शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने कोबी, टोमॅटो, पिकावर फिरवला रोटावेटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST

नांदुरघाट (जि. बीड) : भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने परिसरातील सहा ते सात शेतकऱ्यांनी कोबी, टोमॅटो पिकावर रोटावेटर फिरवला. दोन रुपये ...

नांदुरघाट (जि. बीड) : भाजीपाल्याचे भाव गडगडल्याने परिसरातील सहा ते सात शेतकऱ्यांनी कोबी, टोमॅटो पिकावर रोटावेटर फिरवला. दोन रुपये किलोनेही कोबी आणि टोमॅटोला बाजारात कुणी विचारत नव्हते. उत्पन्न तर सोडाच काढणी आणि लागवडीचा खर्चही निघत नाही, ही शेतकऱ्यांची व्यथा होती.

शेतकरी समाधानी असे कधी झालेच नाही. कारण कायम संकट व संघर्ष हे पाचवीला पुजले आहेत. थोड्याफार क्षेत्रावर भाजीपाला उत्पन्न करून त्यावर उदरनिर्वाह करणारे बहुतांश शेतकरी आहेत. रोप लावल्यापासून पोटच्या लेकरावाणी पिकाची काळजी घ्यायची, लेकराला बिस्कीट पुडा घेताना दहा वेळेस विचार करणारा शेतकरी शेतात कीटकनाशकाची बाटली बेभाव किमतीत घेऊन फवारणी करतो. शेतामध्ये रात्रभर पाणी देण्यासाठी जिवाची पर्वा न करता उभा राहतो. शेतामधील आलेले तण नवरा - बायको दिवस रात्र कष्ट करून मशागत करतात. शेवटी पीक आल्यावर बाजारभाव नाही सापडल्यावर हताश होऊन कर्माला दोष देत आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. अशी वेळ येते हमीभाव नसल्यामुळे. कारण शेतकऱ्याला त्याच्या मालाला काय किंमत येईल, याची हमीच नसते. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे.

नांदुरघाट व सर्कलमध्ये अनेक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. याचे कारण शेतीमध्ये नापिकी व उत्पादित केलेल्या मालाला किंमत नाही. नांदुरघाट व परिसरात बहुतांश शेतकरी अल्पभूधारक आहेत. थोड्या फार एकर, दोन एकर शेतीमध्ये भाजीपाला करून मंगळवारी आठवडी बाजारात विकून आपला प्रपंच चालवायचा. या भागात पत्ताकोबी व टोमॅटो याची लागवड चांगल्या प्रकारे झाली होती. परंतु बाजारामध्ये कोबीला दोन रुपये किलोसुद्धा भाव नाही. तसेच टोमॅटोचा दहा किलोचा कॅरेट वीस रुपयाला झाल्याने हा माल तोडून बाजारात येण्यासाठी त्याच्या गावातून त्याचे वैयक्तिक तिकीटसुद्धा निघत नाही. त्यामुळे या भागातील बळीराजा हताश झाला आहे.

पवारवाडी येथील विकास सोळुंके यांनी अर्धा एकर कोबी व अर्धा एकर टोमॅटो लावले होते. परंतु आलेले पीक तोडण्यासाठी जी मजुरी लागते ती ५० टक्केसुद्धा निघत नाही, झालेला खर्च तर वेगळाच. त्यामुळे हताश झालेल्या विकास सोळुंके या शेतकऱ्यासह परिसरातील सहा ते सात शेतकऱ्यांनी उभ्या पिकामध्ये रोटावेटर फिरवून पोटच्या लेकराप्रमाणे सांभाळलेेले पीक जमीनदोस्त करताना कंठ दाटून डोळ्यात अश्रू येत होते. अशी परिस्थिती उद्भवते म्हणूनच शेतकरी नैराश्यातून आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो. अशा शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी शासनाने पंचनामे करून त्या शेतकऱ्याला पुढच्या पिकासाठी किमान बियाणे व खत मोफत देऊन आधार द्यायला पाहिजे. कष्ट करण्याची तयारी आहे. परंतु आर्थिक घडी बिघडल्यावर शेतकरी हताश होतो. त्यामुळे परिसरातील टोमॅटो व कोबी उत्पादक शेतकरी हे ‘जे आहेत त्यांचा पंचनामा करून मदत द्यावी’, असे बोलत आहेत. विकास सोळुंके यांनी तीन महिने राब राब राबून पिकविलेला पूर्ण भाजीपाला रोटावेटर फिरवून जमीनदोस्त केला, कारण काढणीसाठीचे पैसेसुद्धा निघत नव्हते.