शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
2
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू
5
प्रेमाचा त्रिकोण! आमच्या दोघींपैकी एकीला निवड; गर्लफ्रेंडच्या सांगण्यावरून पतीने केला मोठा कांड
6
२४ घरं, ४ प्लॉट, ४० एकर शेतजमीन... १५ हजार पगार असलेल्या क्लार्ककडे ३० कोटींचं घबाड
7
एकमेकांना शेवटचं बघताच आलं नाही! अल्जेरियात मुलाचा मृत्यू, मृतदेहाची वाट पाहणाऱ्या वडिलांचेही निधन 
8
एन चंद्रशेखरन यांच्या हाती पुन्हा टाटा सन्सची धुरा; IPO ची वाट पाहणाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका
9
वडिलांचा मृत्यू, बॉयफ्रेंडसोबत पळाली आई; लेकाची पोलिसांत धाव, म्हणाला, "ते मला मारुन टाकतील..."
10
नोकरी सुरू होताच १५,००० रुपये तुमच्या खात्यात! मोदी सरकारने आणली 'ही' खास योजना, कंपनीलाही मिळेल फायदा!
11
दिल्लीतील बनावट कॉल सेंटरवर छापा, 'अशा' प्रकारे परदेशातून कमावलेले १०० कोटी!
12
माजी आमदाराची मुलगी अन् पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा रहस्यमय अंत; मृत्यूपूर्वीचा Video आला, मग...
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींना ED नं चौकशीसाठी बोलावलं, १७ हजार कोटींच्या लोन फ्रॉड केसमध्ये टाकलेले छापे
14
ग्रीन टी, ब्लॅक टी सोडा... आता 'बनाना टी' एकदा प्या; स्ट्रेसला कराल बाय-बाय, हाडं होतील मजबूत
15
Stock Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; Sensex १७० अंकांची घसरण, FMCG Stocks मध्ये मोठी खरेदी
16
ट्रम्पच्या धमक्यांना इंडियन ऑईल घाबरली, रशियाकडून तेल खरेदी केली बंद; रिलायन्स मात्र...
17
ऑनलाईन गेममध्ये पैसे जिंकले, पार्टीसाठी बाहेर पडले अन्...; ५ तरुणांसोबत घडलं आक्रित
18
"तिने आमचं घर तोडलं असं लोक म्हणाले, पण...", RJ महावशसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला युजवेंद्र चहल
19
Yuzvendra Chahal : "आयुष्याला कंटाळलो, २ तास रडायचो, आत्महत्येचे विचार..."; युजवेंद्र चहलने घटस्फोटावर सोडलं मौन
20
धुळ्याची लेक मृणाल ठाकूरचा पहिलाच मराठी सिनेमा, 'या' अभिनेत्यासोबत केलेला रोमान्स

बीडमध्ये रॅलीने भगवी लाट...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 00:07 IST

निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू आणि विरोधकांचे दिवाळे काढू, असा निर्धार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त करत प्रचंड रॅलीतून भगवी लाट निर्माण करत जनसागरासमोर आशीर्वाद मागितले.

ठळक मुद्देबीडची जनता माझ्यासाठी सदैव दैवतच : निर्धार सभेमध्ये भाऊक झालेले जयदत्त क्षीरसागर जनसागरासमोर नतमस्तक

