शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

संत दिशा दाखवतात, बुवा दिशाभूल करतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 01:20 IST

मयूर देवकर। लोकमत न्यूज नेटवर्क आद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी (अंबाजोगाई) : समाजाला लागलेली बुवाबाजी कीड वाढल्याने संत साहित्याची संस्कारशीलता ...

ठळक मुद्देसंत साहित्याची संस्कारशीलता आणि बुवाबाजी याविषयी विचारमंथन

मयूर देवकर।लोकमत न्यूज नेटवर्कआद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी (अंबाजोगाई) : समाजाला लागलेली बुवाबाजी कीड वाढल्याने संत साहित्याची संस्कारशीलता जरी धोक्यात आली असली तरी संतांनी निर्माण केलेल्या संस्कारांमध्येच त्यापासून मुक्ती मिळण्याचा मार्ग आहे, असा निष्कर्ष ‘संत साहित्याने निर्माण केलेली संस्कारशीलता आजच्या बुवाबाजीने नष्ट केली आहे!’ या परिसंवादमध्ये काढण्यात आला. सतीश बडवे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वज्ञ दासोपंत सभागृहात पार पडलेल्या या परिसंवादामध्ये विद्यासागर पाटांगणकर, सचिन परब, मार्तंड कुलकणी आणि शामसुंदर सोन्नर यांनी विचार मांडले.

मराठवाडा साहित्य संमेलनातील पहिल्या परिसंवादामध्येढोंगी बुवा आणि महाराजांचा सुळसुळाट, त्यातून होणारे समाजनैतिकतेचे होणारे पतन, बुवांनी चालविलेला आर्थिक व वैचारिक भ्रष्टाचार आणि यावरील उपाय याविषयी चिंतन करण्यात आले.मार्तंड कुलकर्णी यांनी संतसाहित्याचा अनुबंध जोडताना सांगितले की, बुवाबाजी ही काही आजची समस्या नसून शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. परंतु, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत संतांनी दिलेले संस्कार टिकून राहतील. कारण त्यांनी समाजाला दिशा दाखवण्याचे काम केले. परंतु, आजचे ढोंगी महाराज धर्म आणि भक्तीचा बाजार मांडून आर्थिक हव्यासापोटी समाजाची दिशाभूल करतात.वारकरी संप्रदायातील संत साहित्याचे महत्त्व विशद करताना शामसुंदर सोन्नर म्हणाले, समाजातील सर्व सुधारणावादी चळवळींचा उगम वारकरी संप्रदायातून झाली आहे. समतेचा विचार आणि विवेकशिल समाजनिर्माण झाला पाहिजे हा विचार वारकरी विचारातून आला आहे. परंतु, बुवाबाजीच्या माध्यमातून या विचारांचा गळा घोटण्याचे काम सुरू आहे. बुवा जर काही करत असतील, ते वैचारिक भ्रष्टाचार करत आहेत.

देशभरात असलेल्या बुवाबाबांच्या सुळसुळाटाला राजकारणीदेखील कारणीभूत आहेत. त्यांचा वरदहस्त अशा ढोंगी लोकांवर असतो. दोघांचा एकमेकांना फायदा होतो. त्यामुळे आपली ‘रुद्राक्ष’ संस्कृती आता ‘द्राक्ष’ संस्कृती होतेय, असे विद्यासागर पाटांगणकर म्हणाले. परिसंवादाच्या शेवटी बडवे अध्यक्षीय समारोपात म्हणाले की, संतांनी लोकसंवादी साहित्य निर्माण केले. चित्तशुद्धी आणि लोकोद्धार हे दोन हेतू ठेवून त्यांनी लिखाण केले.

महाराष्ट्रात जे चांगले झाले, ते संत साहित्यामुळेचसंत साहित्य हे त्या त्या काळातील धर्मांधता आणि बुवाबाजीच्या विरोधात केलेले बंड आहे, असे परब म्हणाले. ‘महाराष्ट्रात जे काही चांगले झाले आहे आणि होतेय ते केवळ संत साहित्यातून आलेल्या संस्कारांमुळेच शक्य झाले. संताचे नाव घेऊन वीरेंद्र बाबा, राधे माँ, रामरहीम बाबा, आसाराम बापू यांसारखे बाबा संतांचे विचार सांगत नाहीत. त्यांच्या कुकर्माने संताचे नाव बदनाम होतेय.’