शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
जीएसटी कमी पडला की काय...! टाटा, मारुती, होंडापासून सर्व कंपन्यांनी इअर एंड डिस्काऊंट सुरु केले...
4
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
5
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
6
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
7
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
8
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
9
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
10
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
11
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
12
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
13
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
14
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
15
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
16
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
17
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
18
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
19
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
20
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार

आधुनिक विचारांचे प्रबोधनकार संत भगवान बाबा; जाणून घ्या जीवनचरित्र आणि भगवानगडाचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2022 15:17 IST

शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजीं उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना माणिकबाबांनी अनुग्रह दिला. तेव्हा माणिकबाबांनी त्यांचे नाव भगवान बाबा असे ठेवले.

बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सुपे सावरगाव या गावात २९ जुलै १८९६ रोजी भगवान बाबांचा जन्म झाला. भगवान बाबांचं मूळ नाव आबाजी तुबाजी सानप. कौतिकाबाई आणि तुबाजीराव यांचे हे पाचवे अपत्य. शांत, निश्चयी असलेल्या आबाजींच्या घरात धार्मिक वातावरण होतं. त्यांचे कुटुंब नारायणगडाचे महंत माणिकबाबा यांचे उपासक होते. शेती करत भक्तीत लीन असलेल्या आबाजींना एकदा विठ्ठलदर्शन झाले. यानंतर त्यांनी संपूर्ण जीवन विठ्ठलचरणी अर्पण करण्याचे ठरविले. काही दिवसांनी आबाजींना घेऊन आईवडील विजयादशमीच्या दिवशी दर्शनानिमित्त नारायण गडावर आले. तेथे माणिकबाबांकडे आबाजींनी अनुग्रह द्या, असा हट्ट धरला. शिष्यत्वाच्या परीक्षेत आबाजीं उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांना माणिकबाबांनी अनुग्रह दिला. तेव्हा माणिकबाबांनी त्यांचे नाव भगवान बाबा असे ठेवले.

पुढे माणिकबाबांनी भगवानबाबांवर नारायणगडाची जबाबदारी टाकून देह त्यागला. नारायण गडावर भगवानबाबांची समर्पित भावनेने सेवा करू होती. दरम्यान, गडावरील काही लोकांना मात्र त्यांच्यावर लोभी असल्याचा आरोप केला. यामुळे दुखावलेल्या भगवानबाबांनी नारायणगड सोडला. त्यानंतर भगवानबाबांनी धौम्यगड येथे वास्तव्य केले. येथे राहून भक्तीसोबतच त्यांनी परिसरातील ग्रामस्थांचे प्रबोधन केले. धौम्य ऋषींच्या पादुकांची सेवा करत त्यांनी धौम्यगडावर भक्तीचा गड उभारण्याचे काम सुरु केले. लोक सहभागातून श्रमदानाने धौम्यगड ते पायथ्याच्या खरवंडी गावाचा रस्ता आणि गडावरील बांधकाम केले. पुढे १९५८ मध्ये गडावरील देवळात विठ्ठलाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गडाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी, भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून येथे विठ्ठल भक्तीचा गड उभारला आहे. आजपासून धौम्यगड हा भगवानगड म्हणून ओळखला जावा, असे आवाहन केले. तेव्हापासून धौम्यगडाचे नाव भगवानगड असे पडले. जीर्णोद्धारानंतर भगवानबाबांनी गडावर दसरा मेळाव्यास सुरुवात केली.

पांढरेशुभ्र धोतर, पांढरा सदरा, पांढरा फेटा अशी साधी राहणी असलेले भगवानबाबा अत्यंत शिस्तबद्ध होते. भगवानबाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले. भक्तिमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा समन्वय साधला होता. कीर्तनकार म्हणून त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. आपल्या कीर्तनांतून ते जातिभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी-परंपरा यांच्यावर प्रहार करीत. प्रबोधनकार्यासाठी त्यांनी मराठवाडा, विदर्भ , तेलंगना, आंध्रप्रदेश, कर्नाटकातील काही भाग व पश्‍चिम महाराष्ट्रासह उभा महाराष्ट्र पिंजून काढला. विठूनामाचा प्रचार करतानाच त्यांनी समता, बंधुता, एकता, मानवता यांसारख्या आधुनिक विचारांचा आयुष्यभर प्रचार केला. त्यामुळेच वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी कायम मानवतेचा पुरस्कार केला. समाजाच्या सेवेत असतानाचा १८ जानेवारी १९६५ रोजी रात्री एक वाजता वयाच्या ६९ व्या वर्षी भगवानबाबांचे देहावसान झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळला पसरली होती.

दसरा मेळाव्याची परंपरा आहे कायम गोपीनाथ मुंडे यांनी ३५ वर्षे भगवान गडावर दसरा मेळावा आयोजनाची जबाबदारी पार पाडत मेळाव्याची परंपरा सुरु ठेवली. मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी ही परंपरा कायम ठेवली. मात्र, २०१६ मध्ये भगवान गडाचे मठाधिपती नामदेव शास्त्री यांनी हा मेळावा घेण्यास नकार दिल्याने पंकजा मुंडे यांनी भगवान गडाच्या पायथ्याशी मेळावा घेऊन जनतेला संबोधित केलं. त्यानंतर पंकजा यांनी पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील भगवानबाबांच्या जन्मस्थळी २०१७ सालापासून दसरा मेळावा घेण्यास सुरुवात केली. येथे भगवानबाबांचे मोठे स्मारक उभारण्यात आले आहे.

टॅग्स :SocialसामाजिकBeedबीड