शहरं
Join us  
Trending Stories
1
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
2
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
3
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
4
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
5
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
6
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
7
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
8
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
9
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
10
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
11
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
12
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
13
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
14
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
15
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
16
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
17
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
18
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
19
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
20
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?

ए वाचवा, वाचवा ना कुणी तरी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 00:18 IST

ऐ वाचवा, वाचवा ना कुणीतरी..., उचला रे कुणीतरी.. हे शब्द आहेत, सुमित वाघमारेची पत्नी भाग्यश्रीचे.

ठळक मुद्देमाणुसकी हरवली ? : सुमित रक्ताच्या थारोळ्यात, पत्नी भाग्यश्रीची मदतीसाठी हाक, फोटो, व्हिडिओ काढत होते बघे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ऐ वाचवा, वाचवा ना कुणीतरी..., उचला रे कुणीतरी.. हे शब्द आहेत, सुमित वाघमारेची पत्नी भाग्यश्रीचे. बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास परीक्षा देऊन परतणाऱ्या सुमितवर प्रेमप्रकरणातून भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे आणि त्याच्या मित्रांनी धारदार शस्त्राने वार करुन खून केला होता. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमितला वाचविण्यासाठी भाग्यश्री मदत मागत होती. मात्र, उपस्थितांनी केवळ फोटो आणि व्हिडीओ बनविण्यातच धन्यता मानली. जर सुमितला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असते तर ‘माझं लेकरू वाचलं असतं’ असा टाहो सुमितच्या आईने फोडला. या घटनेवरुन आजही नागरिक गंभीर घटनेत मदतीसाठी पुढे येत नसल्याचे समोर आले आहे.सुमित वाघमारे (रा. तालखेड, ता. माजलगाव ह. मु. नागोबा गल्ली, बीड) या युवकाचा बुधवारी सायंकाळी तेलगाव नाक्यावर दोघांनी धारदार शस्त्रांनी वार करुन खून केला होता. त्यानंतर रात्री उशिरा सुमितची पत्नी भाग्यश्री हिच्या फिर्यादीवरुन तिचा भाऊ बालाजी लांडगे व त्याचा मित्र संकेत वाघ विरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त केली असून, गुरुवारी सायंकाळपर्यंत आरोपींना अटक झालेली नव्हती.खून झाला त्यावेळी सुमित हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. परीक्षेमुळे विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. सुमित खाली कोसळल्यानंतर लोकांनी गर्दी केली. भाग्यश्री त्याच्या अंगावर पडून ऐ वाचवा, वाचवा ना कुणीतरी..., उचला रे कुणीतरी... असा हंबरडा फोडत मदत मागत होती. मात्र, कोणीही पुढे आले नाही. याचा अनेकांनी व्हिडीओ बनविला, तर काहींनी फोटो काढले. अखेर चौघांनी एका रिक्षाचालकाला विनंती करीत सुमितला जिल्हा रुग्णालयात आणले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तेथे भाग्यश्रीसह सुमितच्या नातेवाईकांनी आक्रोश केला.नातेवाईकांनी मांडली एसपींपुढे कैफियतआरोपींना अटक करुन त्यांना कडक शिक्षा करा या मागणीसाठी गुरुवारी सकाळीच भाग्यश्रीसह नातेवाईकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव घेतली. अधीक्षक जी. श्रीधर यांची भेट घेऊन कैफियत मांडली. यावेळी कार्यालय परिसरात तगडा बंदोबस्त तैनात केला होता.आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला होता. मात्र, पोलिसांनी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला.पोलिसांनी बजावली होती नोटीस२५ आॅक्टोबर रोजी भाग्यश्री घरातून निघून गेल्यावर तिच्या वडिलांनी दिलेल्या माहितीवरून मिसींग तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली.त्यानंतर ४ नोव्हेंबर रोजी भाग्यश्री व सुमित दोघेही स्वत:हुन ठाण्यात हजर झाले. यावेळी त्यांनी आपण स्वखुशीने लग्न केल्याचे कबुली देत सर्व कागदपत्रे पोलिसांना दिली.यावेळी भाग्यश्रीने आपले वडील व आत्या यांच्यापासून जिवाला धोका असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे दोघांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता.दोघांनाही कलम १४९ नुसार नोटीस बजावली होती. या तक्रारीत बालाजी लांडगेचे नाव नव्हते, असे पोलीस सूत्रांकडून समजते.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी