शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

संत दिशा दाखवतात, बुवा दिशाभूल करतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:20 IST

मयूर देवकर। लोकमत न्यूज नेटवर्क आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी (अंबाजोगाई) : समाजाला लागलेली बुवाबाजी कीड वाढल्याने संत साहित्याची संस्कारशीलता ...

ठळक मुद्देसंत साहित्याची संस्कारशीलता आणि बुवाबाजी याविषयी विचारमंथन

मयूर देवकर।लोकमत न्यूज नेटवर्कआद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी (अंबाजोगाई) : समाजाला लागलेली बुवाबाजी कीड वाढल्याने संत साहित्याची संस्कारशीलता जरी धोक्यात आली असली तरी संतांनी निर्माण केलेल्या संस्कारांमध्येच त्यापासून मुक्ती मिळण्याचा मार्ग आहे, असा निष्कर्ष ‘संत साहित्याने निर्माण केलेली संस्कारशीलता आजच्या बुवाबाजीने नष्ट केली आहे!’ या परिसंवादमध्ये काढण्यात आला. सतीश बडवे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वज्ञ दासोपंत सभागृहात पार पडलेल्या या परिसंवादामध्ये विद्यासागर पाटांगणकर, सचिन परब, मार्तंड कुलकणी आणि शामसुंदर सोन्नर यांनी विचार मांडले.

मराठवाडा साहित्य संमेलनातील पहिल्या परिसंवादामध्येढोंगी बुवा आणि महाराजांचा सुळसुळाट, त्यातून होणारे समाजनैतिकतेचे होणारे पतन, बुवांनी चालविलेला आर्थिक व वैचारिक भ्रष्टाचार आणि यावरील उपाय याविषयी चिंतन करण्यात आले.मार्तंड कुलकर्णी यांनी संतसाहित्याचा अनुबंध जोडताना सांगितले की, बुवाबाजी ही काही आजची समस्या नसून शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. परंतु, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संतांनी दिलेले संस्कार टिकून राहतील. कारण त्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. परंतु, आजचे ढोंगी महाराज धर्म आणि भक्तीचा बाजार मांडून आर्थिक हव्यासापोटी समाजाची दिशाभूल करतात.वारकरी संप्रदायातील संत साहित्याचे महत्त्व विशद करताना शामसुंदर सोन्नर म्हणाले, समाजातील सर्व सुधारणावादी चळवळींचा उगम वारकरी संप्रदायातून झाली आहे. समतेचा विचार आणि विवेकशिल समाजनिर्माण झाला पाहिजे हा विचार वारकरी विचारातून आला आहे. परंतु, बुवाबाजीच्या माध्यमातून या विचारांचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. बुवा जर काही करत असतील, ते वैचारिक भ्रष्टाचार करत आहेत.

देशभरात असलेल्या बुवाबाबांच्या सुळसुळाटाला राजकारणीदेखील कारणीभूत आहेत. त्यांचा वरदहस्त अशा ढोंगी लोकांवर असतो. दोघांचा एकमेकांना फायदा होतो. त्यामुळे आपली ‘रुद्राक्ष’ संस्कृती आता ‘द्राक्ष’ संस्कृती होतेय, असे विद्यासागर पाटांगणकर म्हणाले. परिसंवादाच्या शेवटी बडवे अध्यक्षीय समारोपात म्हणाले की, संतांनी लोकसंवादी साहित्य निर्माण केले. चित्तशुद्धी आणि लोकोद्धार हे दोन हेतू ठेवून त्यांनी लिखाण केले.

महाराष्ट्रात जे चांगले झाले, ते संत साहित्यामुळेचसंत साहित्य हे त्या त्या काळातील धर्मांधता आणि बुवाबाजीच्या विरोधात केलेले बंड आहे, असे परब म्हणाले. ‘महाराष्ट्रात जे काही चांगले झाले आहे आणि होतेय ते केवळ संत साहित्यातून आलेल्या संस्कारांमुळेच शक्य झाले. संताचे नाव घेऊन वीरेंद्र बाबा, राधे माँ, रामरहीम बाबा, आसाराम बापू यांसारखे बाबा संतांचे विचार सांगत नाहीत. त्यांच्या कुकर्माने संताचे नाव बदनाम होतेय.’