शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

अंबाजोगाईत उपविभागीय कार्यालयावर धडकला रिपाइंचा लक्षवेधी आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 16:44 IST

गरीब व दलितांचे प्रश्न राज्य सरकारकडून  तात्काळ  सोडवून घेण्यायासाठी  प्रत्येक तालुक्यात रिपाइं मोर्चा काढणार आहे.

अंबाजोगाई : राज्य सरकारकडून गरीब व दलितांवर अन्याय केला जातो आहे. त्यांच्या अडीअडचणींचे या सरकारला देणेघेणे नाही. गायराण जमिनी व भोगवट्यातील घरे अद्यापही नावची केली जात नाहीत. महामंडळांना निधी न दिल्याने महामंडळे डबघाईला आली आहेत. अन्याय अत्याचार वाढले आहेत. त्यामुळे गरीब व दलितांचे प्रश्न राज्य सरकारकडून  तात्काळ  सोडवून घेण्यायासाठी  प्रत्येक तालुक्यात रिपाइं मोर्चा काढणार आहे. असल्याचा इशारा युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी दिला आहे.

येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पु कागदे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्या घेवून मंगळवार (ता.9) आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या आक्रोष मोर्चात हजारो आंबेडकरी कार्यकर्ते सहभागी झाले होते. 

जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात पप्पू कागदे यांनी म्हंटल आहे की,  बर्दापूर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तोडफोड व विटंबना होऊन 4 महिन्यांचा काळ लोटला आहे. त्याठिकाणी  अद्यापपर्यंत शासनाने नविन पुतळा बसवून स्मारकाचे बांधकाम सुरू केलेले नाही. त्यामुळे तात्काळ पुतळा बसवून बांधकाम सुरू करण्यात आले पाहिजे. पुतळा विटंबना प्रकरणातील सहआरोपी व सूत्रधार यांचा शोध घेऊन तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा. गायरान धारकांचे सरसकट 7/12 नांवे नोंद करून सातबारा द्या, दलित वस्ती विकास योजना वाढीव व प्रभाविपणे राबवण्यात यावी. लॉकडाऊन काळातील विद्युत वीज बील माफ करण्यात यावे. शहरी व ग्रामीण भागातील रहिवासी राहते भोगवट्यातील जागेत मालकी हक्क नांवे नोंद करून पीटीआर व 7/12 द्या, यासह  विविध मागण्यााठी युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केल्या आहेत.

सरकारने राज्यातील गायराण जमीनी पोट खराब कायद्यात टाकल्यामुळे गायराण धारकांना बँक कर्ज मिळत नाही. त्यामुळे हा कायदा रद्द करण्यात यावा. राज्यातील अण्णाभाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ आदी  मागासवर्गीय  महामंडळांना गेल्या एक वर्षांपासून निधी दिला नाही. तो निधी तात्काळ देण्यात यावा, अशी मागणी या मोर्चात युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी केली आहे.

यावेळी  राजू जोगदंड, किसन तांगडे, दशरथ सोनवणे,प्रमोद दासुद, दिपक  कांबळे,अशोक साळवे,मजर खान, दीपक कांबळे, गोवर्धन वाघमारे, महादेव उजगरे, बापू पवार, नरेंद्र जावळे, सचिन कागदे,बन्सी जोगदंड,राणी गायकवाड,कपिल कागदे,मंगेश जोगदंड, राहुल गंडले,किरण खंडागळे,सनी वाघचौरे,प्रकाश तांगडे, यांच्यासह हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.

टॅग्स :agitationआंदोलनAmbajogaiअंबाजोगाई