बीड : शिवसैनिकांचा कडवा विरोध मी अनुभवला आहे. त्याच शिवसैनिकांची मायेची उब आज मी अनुभवत आहे. जिवाचे रान करणा-या शिवसैनिकांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. शिवसैनिकांची ताकद मला हजार हत्तीचं बळ देते. माझा विजय हा मोठ्या मताधिक्याचा असणार आहे. हा आत्मविश्वास घेऊन मी आज अर्ज दाखल केला आहे. निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू आणि विरोधकांचे दिवाळे काढू, असा निर्धार जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त करत प्रचंड रॅलीतून भगवी लाट निर्माण करत जनसागरासमोर आशीर्वाद मागितले.बीड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार जयदत्त क्षीरसागर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून शक्ती प्रदर्शन करत विराट रॅली मार्गस्थ झाली. गावागावातून शिवसैनिक बीडमध्ये दाखल झाले होते. भगवा हातात घेऊन शिवसैनिक रस्त्यावर उतरला होता. शहरातील रस्ते भगवेमय झाले होते. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. संपूर्ण शहर आज दणाणून गेले होते. रॅली माळीवेस, कारंजा रोड, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यामार्गे सभास्थळी दाखल झाली. उपस्थित हजारो मतदारांसमोर बोलताना जयदत्त क्षीरसागर म्हणाले, शिवसैनिकांची ताकद मला हजार हत्तीचं बळ देऊन जाते. त्यांचा कडवा विरोध मी बघितला आहे आणि त्यांचे उबदार प्रेमही मी अनुभवले आहे. शिवसैनिक उघड वार करत असतो. छुपा वार तो करत नाही. मला माझ्या मोठ्या मताधिक्याने विजयाची खात्री आहे. माझ्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या तमाम शिवसैनिकांना मी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणार आहे. समोर बसलेल्या जनसागराची पाच वर्षे सालगडी म्हणून काम करणार आहे. निकालानंतर आपण दिवाळी साजरी करू आणि विरोधकांचे दिवाळे काढू असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर टिका केली. जयदत्त क्षीरसागरांनी शरद पवार, अजित पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर कडाडून टीका केली. ते लोकांचे घर फोडायला निघाले होते. त्यांच्या घराची काय अवस्था झाली, हे उभ्या महाराष्ट्राने त्यांची नाटके टिव्हीवर बघितली. परळीपासून बीडपर्यंत आणि बीडपासून मुंबईपर्यंत फोडाफोडी करणा-यांची कशी फोडाफोडी झाली. शेवटी जे पेराला ते उगवतं, हेच नियतीने दाखवून दिलं आहे. माझं आणि जनतेचं नातं हे विकासाचं नातं आहे. ते अधिक दृढ आणि बळकट होत आहे. देशात आणि राज्यात विकासाची लहर सुरू झाली आहे. लोकांना विकास हवाय. जातीपातीचं राजकारण नकोय, गेल्या पाच वर्षात युतीच्या सरकारने विकासाचा महामेरू उभा केला आहे. पुन्हा युतीचेच सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे. भगवा ध्वज विधीमंडळावर फडकणार आहे. भावी काळ आपला असेल. दुष्काळाची झळा सोसलेल्या मराठवाड्याच्या कपाळी लागलेला दुष्काळाचा कलंक आपल्याला पुसायचा आहे. मी आज मत मागतोय ते व्हिजन करता. पुढच्या पिढीकरीता, आमची सत्ता ही तुमच्या भविष्यासाठी असणार आहे. असा शब्द मी देतो, असे जयदत्त क्षीरसागरांनी ठासून सांगितले.यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, सचिन मुळूक, माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, बाळासाहेब पिंगळे, नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, लोकसभा संघटक विलास महाराज शिंदे, सहसंपर्कप्रमुख बाळासाहेब आंबुरे, संपदा गडकरी, संगीता चव्हाण, चंद्रकला बांगर, जयंिसगमामा चुंगडे, हनुमान पिंगळे, सर्जेराव तांदळे, डॉ योगेश क्षीरसागर, जगदीश काळे, अरुण डाके, अरुण बोंंगाणे, दिलीप गोरे, गणपत डोईफोडे, नितीन धांडे, बंडू पिंगळे, सागर बहीर, संजय महाद्वार, सुनील सुरवसे, किशोर काळे, विकास जोगदंड, माणिक वाघमारे, बाप्पासाहेब घुगे, झुंजार धांडे, शेषराव फावडे, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ योगेश क्षीरसागर यांनी तर सूत्रसंचालन ज्ञानेश्वर काशीद यांनी केले.तुम्ही आमदार नव्हे तर मंत्री निवडून देत आहात : अर्जुन खोतकरबीडकरांनो, तुम्ही या निवडणुकीत एक आमदार नाही तर जयदत्त क्षीरसागरांसारखा विकासाची दृष्टी असणारा प्रबळ नेता निवडून देत आहात, म्हणजेच मंत्री निवडून देत आहात. त्यांचा विजय किर्तीमान विजय असणार आहे हे मी खात्रीने सांगतो. स्व.केशरकाकू क्षीरसागरांचा वारसा त्यांनी मोठ्या हिंमतीने चालवला. एक अभ्यासू आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा नेतृत्वाला जपण्याची जबाबदारी ही आपली आहे.त्यांनी निर्माण केलेल्या संस्थांच्या जाळ्यातून येथील लोकांना रोजगार मिळवून दिला. हा ढाण्या वाघ आज उमेदवारी अर्ज दाखल करून आला आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहा, हाच संदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करून बीडचा गड आपल्या राखायचा आहे, असे आवाहन शिवसेनेचे मंत्री अर्जुन खोतकर यांनी केले.

टॅग्स :BeedबीडMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Jaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर