शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आधुनिक विचारांचे प्रबोधनकार संत भगवान बाबा; जाणून घ्या जीवनचरित्र आणि भगवानगडाचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 15:17 IST

शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजीं उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना माणिकबाबांनी अनुग्रह दिला. तेव्हा माणिकबाबांनी त्यांचे नाव भगवान बाबा असे ठेवले.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव या गावात २९ जुलै १८९६ रोजी भगवान बाबांचा जन्म झाला. भगवान बाबांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे हे पाचवे अपत्य. शांत, निश्चयी असलेल्या आबाजींच्या घरात धार्मिक वातावरण होतं. त्यांचे कुटुंब नारायणगडाचे महंत माणिकबाबा यांचे उपासक होते. शेती करत भक्तीत लीन असलेल्या आबाजींना एकदा विठ्ठलदर्शन झाले. यानंतर त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण करण्याचे ठरविले. काही दिवसांनी आबाजींना घेऊन आईवडील विजयादशमीच्या दिवशी दर्शनानिमित्त नारायण गडावर आले. तेथे माणिकबाबांकडे आबाजींनी अनुग्रह द्या, असा हट्ट धरला. शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजीं उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना माणिकबाबांनी अनुग्रह दिला. तेव्हा माणिकबाबांनी त्यांचे नाव भगवान बाबा असे ठेवले.

पुढे माणिकबाबांनी भगवानबाबांवर नारायणगडाची जबाबदारी टाकून देह त्यागला. नारायण गडावर भगवानबाबांची समर्पित भावनेने सेवा करू होती. दरम्यान, गडावरील काही लोकांना मात्र त्यांच्यावर लोभी असल्याचा आरोप केला. यामुळे दुखावलेल्या भगवानबाबांनी नारायणगड सोडला. त्यानंतर भगवानबाबांनी धौम्यगड येथे वास्तव्य केले. येथे राहून भक्तीसोबतच त्यांनी परिसरातील ग्रामस्थांचे प्रबोधन केले. धौम्य ऋषींच्या पादुकांची सेवा करत त्यांनी धौम्यगडावर भक्तीचा गड उभारण्याचे काम सुरु केले. लोक सहभागातून श्रमदानाने धौम्यगड ते पायथ्याच्या खरवंडी गावाचा रस्ता आणि गडावरील बांधकाम केले. पुढे १९५८ मध्ये गडावरील देवळात विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गडाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी, भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून येथे विठ्ठल भक्तीचा गड उभारला आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा, असे आवाहन केले. तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. जीर्णोद्धारानंतर भगवानबाबांनी गडावर दसरा मेळाव्यास सुरुवात केली.

पांढरेशुभ्र धोतर, पांढरा सदरा, पांढरा फेटा अशी साधी राहणी असलेले भगवानबाबा अत्यंत शिस्तबद्ध होते. भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा समन्वय साधला होता. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलंगना, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी कायम मानवतेचा पुरस्कार केला. समाजाच्या सेवेत असतानाचा १८ जानेवारी १९६५ रोजी रात्री एक वाजता वयाच्या ६९ व्या वर्षी भगवानबाबांचे देहावसान झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळला पसरली होती.

दसरा मेळाव्याची परंपरा आहे कायम गोपीनाथ मुंडे यांनी ३५ वर्षे भगवान गडावर दसरा मेळावा आयोजनाची जबाबदारी पार पाडत मेळाव्याची परंपरा सुरु ठेवली. मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली. मात्र, २०१६ मध्ये भगवान गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी हा मेळावा घेण्यास नकार दिल्याने पंकजा मुंडे यांनी भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊन जनतेला संबोधित केलं. त्यानंतर पंकजा यांनी पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील भगवानबाबांच्या जन्मस्थळी २०१७ सालापासून दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. येथे भगवानबाबांचे मोठे स्मारक उभारण्यात आले आहे.

टॅग्स :SocialसामाजिकBeedबीड