शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

संयम सुटतोय, राग अनावर..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 00:34 IST

अनैतिक संबंध, चारित्र्यावर संशय, व्यसन, दारु, द्वेष, मत्सर, सूडभावना यासारख्या क्षुल्लक कारणावरुन माणूसच माणसाच्या जीवावर उठला आहे. २०१८ मध्ये तब्बल ४५ जणांची निर्घृण हत्या झाली आहे. सरासरी आठ दिवसाला जिल्ह्यात एक खून होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.

ठळक मुद्देआठ दिवसांनी एक खून : २०१८ मध्ये ४५ जणांची निर्घृण हत्या; कारणे मात्र अतिशय किरकोळ

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अनैतिक संबंध, चारित्र्यावर संशय, व्यसन, दारु, द्वेष, मत्सर, सूडभावना यासारख्या क्षुल्लक कारणावरुन माणूसच माणसाच्या जीवावर उठला आहे. २०१८ मध्ये तब्बल ४५ जणांची निर्घृण हत्या झाली आहे. सरासरी आठ दिवसाला जिल्ह्यात एक खून होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली.नागरिकांना राग अनावर होत असल्याने त्यांचा संयम सुटत असून, ते जीव घेण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे दिसून येते. वाढत्या गुन्हेगारीवरुन नागरिकांना कायद्याचा धाकच राहिला नसल्याचे दिसते.दोन दिवसांपूर्वी बीड शहरातील तेलगाव नाक्यावर सुमित वाघमारे या २५ वर्षीय युवकाचा मेहुण्यानेच भर रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. हीच घटना समोर ठेवून वार्षिक आढावा घेतला असता, वर्षभरात तब्बल ४५ जणांचा खून झाल्याचे समोर आले. इतरांसोबतचे अनैतिक संबंध, एकमेकांवरील चारित्र्यावर संशय, दारुसाठी पैसे न देणे, रस्त्यावर उभा राहणे, संपत्तीवरुन वाद, व्यक्तिगत वाद, जेवण व्यवस्थित न देणे, जुने भांडण आदी क्षुल्लक कारणावरून लोक एकमेकांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे.कान्हापूरमध्ये दारुसाठी खूनवडवणी तालुक्यातील कान्हापूर येथे दारुसाठी पैसे न दिल्याने एका युवकाचा गावातीलच मित्राने खून केला होता. त्यानंतर वाद निर्माण झाला होता. पोलिसांनी हे प्रकरण हाताळून आरोपीला तात्काळ अटक केली अन् प्रकरण शांत केले होते.रस्त्यात थांबल्याने नातेवाईकांनीच काढला काटापेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत बार्शी नाक्यावर एक व्यक्ती रस्त्यावर थांबला म्हणून नात्यातीलच तिघांनी त्याचा दगडाने ठेचून खून केला होता. हे प्रकरणही चांगलेच चर्चेत राहिले.राजूरीत दिवसाढवळ्या खूनबीड ग्रामीण ठाणेहद्दीतील राजुरी येथे बहीर नामक व्यक्तीचा दिवसाढवळ्या धारदार शस्त्राने वार करुन खून केला होता. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर तणाव निर्माण झाला होता. खून दाखल करण्यासह आरोपींना अटक करण्याची मागणी नातेवाई-कांनी केली होती. आरोपींना अटक केल्यानंतर हे प्रकरण शांत झाले.....म्हणून पत्नीला जाळून मारले !पेठ बीड पोलीस ठाणेहद्दीत २६ सप्टेंबर २०१८ रोजी सायंकाळी सहा वाजता अय्यूब पठाण हा दारुच्या नशेत तर्रर्र होता. पत्नी घरकाम करीत होती. सानिया व समीर ही मुले बाहेर खेळत होती. यावेळी अय्यूबने पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केली होती. मात्र, आजारी असल्याने पत्नी सायरा हिने त्यास नकार दिला. यावेळी वासंनाध अय्यूबला राग अनावर झाला अन् त्याने रॉकेल अंगावर ओतून सायराला पेटवून दिले. यात तिचा मृत्यू झाल्याने अय्यूबवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.हुंड्यासाठी गर्भवतीचा आवळला गळाबीड तालुक्यातील हिंगणी खुर्द येथे हुंड्यात राहिलेले दीड लाख रुपये माहेरहून घेऊन ये असे म्हणत पूनम अशोक तांदळे या गर्भवतीचा गळा आवळून खून केला. गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक झाले होते. त्यांनी शवविच्छेदनही रोखल्याने तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी सासरच्या चौघांविरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.या वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस खात्यांसमोर एक नवीन आव्हान उभे ठाकले आहे.निर्घृण कृत्य : २० दिवसांत तिघांची हत्याचालू महिन्यात २० डिसेंबरपर्यंत तिघांचा खून झाला आहे. यामध्ये आष्टी तालुक्यातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगा, माजलगाव तालुक्यातील शहाजानपूर येथे पत्नीचे प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला आणि दोन दिवसांपूर्वी तेलगाव नाक्यावर पे्रमप्रकरणातून सुमित वाघमारेची हत्या झाली. अशा तीन घटना घडल्या आहेत.

टॅग्स :BeedबीडMurderखूनCrime Newsगुन्हेगारी