शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

ध्वजारोहणाला येतो म्हणणारे साहेब आलेच नाही; विनायक मेटेंच्या आठवणींनी कार्यकर्ते गहिवरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 09:30 IST

पार्थिव पहाटे बीडमध्ये

बीड: शिवसंग्रामचे संस्थापक व माजी आमदार विनायक मेटे यांनी १३ ऑगस्ट रोजी रात्री मराठा आरक्षण बैठकीसाठी बीड सोडले. ध्वजारोहणाला येतो म्हणणारे साहेब आलेच नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते आठवणींनी गहिवरले. दरम्यान, १५ ऑगस्ट रोजी पहाटे साडेतीन वाजता विनायक मेटे यांचे पार्थिवदेह मुंबईहून बीडमध्ये आणले.

विनायक मेटे यांच्या उपस्थितीत १४ ऑगस्ट रोजी बीडमध्ये तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. याची जय्यत तयारी केली होती. मात्र, मराठा अरक्षणासंदर्भात मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावल्याने मेटे यांना अचानक मुंबईला जावे लागले. १४ रोजी दुपारी साडेबारा वाजता बैठक असल्याने मेटे हे १३ रोजीच रात्रीच ११ वाजता बीडहून निघाले होते. पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला. मुंबईला जाताना त्यांनी तिरंगा रॅलीची जबाबदारी प्रमुख पदाधिकाऱ्यांवर सोपवून ध्वजारोहण करण्यासाठी परत येतो, असे सांगितले होते. मात्र, दुर्दैवाने १५ ऑगस्ट रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ समर्थकांवर ओढावली. त्यांचे पार्थिव पहाटे साडेतीन वाजता बीडमध्ये आणण्यात आले.

बार्शी रोडवरील निवासस्थानात कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. हुंदके आणि अश्रूंनी वातावरण सुन्न झाले होते. १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पार्थिव निवसस्थानापासून शिवसंग्राम भवन येथे आणण्यात आले. अंतिम दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.सकाळी साडेदहा वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होईल.  दुपारी साडेतीन वाजता कॅनॉल रोडवरील रामदेव बाबा मैदानाजवळ त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Vinayak Meteविनायक मेटेIndependence Dayस्वातंत्र्य दिनBeedबीड