शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेले उसाचे नगदी पीक आले धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 00:09 IST

यंदा माजलगाव धरणाच्या कालव्यावर अवलंबून असलेले उसाचे पीक पाण्याअभावी व हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने धोक्यात आले आहे. त्यामुळे उसाचे वजन निम्म्याने घटणार आहे.

ठळक मुद्देशेतकरी हवालदिल : उसाचे वजन निम्म्याने घटणार; २६५ जातीच्या उसाला कारखानदारांनी लाल झेंडा दाखविल्याने शेतकऱ्यांना कर्ज काढून घ्यावे लागले बेणे

लोकमत न्यूज नेटवर्कगंगामसला : माजलगाव तालुक्यात गतवर्षी परतीचा पाऊस चांगला झाल्याने माजलगाव धरण शंभर टक्के भरले होते. धरण भरल्याने व कालव्याला पाणी सोडल्याने तालुक्यात आडसाली ३२२ हेक्टर, पूर्वहंगामी ४ हजार ६०५ हेक्टर नवीन उसाची लागवड ७ हजार ६८२ हेक्टर तसेच खोडवा ऊस ४ हजार ९२२ हेक्टर अशा एकूण १७ हजार ५४१ हेक्टर क्षेत्रात उसाची लागवड करण्यात आली. यंदा माजलगाव धरणाच्या कालव्यावर अवलंबून असलेले उसाचे पीक पाण्याअभावी व हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने धोक्यात आले आहे. त्यामुळे उसाचे वजन निम्म्याने घटणार आहे.तालुक्यामध्ये गेल्या वर्षी बोंडअळीने थैमान घालून शेतकºयांना उभ्या पिकावर नांगर चालविण्याची वेळ आणली.त्यामुळे शेतकºयांनी आपल्या शेतातील कापूस उपटून टाकला व धरणाचे पाणी कालव्यांमध्ये सुटणार असल्याने आनंदात उसाची लागवड केली होती. त्यातच २६५ जातीच्या उसाला कारखानदारांनी लाल झेंडा दाखवल्याने शेतकºयांना सावकारी कर्ज काढून पाच ते सहा हजार रु पये टनाप्रमाणे महागामोलाचे दुसºया जातीचे उसाचे बेणे विकत घ्यावे लागले आणि माजलगाव धरणाच्या कालव्याच्या आधारावर शेतामध्ये उसाची लागवड केली.परंतु यावर्षी पावसाने उघडीप दिल्याने हजारो रुपये खर्च करून रात्रंदिवस मेहनत, मशागत करून उभे केलेले उसाचे पीक पाण्याअभावी व हुमणीचा प्रादुर्भाव झाल्याने धोक्यात आले आहे. उसाचे वजन निम्म्याने घटणार असल्याने यावर्षी शेतकºयांना ऊस उत्पादनात आर्थिक नुकसान सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :BeedबीडMajalgaon Damमाजलगाव धरणAgriculture Sectorशेती क्षेत्र