शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयावर धडकला रिपाइंचा लक्षवेधी आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 16:44 IST

गरीब व दलितांचे प्रश्न राज्य सरकारकडून  तात्काळ  सोडवून घेण्यायासाठी  प्रत्येक तालुक्यात रिपाइं मोर्चा काढणार आहे.

अंबाजोगाई : राज्य सरकारकडून गरीब व दलितांवर अन्याय केला जातो आहे. त्यांच्या अडीअडचणींचे या सरकारला देणेघेणे नाही. गायराण जमिनी व भोगवट्यातील घरे अद्यापही नावची केली जात नाहीत. महामंडळांना निधी न दिल्याने महामंडळे डबघाईला आली आहेत. अन्याय अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे गरीब व दलितांचे प्रश्न राज्य सरकारकडून  तात्काळ  सोडवून घेण्यायासाठी  प्रत्येक तालुक्यात रिपाइं मोर्चा काढणार आहे. असल्याचा इशारा युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला आहे.

येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्या घेवून मंगळवार (ता.9) आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या आक्रोष मोर्चात हजारो आंबेडकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पप्पू कागदे यांनी म्हंटल आहे की,  बर्दापूर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तोडफोड व विटंबना होऊन 4 महिन्यांचा काळ लोटला आहे. त्याठिकाणी  अद्यापपर्यंत शासनाने नविन पुतळा बसवून स्मारकाचे बांधकाम सुरू केलेले नाही. त्यामुळे तात्काळ पुतळा बसवून बांधकाम सुरू करण्यात आले पाहिजे. पुतळा विटंबना प्रकरणातील सहआरोपी व सूत्रधार यांचा शोध घेऊन तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा. गायरान धारकांचे सरसकट 7/12 नांवे नोंद करून सातबारा द्या, दलित वस्ती विकास योजना वाढीव व प्रभाविपणे राबवण्यात यावी. लॉकडाऊन काळातील विद्युत वीज बील माफ करण्यात यावे. शहरी व ग्रामीण भागातील रहिवासी राहते भोगवट्यातील जागेत मालकी हक्क नांवे नोंद करून पीटीआर व 7/12 द्या, यासह  विविध मागण्यााठी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केल्या आहेत.

सरकारने राज्यातील गायराण जमीनी पोट खराब कायद्यात टाकल्यामुळे गायराण धारकांना बँक कर्ज मिळत नाही. त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा. राज्यातील अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ आदी  मागासवर्गीय  महामंडळांना गेल्या एक वर्षांपासून निधी दिला नाही. तो निधी तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी या मोर्चात युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केली आहे.

यावेळी  राजू जोगदंड, किसन तांगडे, दशरथ सोनवणे,प्रमोद दासुद, दिपक  कांबळे,अशोक साळवे,मजर खान, दीपक कांबळे, गोवर्धन वाघमारे, महादेव उजगरे, बापू पवार, नरेंद्र जावळे, सचिन कागदे,बन्सी जोगदंड,राणी गायकवाड,कपिल कागदे,मंगेश जोगदंड, राहुल गंडले,किरण खंडागळे,सनी वाघचौरे,प्रकाश तांगडे, यांच्यासह हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनAmbajogaiअंबाजोगाई