शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

संत दिशा दाखवतात, बुवा दिशाभूल करतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:20 IST

मयूर देवकर। लोकमत न्यूज नेटवर्क आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी (अंबाजोगाई) : समाजाला लागलेली बुवाबाजी कीड वाढल्याने संत साहित्याची संस्कारशीलता ...

ठळक मुद्देसंत साहित्याची संस्कारशीलता आणि बुवाबाजी याविषयी विचारमंथन

मयूर देवकर।लोकमत न्यूज नेटवर्कआद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी (अंबाजोगाई) : समाजाला लागलेली बुवाबाजी कीड वाढल्याने संत साहित्याची संस्कारशीलता जरी धोक्यात आली असली तरी संतांनी निर्माण केलेल्या संस्कारांमध्येच त्यापासून मुक्ती मिळण्याचा मार्ग आहे, असा निष्कर्ष ‘संत साहित्याने निर्माण केलेली संस्कारशीलता आजच्या बुवाबाजीने नष्ट केली आहे!’ या परिसंवादमध्ये काढण्यात आला. सतीश बडवे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वज्ञ दासोपंत सभागृहात पार पडलेल्या या परिसंवादामध्ये विद्यासागर पाटांगणकर, सचिन परब, मार्तंड कुलकणी आणि शामसुंदर सोन्नर यांनी विचार मांडले.

मराठवाडा साहित्य संमेलनातील पहिल्या परिसंवादामध्येढोंगी बुवा आणि महाराजांचा सुळसुळाट, त्यातून होणारे समाजनैतिकतेचे होणारे पतन, बुवांनी चालविलेला आर्थिक व वैचारिक भ्रष्टाचार आणि यावरील उपाय याविषयी चिंतन करण्यात आले.मार्तंड कुलकर्णी यांनी संतसाहित्याचा अनुबंध जोडताना सांगितले की, बुवाबाजी ही काही आजची समस्या नसून शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. परंतु, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संतांनी दिलेले संस्कार टिकून राहतील. कारण त्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. परंतु, आजचे ढोंगी महाराज धर्म आणि भक्तीचा बाजार मांडून आर्थिक हव्यासापोटी समाजाची दिशाभूल करतात.वारकरी संप्रदायातील संत साहित्याचे महत्त्व विशद करताना शामसुंदर सोन्नर म्हणाले, समाजातील सर्व सुधारणावादी चळवळींचा उगम वारकरी संप्रदायातून झाली आहे. समतेचा विचार आणि विवेकशिल समाजनिर्माण झाला पाहिजे हा विचार वारकरी विचारातून आला आहे. परंतु, बुवाबाजीच्या माध्यमातून या विचारांचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. बुवा जर काही करत असतील, ते वैचारिक भ्रष्टाचार करत आहेत.

देशभरात असलेल्या बुवाबाबांच्या सुळसुळाटाला राजकारणीदेखील कारणीभूत आहेत. त्यांचा वरदहस्त अशा ढोंगी लोकांवर असतो. दोघांचा एकमेकांना फायदा होतो. त्यामुळे आपली ‘रुद्राक्ष’ संस्कृती आता ‘द्राक्ष’ संस्कृती होतेय, असे विद्यासागर पाटांगणकर म्हणाले. परिसंवादाच्या शेवटी बडवे अध्यक्षीय समारोपात म्हणाले की, संतांनी लोकसंवादी साहित्य निर्माण केले. चित्तशुद्धी आणि लोकोद्धार हे दोन हेतू ठेवून त्यांनी लिखाण केले.

महाराष्ट्रात जे चांगले झाले, ते संत साहित्यामुळेचसंत साहित्य हे त्या त्या काळातील धर्मांधता आणि बुवाबाजीच्या विरोधात केलेले बंड आहे, असे परब म्हणाले. ‘महाराष्ट्रात जे काही चांगले झाले आहे आणि होतेय ते केवळ संत साहित्यातून आलेल्या संस्कारांमुळेच शक्य झाले. संताचे नाव घेऊन वीरेंद्र बाबा, राधे माँ, रामरहीम बाबा, आसाराम बापू यांसारखे बाबा संतांचे विचार सांगत नाहीत. त्यांच्या कुकर्माने संताचे नाव बदनाम होतेय.’