओ बनविला, तर काहींनी फोटो काढले. अखेर चौघांनी एका रिक्षाचालकाला विनंती करीत सुमितला जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तेथे भाग्यश्रीसह सुमितच्या नातेवाईकांनी आक्रोश केला.नातेवाईकांनी मांडली एसपींपुढे कैफियतआरोपींना अटक करुन त्यांना कडक शिक्षा करा या मागणीसाठी गुरुवारी सकाळीच भाग्यश्रीसह नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी कार्यालय परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला होता.आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.पोलिसांनी बजावली होती नोटीस२५ आॅक्टोबर रोजी भाग्यश्री घरातून निघून गेल्यावर तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीवरून मिसींग तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली.त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी भाग्यश्री व सुमित दोघेही स्वत:हुन ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी आपण स्वखुशीने लग्न केल्याचे कबुली देत सर्व कागदपत्रे पोलिसांना दिली.यावेळी भाग्यश्रीने आपले वडील व आत्या यांच्यापासून जिवाला धोका असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.दोघांनाही कलम १४९ नुसार नोटीस बजावली होती. या तक्रारीत बालाजी लांडगेचे नाव नव्हते, असे पोलीस सूत्रांकडून समजते.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी