शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
4
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
5
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
२० मिनिटांत ८.८ लाख रुपये लंपास, 'या' ४ चुकांमुळे बँक खाते रिकामे! तुम्ही तर करत नाहीयेत ना?
7
विराट कोहलीसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर तमन्नानं अखेर सत्य सांगितलं, म्हणाली...
8
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
9
"इंडस्ट्रीत माझी एकच चांगली मैत्रीण आहे...", शशांक केतकरने घेतलं 'या' अभिनेत्रीचं नाव
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
11
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
12
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
13
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
14
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
15
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
16
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
17
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
18
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
19
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
20
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!

हरभरा, तुरीचे थकलेले १३ कोटी रुपये मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:03 IST

जिल्ह्यात दुष्काळाच्या दाहकतेची तीव्रता वाढली असून, पाणी, चारा आणि मजुरांच्या हाताला काम, अशा विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुष्काळी आढावा बैठकीत विविध मागण्यांचे निवेदन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली

ठळक मुद्देचार दिवसांत मिळणार रक्कम : क्षीरसागरांनी मांडली दुष्काळाची दाहकता

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्ह्यात दुष्काळाच्या दाहकतेची तीव्रता वाढली असून, पाणी, चारा आणि मजुरांच्या हाताला काम, अशा विविध प्रश्नांवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दुष्काळी आढावा बैठकीत विविध मागण्यांचे निवेदन आ.जयदत्त क्षीरसागर यांनी दिले. या मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली असून दुष्काळाबाबत शासनाने तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे हरभरा व तुरीचे १३ कोटी रुपये मंजूर झाले असून ते तातडीने शेतकºयांना येत्या चार दिवसांत मिळतील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आ.क्षीरसागर यांनी सांगितले.सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात विहिरी घेऊन त्यावर तात्पुरती पाणी पुरवठा योजना मंजूर करावी, ही मागणी मुख्यमंत्र्यांनी गांभिर्याने घेत तातडीने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सचिवांशी बोलून विभागीय आयुक्तांना याबाबतच्या डिजाईन आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले. जिल्ह्यात जलयुक्त शिवारचा निधी दुप्पट करावा, राशन दुकानातून सवलतीच्या दरात अन्न धान्य उपलब्ध करून देऊन भूमिहीन शेतकरी, शेतमजूर यांना माणसी २० किलो गहू व १५ किलो तांदूळ देण्यात यावा, या मागणीला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक होकार देऊन त्यास मंजुरी दिली. जिल्ह्यात एम.आर.ई.जी.एस. अंतर्गत शेतकºयांसाठी देण्यात येणाºया विहिरी इष्टांक वाढवून देण्यात याव्यात. ज्या प्रकल्पात पाणीसाठा आहे ते पाणी पिण्यासाठी आरक्षीत करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्यात यावे, जुन्या रोहयो नुसार कामे चालू करावीत, तातडीने छावण्या उघडून किंवा दावणीला चारा उपलब्ध करून द्यावा. दुधाला ५ रुपये दरवाढ करण्यात आली होती ही मुदत आता संपत असून ही दरवाढ पुढेही चालू ठेवावी. राज्यातील दुष्काळी भागात इफको व गोदरेज कंपन्यांकडून पशुखाद्य उपलब्ध करून द्यावे. गतवर्षी खरेदी केलेल्या हरभरा व तुरीचे थकित १३ कोटी रुपये तातडीने द्यावेत, अशी मागणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे पैसे वर्ग करण्यात येतील असे सांगितले. मराठवाड्यात गोदावरी खोºयात २५० सिंचन प्रकल्पाला मंजुरी देण्याची मागणीही आ.क्षीरसागर यांनी केली आहे. याबाबत तातडीने सर्वेक्षण करून प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले. सिंदफना, कुंडलिका, मांजरा, वाण व मनार या नदीच्या खोºयात कायमस्वरूपी शास्वत पाणी मिळावे, यासाठी सर्वेक्षणाकरीता २० कोटीची तरतूद करावी व बीड, गेवराई, माजलगाव शहराला पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जायकवाडी प्रकल्पातून 3 टीएमसी पाणी माजलगाव धरणात सोडण्यात यावे. सध्या बीड शहरात अमृत अटलचे काम प्रगतीपथावर असून या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करावा अशी मागणी केली असता या कामासाठी निधीची कमतरता पडणार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसJaydutt Kshirsagarजयदत्त क्षीरसागर