शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने कोबी, टोमॅटो, पिकावर फिरवला रोटावेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST

नांदुरघाट (जि. बीड) : भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने परिसरातील सहा ते सात शेतकऱ्यांनी कोबी, टोमॅटो पिकावर रोटावेटर फिरवला. दोन रुपये ...

नांदुरघाट (जि. बीड) : भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने परिसरातील सहा ते सात शेतकऱ्यांनी कोबी, टोमॅटो पिकावर रोटावेटर फिरवला. दोन रुपये किलोनेही कोबी आणि टोमॅटोला बाजारात कुणी विचारत नव्हते. उत्पन्न तर सोडाच काढणी आणि लागवडीचा खर्चही निघत नाही, ही शेतकऱ्यांची व्यथा होती.

शेतकरी समाधानी असे कधी झालेच नाही. कारण कायम संकट व संघर्ष हे पाचवीला पुजले आहेत. थोड्याफार क्षेत्रावर भाजीपाला उत्पन्न करून त्यावर उदरनिर्वाह करणारे बहुतांश शेतकरी आहेत. रोप लावल्यापासून पोटच्या लेकरावाणी पिकाची काळजी घ्यायची, लेकराला बिस्कीट पुडा घेताना दहा वेळेस विचार करणारा शेतकरी शेतात कीटकनाशकाची बाटली बेभाव किमतीत घेऊन फवारणी करतो. शेतामध्ये रात्रभर पाणी देण्यासाठी जिवाची पर्वा न करता उभा राहतो. शेतामधील आलेले तण नवरा - बायको दिवस रात्र कष्ट करून मशागत करतात. शेवटी पीक आल्यावर बाजारभाव नाही सापडल्यावर हताश होऊन कर्माला दोष देत आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. अशी वेळ येते हमीभाव नसल्यामुळे. कारण शेतकऱ्याला त्याच्या मालाला काय किंमत येईल, याची हमीच नसते. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे.

नांदुरघाट व सर्कलमध्ये अनेक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. याचे कारण शेतीमध्ये नापिकी व उत्पादित केलेल्या मालाला किंमत नाही. नांदुरघाट व परिसरात बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. थोड्या फार एकर, दोन एकर शेतीमध्ये भाजीपाला करून मंगळवारी आठवडी बाजारात विकून आपला प्रपंच चालवायचा. या भागात पत्ताकोबी व टोमॅटो याची लागवड चांगल्या प्रकारे झाली होती. परंतु बाजारामध्ये कोबीला दोन रुपये किलोसुद्धा भाव नाही. तसेच टोमॅटोचा दहा किलोचा कॅरेट वीस रुपयाला झाल्याने हा माल तोडून बाजारात येण्यासाठी त्याच्या गावातून त्याचे वैयक्तिक तिकीटसुद्धा निघत नाही. त्यामुळे या भागातील बळीराजा हताश झाला आहे.

पवारवाडी येथील विकास सोळुंके यांनी अर्धा एकर कोबी व अर्धा एकर टोमॅटो लावले होते. परंतु आलेले पीक तोडण्यासाठी जी मजुरी लागते ती ५० टक्केसुद्धा निघत नाही, झालेला खर्च तर वेगळाच. त्यामुळे हताश झालेल्या विकास सोळुंके या शेतकऱ्यासह परिसरातील सहा ते सात शेतकऱ्यांनी उभ्या पिकामध्ये रोटावेटर फिरवून पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेेले पीक जमीनदोस्त करताना कंठ दाटून डोळ्यात अश्रू येत होते. अशी परिस्थिती उद्भवते म्हणूनच शेतकरी नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. अशा शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाने पंचनामे करून त्या शेतकऱ्याला पुढच्या पिकासाठी किमान बियाणे व खत मोफत देऊन आधार द्यायला पाहिजे. कष्ट करण्याची तयारी आहे. परंतु आर्थिक घडी बिघडल्यावर शेतकरी हताश होतो. त्यामुळे परिसरातील टोमॅटो व कोबी उत्पादक शेतकरी हे ‘जे आहेत त्यांचा पंचनामा करून मदत द्यावी’, असे बोलत आहेत. विकास सोळुंके यांनी तीन महिने राब राब राबून पिकविलेला पूर्ण भाजीपाला रोटावेटर फिरवून जमीनदोस्त केला, कारण काढणीसाठीचे पैसेसुद्धा निघत नव्हते.